शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

उज्ज्वला लाभार्थींच्या घरी पुन्हा पेटल्या चुली, ग्राहकांना ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 12:18 IST

प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेमुळे स्वयंपाकघरातील चुलीची जागा स्वयंपाक गॅस शेगडीने घेतली. गॅसमुळे महिलांची चुलीच्या धुरापासूून होणारी घुसमट थांबली. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना सुरुवातीला घरपोच सिलिंडर दिला जात होता. मात्र, आता गॅस वितरण कंपन्यांकडून सिलिंडर घरपोच देण्यास नकार दिला जात आहे.

ठळक मुद्देउज्ज्वला लाभार्थींच्या घरी पुन्हा पेटल्या चुली, ग्राहकांना तापगॅस कंपन्यांच्या असहकार्यामुळे ३०० रुपयांचा भुर्दंड

रत्नागिरी : प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेमुळे स्वयंपाकघरातील चुलीची जागा स्वयंपाक गॅस शेगडीने घेतली. गॅसमुळे महिलांची चुलीच्या धुरापासूून होणारी घुसमट थांबली. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना सुरुवातीला घरपोच सिलिंडर दिला जात होता. मात्र, आता गॅस वितरण कंपन्यांकडून सिलिंडर घरपोच देण्यास नकार दिला जात आहे.

त्यामुळे गॅस सिलिंडर घरापर्यंत नेण्यासाठी ३०० रुपयांचा भुर्दंड सोसण्याऐवजी ग्रामीण भागातील अनेकांच्या घरात गॅस शेगड्या बाजुला ठेवून पुन्हा चुली पेटविल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.केंद्रातील मोदी सरकारने गरीब कुटुंबांच्या घरोघरी गॅस सिलिंडर पुरवठा करून चुलीच्या धुरातून महिलांची सुटका करण्यासाठी १ मे २०१६ पासून उज्ज्वला योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस सिलिंडरचा पुरवठा घरपोच केला जात होता.स्वयंपाक बनवण्यासाठी ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात जळाऊ लाकडाचा वापर केला जात आहे. त्यामुळे घरात धुराचे साम्राज्य निर्माण होते. त्याचा आरोग्यायवर परिणाम होतो, असा दावाही केला जातो.या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने उज्ज्वला योजना सुरू केली. त्यानुसार ग्रामीण भागात गॅस जोडण्या देण्यात आल्या. त्यासाठी काही अटी असून, त्याची पूर्तता अनेकांनी केली. कर्जसुविधेचाही लाभ अनेकांनी घेतला आहे. या योजनेने महिलांना दिलासा मिळाला. ज्यांना १४.२ किलोचा गॅस सिलिंडर घेणे परवडत नाही त्यांना ५ किलोचा गॅस सिलिंडरही पुरविला जात आहे.गेल्या काही दिवसांपासून या योजनेंतर्गत सिंलिंडर घरपोच मिळत नसल्याने तसेच अनेकांची सिलिंडर खरेदी करताना आर्थिक अडचण होत आहे. त्यामुळे अनेक लाभार्थीनी या योजनेकडे पाठ फिरवली असून मुबलक उपलब्ध असलेल्या जळावू लाकडाचा वापर करून पुन्हा चुली पेटविल्याचे चित्र आहे.घरपोच सिलिंडर मिळत नसल्याने तो आणण्यासाठी ३०० रुपये प्रवास खर्च करणे शक्य नाही. त्यामुळे अनेकांनी स्वयंपाक गॅस सिलिंडरकडे पाठ फिरवत पुन्हा चुलीचा पर्याय निवडल्याने या योजनेच्या यशस्वीतेवर परिणाम झाल्याची चर्चा आता ग्रामीणपासून शहरी भागात रंगली आहे.

टॅग्स :GovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी