शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

गेली दोन वर्षे आजारी, शिमगोत्सवासाठी हट्टाने आला गावी; पालखी घरातून जाताच घेतला जगाचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 18:53 IST

वडिलांच्या निधनाचा मानसिक धक्का नीलेश याला बसला आणि त्या दिवसापासून तो आजारी पडला. मुंबईला अनेक तपासण्या करण्यात आल्या. मात्र, आजार कोणता याचे निदान झालेले नाही.

राजापूर : गेली दोन वर्षे आजारी असतानाही गावच्या शिमग्याची ओढ, त्यामुळे तो शिमगोत्सवासाठी हट्ट करून गावी आला हाेता. गावी घरात आलेल्या पालखीचे दर्शन घेतले आणि पालखी घरातून गेल्यानंतर अवघ्या काही क्षणातच त्याने जगाचा निरोप घेतला. राजापूर तालुक्यातील सोल्ये येथील नीलेश शिवराम चौकेकर या अवघ्या २० वर्षीय तरुणाच्या बाबतीत घडलेली ही दुर्दैवी घटना सर्वांच्या मनाला चटका लावून गेली.

तालुक्यातील सोल्ये माळवाडीतील शिवराम चौकेकर यांचे दोन वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. वडिलांच्या निधनाचा मानसिक धक्का नीलेश याला बसला आणि त्या दिवसापासून तो आजारी पडला. मुंबईला अनेक तपासण्या करण्यात आल्या. मात्र, आजार कोणता याचे निदान झालेले नाही. गेली दोन वर्षे कोरोनामुळे शिमगोत्सव साजरा करण्यात आलेला नाही. यावर्षी शिमगोत्सव साजरा होणार असल्याने नीलेशने गावी येण्यासाठी आई व भावाकडे हट्ट धरला आणि ताे गावी आला हाेता.

सोल्येचा शिमगोत्सव सुरू झाल्यावर मानाची घरे घेत पालखी माळवाडी येथे गेली. दरम्यान, नीलेशची तब्बेत बिघडली होती. तरी त्याने हार न मानता घरात आलेल्या पालखीचे व देवीचे दर्शन घेतले. घरातील मंडळींनी देवीची पूजा करत ओटी भरली. गावकऱ्यांशी हसत खेळत असताना पालखी शेजारी असलेल्या घरी गेली. याचवेळी नीलेश याचा रक्तदाब अचानक कमी झाला आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई व एक भाऊ असा परिवार आहे.

दर्शनाची इच्छा पूर्ण

नीलेशच्या मृत्यूची बातमी खेळगडी व गावात पसरताच पूर्ण गाव सुन्न झाला. दहा मिनिटांपूर्वी देवीचे दर्शन घेणाऱ्या नीलेशचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच चटका लावून गेला. नीलेशला शेवटचे देवीचे दर्शन घ्यायचे होते म्हणूनच त्याने हट्ट धरून गाव गाठले. त्याची इच्छा पूर्ण होताच त्याने आपला देह ठेवला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीshimoga-pcशिमोगा