शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

संगमेश्वरातील गेलेले वैभव परत आणू : रवींद्र माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:34 IST

देवरुख : संगमेश्वर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, शिवसेनेच्या विजयाची परंपरा किती वर्षांची आहे. मागील विधानसभा निवडणुकीत मात्र त्याला थोडे ...

देवरुख : संगमेश्वर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, शिवसेनेच्या विजयाची परंपरा किती वर्षांची आहे. मागील विधानसभा निवडणुकीत मात्र त्याला थोडे गालबोट लागले. मात्र, गेलेले हे वैभव परत खेचून आणू, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी देवरुख येथे केले.

देवरूखातील सभापती निवास येथे आयाेजित कार्यक्रमात रवींद्र माने बोलत होते. रवींद्र माने या वेळी सदानंद चव्हाण यांना उद्देशून म्हणाले की, आता येथून खऱ्या अर्थाने राजकीय वाटचाल जोमाने सुरू होते. त्यामुळे येणाऱ्या काळात आपण सक्रिय राहा, असा सल्ला माने यांनी दिला. या वेळी व्यासपीठावर माजी आमदार सदानंद चव्हाण, सभापती जयसिंग माने, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या महिला संघटक स्नेहा माने, तालुकाप्रमुख प्रमोद पवार, उपतालुकाप्रमुख शैलेश जाधव, जिल्हा संघटक वेदा फडके, जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे, मुग्धा जागुष्टे, पंचायत समिती सदस्य सारिका जाधव, शीतल करंबेळे, संतोष लाड, बबन बांडागळे, प्रसाद सावंत, मुन्ना थरवळ, प्रद्युम्न माने, साडवली सरपंच राजू जाधव, कोसुंबचे सरपंच पूजा बोथरे उपस्थित होते.

या वेळी माजी आमदार सदानंद चव्हाण म्हणाले की, येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आपण मागील झालेल्या माझ्या पराभवाची हानी भरून काढू. या निवडणुकांत विजयी झेंडा फडकवू हीच खरी विधानसभा निवडणुकीची नांदी असेल. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तयारीला जोमाने लागा, असे स्पष्ट केले. यश आपलेच आहे, असाही आशावादही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

240921\img-20210923-wa0075.jpg

फोटो: देवरुख सभापती निवासस्थानी कार्यक्रमात बोलताना माजी आमदार सदांनद चव्हाण , सोबत माजी राज्यमंत्री रवींद्र माने।  (छाया-सचिन मोहिते)