शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

व्यवसाय कालबाह्य, ‘नालबंद’ कारागिराचे कष्टप्रद जीणे

By admin | Updated: October 8, 2015 00:32 IST

उरल्या केवळ आठवणी : पस्तीस वर्षांचा जीवघेणा काळ

शोभना कांबळे -- रत्नागिरी -अगदी स्वातंत्र्योत्तर काळापासून सुरू असलेला नालबंद व्यवसाय काही वर्षांपासून कालबाह्य झाल्याने रत्नागिरीतील वृद्ध कारागीर गेली ३५ वर्षे कष्टप्रद जीणे जगत आहे. आता त्याच्याकडे केवळ या व्यवसायाच्या आठवणी शिल्लक आहेत. शहरातील गाडीतळ येथील ६८ वर्षीय बाबासाहेब इमाम नाईक (नालबंद) आपल्या या व्यवसायासंबधी माहिती देतात. पूर्वी सर्व दळणवळण बैलगाडीच्या माध्यमातून होत असे. शहरातील लक्ष्मी चौकातून पाली, बांबर, चरवेली, घाटिवळे, लांजा आदी ठिकाणी जाण्यासाठी येथून बैलगाड्या सोडण्यात येत असत. रात्रीच्या वेळी या ठिकाणी चुली पेटत. याठिकाणी एक चौथराही होता. तिथे पाण्याची सोय केलेली असे. या भागातून बैलगाड्या सुटत त्यामुळे या भागाला गाडीतळ हे नाव पडले ते कायमचे. रात्री जेवण झाले की, गाडीवान आपल्या गाड्या घेऊन रात्रीच निघत. बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज पहाटेपर्यंत ऐकायला येत असे अशी आठवण नाईक यांनी जागी केली. त्याकाळी मातीचे रस्ते होते. बैलांना खडतर अशा मार्गावरून जावे लागत असल्याने त्यांच्या चारही पायांना लोखंडी नाल बसवण्यात येत असत. हे नाल बसवण्याचे काम बाबासाहेब नाईक यांचे वडील इमाम नाईक हे सन १९३८पासून करत होते. त्याकाळी या व्यवसायाला अतिशय बरकत होती. बाबासाहेब नाईक यांनीही पुढे शिक्षण झाल्यावर आपल्या वडिलांच्या व्यवसायास हातभार लावण्यास सुरूवात केली. फाटक प्रशालेतून जुनी अकरावी केल्यानंतर त्यांनी काही काळ नोकरी केली. मात्र, वडिलांचा व्यवसाय वाढू लागल्याने त्यांनी ही नोकरीही सोडली आणि या व्यवसायालाच वाहून घेतले. या भागात दुसरा कुणीच कारागीर नसल्याने बैलांच्या पायाला नाल बसवण्यासाठी या पिता-पुत्रांना साखरतर, पावस, कासारवेली आजुबाजूच्या अनेक गावांतून बोलावणेही होत असे. एवढेच नव्हे तर त्यांचे नाईक आडनाव बाजूला पडून ते ‘नालबंद’ झाले.मातीचे रस्ते होते, तोपर्यंत बैलांच्या पायातील नाल बराच काळ टिकायचे. पण सिमेंटचे रस्ते झाले, त्यामुळे या नालांचे आयुष्यही कमी झाले. त्यामुळे व्यवसाय अधिकच वाढला. त्यानंतर सन १९७६सालानंतर हळूहळू खासगी वाहनांची संख्या वाढली आणि बैलगाड्या रोडावल्या. सन १९७८सालानंतर तर नालबंद व्यवसायाला घरघर लागली. बाबासाहेब नाईक यांच्या कुटुंबांची गुजराण कशीबशी होऊ लागली. दरम्यानच्या काळात त्यांच्या वडिलांचेही निधन झाले. त्यानंतरही नाईक कुटुंब गाडीतळावरील त्याच भाड्याच्या घरात अजूनही रहात आहे. आज या कुटुंबाला अतिशय खडतर परिस्थितीमध्ये जीवन कंठावे लागत आहे. बाबासाहेब नाईक यांना आता मधुमेहामुळे पायदुखीचा त्रास होत असल्याने त्यांना बाहेर पडणेही कठीण झाले आहे. रहात्या जागेत शौचालयासह अनेक मुलभूत गोष्टींची गैरसोय आहे. तरीही संसाराचा गाडा कसाबसा सुरू आहे. आपल्या कष्टाळू दोन्ही मुलींना चांगली नोकरी लागली की हे दिवस सरतील, असा विश्वास त्यांना वाटतोय.बाबासाहेब नाईक यांना दोन मुली आहेत. मोठी मुलगी सना हिने शिकवणी घेत अगदी वकीलीचे शिक्षण घेतले आहे. मात्र, अजुनही तिला कुठे नोकरी नाही. मात्र, विद्यार्थ्यांच्या शिकवण्या घेत ती अजुनही कुटुंबाचा गाडा चालवत आहे. तिच्यापाठची बहीण हिना हिने डीएड केले असून ती एका शाळेवर तात्पुरती शिक्षिका म्हणुन काम करीत आहे. काळाच्या ओघात आता मासे, लाकडे तसेच इतर वस्तुंची वाहतूक करणाऱ्या बैलगाड्या आता काळाआड गेल्या आहेत. नव्या पिढीला या जुन्या दळणवळणाच्या साधनाची ओळख होण्यासाठी आता ‘मामाचा गाव’ यासारख्या प्रकल्पांची निर्मिती करावी लागत आहे. रत्नागिरीत मांडवी येथेच फक्त दोन बैलगाड्या असल्याची माहिती बाबासाहेब नाईक देतात.