रहिम दलाल - रत्नागिरी स्वमालकीच्या इमारती नसल्याने जिल्हा परिषदेच्या १४६ प्राथमिक शाळा भाड्याच्या इमारतींमध्ये भरविण्यात येत आहेत़ जिल्हा परिषदेकडून या शाळांच्या भाड्यापोटी लाखो रुपये थकल्याने इमारत मालक भाड्याच्या रकमेसाठी जिल्हा परिषदेचे उंबरठे झिजवत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेने वाडी-वस्त्यांवर शाळा सुरु करुन शिक्षणाचा पाया खोलवर रुजवण्याचा प्रयत्न केला आहे़ मात्र, त्यासाठी स्वत:च्या मालकीच्या इमारती असणे आवश्यक होते़ मात्र, इमारतींचा विचार केला असता, तर आज अनेक गावे, वाड्या, वस्त्यांमध्ये शिक्षणाचा पाया रुजू शकला नसता़ त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने शाळा सुरु करतानाच इमारती भाड्याने घेतल्या़जिल्हा परिषदेच्या २७४७ प्राथमिक शाळा आहेत़ या बहुतांश शाळांच्या इमारती जुन्या असल्याने अनेक शाळांच्या वर्गखोल्या सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून कोट्यवधी ्नरुपयांचा खर्च करून बांधण्यात आल्या आहेत़ तरीही आज जिल्हा परिषदेच्या १४६ प्राथमिक शाळांच्या इमारती भाड्याच्या आहेत़ शिक्षणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येत असताना गेल्या अनेक वर्षांपासून या शाळांना स्वत:च्या मालकीच्या इमारती नाहीत. त्यांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे़ शाळांच्या इमारतीचे भाडे किरकोळ असले तरी ते इमारतीच्या मालकांना वेळेवर मिळत नसल्याने ओरड सुरु आहे़ लाखो रुपयांचे भाडे अजूनही जिल्हा परिषदेकडून थकीत आहे. लाखो रुपयांचे भाडे थकल्याने इमारतींचे मालक भाड्याच्या रकमेसाठी जिल्हा परिषदेचे उंबरठे झिजवत आहेत. त्यामुळे मालकही आता इमारत भाडे मागून थकले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही भाड्याच्या जागेत बसूनच शिक्षण घ्यावे लागत आहे.
जिल्हा परिषद शाळांचे लाखो रुपयांचे इमारत भाडे
By admin | Updated: August 27, 2015 23:41 IST