शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

राजापूरकरांवर घरपट्टी करवाढीचा बोजा, नागरिकांमधून नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 17:46 IST

Rajapur Nagar Parishad News- कोविडनंतर झालेल्या लॉकडाऊनमुळे सर्वांचे आर्थिक गणित बिघडलेले असताना राजापूर नगर परिषदेने घरपट्टीत तब्बल २० टक्क्यांहून अधिक दरवाढ केल्याच्या नोटीस बजावल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देराजापूरकरांवर घरपट्टी करवाढीचा बोजा, नागरिकांमधून नाराजीगतवर्षीच नवा कर माथी, नगर परिषदेने बजावली नोटीस

राजापूर : कोविडनंतर झालेल्या लॉकडाऊनमुळे सर्वांचे आर्थिक गणित बिघडलेले असताना राजापूर नगर परिषदेने घरपट्टीत तब्बल २० टक्क्यांहून अधिक दरवाढ केल्याच्या नोटीस बजावल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

नगर परिषदेने घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली गतवर्षीच नवा कर नागरिकांच्या माथी मारलेला असताना यावर्षी वीस टक्क्यांनी मालमत्ता कर वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने सामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत.नगर विकास खात्याच्या निर्देशानुसार पंचवार्षिक फेरआकारणी करताना राजापूर नगर परिषदेने शहरातील ३ हजार २४५ मालमत्तांचे जुलैअखेर सर्वेक्षण केले होते. ऐन कोविडच्या कालावधीत नगर परिषदेचे सर्वेक्षण सुरू होते. नव्या सर्वेक्षणानंतर नगर परिषदेने शहरातील एकूण मालमत्ता करात १५ लाख रूपयांची वाढ अपेक्षित धरली आहे.नगर विकास विभागाने आरसीसी बांधकामांसाठी २० टक्के, लोड बेअरिंग बांधकामांसाठी १६ टक्के, चिरेबंदी - कौलारू घरांसाठी १४ टक्के व गोठ्यांसाठी १० टक्के दरवाढ करण्याचे प्रशासनाला कळविले आहे. याशिवाय भाडेकरू असल्यास त्याच्या एकूण वार्षिक भाड्यात १० टक्क्यांची वजावट करून उर्वरित रकमेवर ३१ टक्के कर आकारणी केली जाणार आहे.

या करामुळे नगर परिषदेच्या उत्पन्नात १ कोटी रूपयांपेक्षा अधिक रक्कम जमा होणार आहे. या कर वाढीच्या नोटीस नागरिकांना बजावण्यात आल्या असून, त्यावर नगर विकास विभाग सुनावणी घेणार आहे.हरकती देण्याची सूचनागतवर्षी राजापूर नगर परिषदेने नागरिकांवर १८० रुपयांचा घनकचरा व्यवस्थापन कर बसवलेला आहे. व्यापाऱ्यांसाठी हा कर ३६० रुपयांचा आहे. त्यानंतर आता मालमत्ता करात २० टक्क्यांहून अधिक दरवाढ केली जात असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. त्यावर हरकती घेण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे. त्यासाठी मुख्याधिकारी यांच्या नावे अर्ज करायचा आहे.

टॅग्स :Rajapur Nagar Parishadराजापूर नगर परिषदRatnagiriरत्नागिरी