शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

रत्नागिरीत उद्यापासून पूर्ण आसन क्षमतेने धावणार बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 17:01 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कोरोनामुळे सामाजिक अंतर राखत पूर्ण क्षमतेच्या पन्नास टक्के प्रवासी वाहतूक सुरू ठेवली होती. मात्र, रविवार, २० सप्टेंबरपासून महामंडळाकडून पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. तसेच २१ सप्टेंबरपासून शहरी मार्गावरील वाहतूकही सुरू करण्याचा निर्णय रत्नागिरी विभागाने घेतला आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीत उद्यापासून पूर्ण आसन क्षमतेने धावणार बसेस सोमवारपासून शहरी वाहतूक सुरू, प्रवाशांना दिलासा

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कोरोनामुळे सामाजिक अंतर राखत पूर्ण क्षमतेच्या पन्नास टक्के प्रवासी वाहतूक सुरू ठेवली होती. मात्र, रविवार, २० सप्टेंबरपासून महामंडळाकडून पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. तसेच २१ सप्टेंबरपासून शहरी मार्गावरील वाहतूकही सुरू करण्याचा निर्णय रत्नागिरी विभागाने घेतला आहे.कोरोनामुळे दिनांक २२ मार्चपासून एस्. टी.ची वाहतूक ठप्प होती. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार २० ऑगस्टपासून सामाजिक अंतर राखून आसन क्षमतेच्या ५० टक्केप्रमाणे आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्याला राज्य परिवहन महामंडळाला परवानगी देण्यात आली. त्यानुसार टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू करण्यात आली.

कर्नाटक व गुजरात राज्यांनी शंभर टक्के प्रवासी वाहतूक सुरू केल्यानंतर महाराष्ट्रातही शंभर टक्के प्रवासी वाहतुकीला प्रारंभ होणार आहे. एस्. टी. बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मास्क व सॅनिटायझर लावणे बंधनकारक आहे.वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बस या निर्जंतूक करूनच मार्गस्थ करण्यात याव्यात, लांब व मध्यम पल्ल्याच्या बसेससाठी एका आसनावर एक प्रवाशी अशा तिरप्या झेड पद्धतीने आरक्षण उपलब्ध आहे. मात्र, यापुढे पूर्ण आसन क्षमतेने वाहतुकीला परवानगी देण्यात आल्याने सर्व आसने पूर्ववत करण्याची सूचना देण्यात आली आहे. रत्नागिरी विभागातर्फे रविवार, २० सप्टेंबरपासून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे.रत्नागिरीतील शहरी वाहतूक दिनांक २१ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. लॉकडाऊनपासून आतापर्यंत शहरी वाहतूक बंद होती. आता शहरी वाहतूक सुरू होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटीRatnagiriरत्नागिरी