शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

परजिल्ह्यातील बोटींचा परतीचा भोंगा वाजला, रत्नागिरी किनारपट्टी सुरक्षित, तामिळनाडूच्या ३० नौका थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 17:34 IST

आखी वादळाचा धोका संपल्याने जिल्ह्याच्या विविध बंदरात आश्रयाला आलेल्या मासेमारी नौका आता परतू लागल्या आहेत. केरळचे सहाय्यक संचालक (मत्स्य विभाग) डॉ. दिनेश चेरूवात यांनी जिल्हा प्रशासनाला भेट दिल्याने या राज्यातील २४ बोटींना परतण्याची परवानगी देण्यात आली.

ठळक मुद्देधोका संपल्याने आश्रयाला आलेल्या मासेमारी नौका परतू लागल्या केरळ राज्यातील २४ बोटींना परतण्याची परवानगी तामिळनाडूकडे परतणाऱ्या ३० नौका मात्र २४ तासांसाठी थांबणार

रत्नागिरी : ओखी वादळाचा धोका संपल्याने जिल्ह्याच्या विविध बंदरात आश्रयाला आलेल्या मासेमारी नौका आता परतू लागल्या आहेत.

केरळचे सहाय्यक संचालक (मत्स्य विभाग) डॉ. दिनेश चेरूवात यांनी जिल्हा प्रशासनाला भेट दिल्याने या राज्यातील २४ बोटींना परतण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, तामिळनाडूकडे परतणाऱ्या नौकांना २४ तासांसाठी थांबविण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांनी आज दिली. उद्या तामिळनाडूचे प्रधान सचिव रत्नागिरीला भेट देणार आहेत.ओखीच्या तडाख्यामुळे जिल्ह्यातील बंदरांमध्ये अनेक बोटी आश्रयाला आल्या आहेत. शनिवार सायंकाळपासून सोमवारपर्यंत रत्नागिरीतील मिऱ्या बंदरात गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि गुजरात या राज्यांतील १०८ नौका सुरक्षित ठिकाणी आणण्यात आल्या. त्यावर एकूण १६८२ खलाशी होते.

या सर्व बोटींना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्यासाठी जिल्हाधिकारी प्रदीप पी., निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगले, तटरक्षक दलाचे कमांडर एस. आर. पाटील, मत्स्य विभागाचे सहायक आयुक्त आ. बा. साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदर कार्यालयाचे इतर अधिकारी, तटरक्षक दलाचे जवान, पोलीस, मत्स्य विभागाचे अधिकारी तसेच महसूल विभागाचे कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले.

प्रशासनाच्या मदतीला विविध सामाजिक संस्थाही धावल्या. या कालावधीत खलाशांसाठी आवश्यक असणाऱ्या अन्नधान्याची तसेच इतर बाबींची सुविधा प्रशासनाच्या या सर्व यंत्रणांनी त्यांना उपलब्ध करून दिल्या होत्या.सोमवारी ओखी वादळ केरळच्या सागरी किनाऱ्यावरून ईशान्य दिशेकडे वळेल, असा प्राथमिक अंदाज होता. परंतु ते ईशान्येकडे वळण्याऐेवजी वायव्येकडे वळल्याने गुजरातच्या दिशेने पुढे गेले आहे. तरीही दोन दिवस सतर्कता बाळगण्यात आल्याने या बोटींना या बंदरातच थांबविण्यात आले होते. मात्र, आता येथील किनारपट्टीला धोका नसल्याने या नौका आता कालपासून परतू लागल्या आहेत.

गोवा, गुजरात आणि कर्नाटक येथील नौकांना डिझेल, पेट्रोल देऊन काल जाण्याची परवानगी देण्यात आली. बुधवारी सकाळी केरळचे सहाय्यक संचालक (मत्स्य विभाग) यांनी जिल्हा प्रशासनाला भेट दिली. निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांच्याशी त्यांनी चर्चा केली.

रत्नागिरीचे तहसीलदार मच्छिंद्र सुकटे यांच्यासमवेत डॉ. दिनेश चेरूवात यांनी या नौकांची पाहाणी केली. उद्या तामिळनाडूचे प्रधान सचिव येणार आहेत. रत्नागिरीतील मिऱ्या बंदर येथे २४ नौका उभ्या केलेल्या आहेत. त्यापैकी २१ नौका केरळमध्ये नोंदणी झालेल्या आहेत, तर ३ नौकांची नोंदणी तामिळनाडूमधील आहे. मात्र, यावरील खलाशी केरळचे आहेत.जिल्ह्यात सोमवारपर्यंत विविध बंदरात आलेल्या नौकांची संख्या ९८ इतकी होती. मात्र, त्यानंतर ही संख्या १०७ वर पोहोचली. खलाशांची संख्या सुमारे १७०० पर्यंत पोहोचली होती. या बोटींना इंधन तसेच अन्नधान्यासाठी मिळून सुमारे ४५ लाख रूपयांचा खर्च अपेक्षित होता. किनारपट्टी सुरक्षित झाल्याने आवश्यक बोटींना इंधनाचा पुरवठा करून जाण्यासाठी परवानगी देण्यात आली. उद्या केरळमधील नौका निघतील. मात्र, तामिळनाडूच्या ३० नौका थांबवल्या आहेत. 

ओखी वादळाचा सामना करण्यासाठी विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी तसेच मच्छीमार यांचे सहकार्य उत्तम लाभले. जिल्ह्यातील मच्छीमारांनी आपत्तीचे गांभीर्य लक्षात घेऊन सहकार्य केल्याने जिल्ह्यातील बोट बुडण्याचे वा मच्छीमाराला धोका पोहोचल्याची घटना ऐकिवात नाही. परराज्यातील नौका जिल्ह्यात आल्यानंतर बंदर विभागाला यंत्रणांनी सहकार्य केले, याबद्दल धन्यवाद.- कॅ. संजय उगलमुगले,प्रादेशिक बंदर अधिकारी, रत्नागिरी

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळRatnagiriरत्नागिरीMirkarwada Bandarमिरकरवाडा बंदर