शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उज्ज्वला लाभार्थींच्या घरी पुन्हा पेटल्या चुली, ग्राहकांना ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 12:18 IST

प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेमुळे स्वयंपाकघरातील चुलीची जागा स्वयंपाक गॅस शेगडीने घेतली. गॅसमुळे महिलांची चुलीच्या धुरापासूून होणारी घुसमट थांबली. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना सुरुवातीला घरपोच सिलिंडर दिला जात होता. मात्र, आता गॅस वितरण कंपन्यांकडून सिलिंडर घरपोच देण्यास नकार दिला जात आहे.

ठळक मुद्देउज्ज्वला लाभार्थींच्या घरी पुन्हा पेटल्या चुली, ग्राहकांना तापगॅस कंपन्यांच्या असहकार्यामुळे ३०० रुपयांचा भुर्दंड

रत्नागिरी : प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेमुळे स्वयंपाकघरातील चुलीची जागा स्वयंपाक गॅस शेगडीने घेतली. गॅसमुळे महिलांची चुलीच्या धुरापासूून होणारी घुसमट थांबली. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना सुरुवातीला घरपोच सिलिंडर दिला जात होता. मात्र, आता गॅस वितरण कंपन्यांकडून सिलिंडर घरपोच देण्यास नकार दिला जात आहे.

त्यामुळे गॅस सिलिंडर घरापर्यंत नेण्यासाठी ३०० रुपयांचा भुर्दंड सोसण्याऐवजी ग्रामीण भागातील अनेकांच्या घरात गॅस शेगड्या बाजुला ठेवून पुन्हा चुली पेटविल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.केंद्रातील मोदी सरकारने गरीब कुटुंबांच्या घरोघरी गॅस सिलिंडर पुरवठा करून चुलीच्या धुरातून महिलांची सुटका करण्यासाठी १ मे २०१६ पासून उज्ज्वला योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस सिलिंडरचा पुरवठा घरपोच केला जात होता.स्वयंपाक बनवण्यासाठी ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात जळाऊ लाकडाचा वापर केला जात आहे. त्यामुळे घरात धुराचे साम्राज्य निर्माण होते. त्याचा आरोग्यायवर परिणाम होतो, असा दावाही केला जातो.या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने उज्ज्वला योजना सुरू केली. त्यानुसार ग्रामीण भागात गॅस जोडण्या देण्यात आल्या. त्यासाठी काही अटी असून, त्याची पूर्तता अनेकांनी केली. कर्जसुविधेचाही लाभ अनेकांनी घेतला आहे. या योजनेने महिलांना दिलासा मिळाला. ज्यांना १४.२ किलोचा गॅस सिलिंडर घेणे परवडत नाही त्यांना ५ किलोचा गॅस सिलिंडरही पुरविला जात आहे.गेल्या काही दिवसांपासून या योजनेंतर्गत सिंलिंडर घरपोच मिळत नसल्याने तसेच अनेकांची सिलिंडर खरेदी करताना आर्थिक अडचण होत आहे. त्यामुळे अनेक लाभार्थीनी या योजनेकडे पाठ फिरवली असून मुबलक उपलब्ध असलेल्या जळावू लाकडाचा वापर करून पुन्हा चुली पेटविल्याचे चित्र आहे.घरपोच सिलिंडर मिळत नसल्याने तो आणण्यासाठी ३०० रुपये प्रवास खर्च करणे शक्य नाही. त्यामुळे अनेकांनी स्वयंपाक गॅस सिलिंडरकडे पाठ फिरवत पुन्हा चुलीचा पर्याय निवडल्याने या योजनेच्या यशस्वीतेवर परिणाम झाल्याची चर्चा आता ग्रामीणपासून शहरी भागात रंगली आहे.

टॅग्स :GovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी