शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
4
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
5
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
6
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
7
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
8
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
9
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
10
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
11
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
12
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
14
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
15
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
16
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
17
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
18
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
19
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत पायाभूत प्रकल्प उभारणे महत्वाचे : नूतन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह

By शोभना कांबळे | Updated: October 1, 2022 17:34 IST

जिल्ह्याला दोन तीन वर्षे नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. नैसर्गिक आपत्ती आपण रोखू शकत नाही, मात्र, त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी प्रयत्न करू.

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पायाभूत प्रकल्प उभारणे महत्वाचे आहे. या जिल्ह्याला दोन तीन वर्षे नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. नैसर्गिक आपत्ती आपण रोखू शकत नाही, मात्र, त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी प्रयत्न करू, वृक्ष लागवडीवर भर देऊन प्रदुषण कमी करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही रत्नागिरीचे नूतन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी शनिवारी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.एम. देवेंदर सिंह यांनी आज, शनिवारी रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी डॉ. बी. एन.पाटील यांच्याकडून त्यांनी पदाची सुत्रे हाती घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वागत करण्यात आले. डॉ. पाटील यांची मुंबई येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळावर नियुक्ती झाल्याने त्यांच्या जागी देवेंदर सिंह यांची बदली झाली आहे.देवेंदर सिंह यांनी आयआयटी रुडकी येथून  संगणक अभियांत्रिकी व नंतर एम.बी.ए केलेले आहे. रत्नागिरीत येण्याआधी ते पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत होते. या पदापूर्वी त्यांनी अकोला आणि चंद्रपूर येथे  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व नंतर यवतमाळ व बीड येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले आहे.भारतीय प्रशासकीय सेवेतील २०११ च्या बॅचचे आय. ए. एस. अधिकारी आहेत. प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी त्यांनी दिल्ली येथे बँकिंग क्षेत्रात सेवा बजावलेली आहे. पाच वर्षांच्या या खाजगी क्षेत्रातील बँक सेवा कालावधीत रिझर्व बँक ऑफ इंडियाशी त्यांच्या कामाचा निकटचा संबंध होता.रत्नागिरीतील विमानतळाच्या टर्मिनलचे काम मार्गी लावणार असल्याचे देवेंदर सिंह यांनी यावेळी सांगितले. तसेच रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावयाचे असून यंदा प्रथम वर्षासाठी प्रवेश सुरू करावयाचे असल्याची माहितीही त्यांनी दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcollectorजिल्हाधिकारी