शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

उज्ज्वला लाभार्थींच्या घरी पुन्हा पेटल्या चुली, ग्राहकांना ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 12:18 IST

प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेमुळे स्वयंपाकघरातील चुलीची जागा स्वयंपाक गॅस शेगडीने घेतली. गॅसमुळे महिलांची चुलीच्या धुरापासूून होणारी घुसमट थांबली. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना सुरुवातीला घरपोच सिलिंडर दिला जात होता. मात्र, आता गॅस वितरण कंपन्यांकडून सिलिंडर घरपोच देण्यास नकार दिला जात आहे.

ठळक मुद्देउज्ज्वला लाभार्थींच्या घरी पुन्हा पेटल्या चुली, ग्राहकांना तापगॅस कंपन्यांच्या असहकार्यामुळे ३०० रुपयांचा भुर्दंड

रत्नागिरी : प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेमुळे स्वयंपाकघरातील चुलीची जागा स्वयंपाक गॅस शेगडीने घेतली. गॅसमुळे महिलांची चुलीच्या धुरापासूून होणारी घुसमट थांबली. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना सुरुवातीला घरपोच सिलिंडर दिला जात होता. मात्र, आता गॅस वितरण कंपन्यांकडून सिलिंडर घरपोच देण्यास नकार दिला जात आहे.

त्यामुळे गॅस सिलिंडर घरापर्यंत नेण्यासाठी ३०० रुपयांचा भुर्दंड सोसण्याऐवजी ग्रामीण भागातील अनेकांच्या घरात गॅस शेगड्या बाजुला ठेवून पुन्हा चुली पेटविल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.केंद्रातील मोदी सरकारने गरीब कुटुंबांच्या घरोघरी गॅस सिलिंडर पुरवठा करून चुलीच्या धुरातून महिलांची सुटका करण्यासाठी १ मे २०१६ पासून उज्ज्वला योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस सिलिंडरचा पुरवठा घरपोच केला जात होता.स्वयंपाक बनवण्यासाठी ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात जळाऊ लाकडाचा वापर केला जात आहे. त्यामुळे घरात धुराचे साम्राज्य निर्माण होते. त्याचा आरोग्यायवर परिणाम होतो, असा दावाही केला जातो.या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने उज्ज्वला योजना सुरू केली. त्यानुसार ग्रामीण भागात गॅस जोडण्या देण्यात आल्या. त्यासाठी काही अटी असून, त्याची पूर्तता अनेकांनी केली. कर्जसुविधेचाही लाभ अनेकांनी घेतला आहे. या योजनेने महिलांना दिलासा मिळाला. ज्यांना १४.२ किलोचा गॅस सिलिंडर घेणे परवडत नाही त्यांना ५ किलोचा गॅस सिलिंडरही पुरविला जात आहे.गेल्या काही दिवसांपासून या योजनेंतर्गत सिंलिंडर घरपोच मिळत नसल्याने तसेच अनेकांची सिलिंडर खरेदी करताना आर्थिक अडचण होत आहे. त्यामुळे अनेक लाभार्थीनी या योजनेकडे पाठ फिरवली असून मुबलक उपलब्ध असलेल्या जळावू लाकडाचा वापर करून पुन्हा चुली पेटविल्याचे चित्र आहे.घरपोच सिलिंडर मिळत नसल्याने तो आणण्यासाठी ३०० रुपये प्रवास खर्च करणे शक्य नाही. त्यामुळे अनेकांनी स्वयंपाक गॅस सिलिंडरकडे पाठ फिरवत पुन्हा चुलीचा पर्याय निवडल्याने या योजनेच्या यशस्वीतेवर परिणाम झाल्याची चर्चा आता ग्रामीणपासून शहरी भागात रंगली आहे.

टॅग्स :GovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी