शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

परजिल्ह्यातील बोटींचा परतीचा भोंगा वाजला, रत्नागिरी किनारपट्टी सुरक्षित, तामिळनाडूच्या ३० नौका थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 17:34 IST

आखी वादळाचा धोका संपल्याने जिल्ह्याच्या विविध बंदरात आश्रयाला आलेल्या मासेमारी नौका आता परतू लागल्या आहेत. केरळचे सहाय्यक संचालक (मत्स्य विभाग) डॉ. दिनेश चेरूवात यांनी जिल्हा प्रशासनाला भेट दिल्याने या राज्यातील २४ बोटींना परतण्याची परवानगी देण्यात आली.

ठळक मुद्देधोका संपल्याने आश्रयाला आलेल्या मासेमारी नौका परतू लागल्या केरळ राज्यातील २४ बोटींना परतण्याची परवानगी तामिळनाडूकडे परतणाऱ्या ३० नौका मात्र २४ तासांसाठी थांबणार

रत्नागिरी : ओखी वादळाचा धोका संपल्याने जिल्ह्याच्या विविध बंदरात आश्रयाला आलेल्या मासेमारी नौका आता परतू लागल्या आहेत.

केरळचे सहाय्यक संचालक (मत्स्य विभाग) डॉ. दिनेश चेरूवात यांनी जिल्हा प्रशासनाला भेट दिल्याने या राज्यातील २४ बोटींना परतण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, तामिळनाडूकडे परतणाऱ्या नौकांना २४ तासांसाठी थांबविण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांनी आज दिली. उद्या तामिळनाडूचे प्रधान सचिव रत्नागिरीला भेट देणार आहेत.ओखीच्या तडाख्यामुळे जिल्ह्यातील बंदरांमध्ये अनेक बोटी आश्रयाला आल्या आहेत. शनिवार सायंकाळपासून सोमवारपर्यंत रत्नागिरीतील मिऱ्या बंदरात गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि गुजरात या राज्यांतील १०८ नौका सुरक्षित ठिकाणी आणण्यात आल्या. त्यावर एकूण १६८२ खलाशी होते.

या सर्व बोटींना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्यासाठी जिल्हाधिकारी प्रदीप पी., निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगले, तटरक्षक दलाचे कमांडर एस. आर. पाटील, मत्स्य विभागाचे सहायक आयुक्त आ. बा. साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदर कार्यालयाचे इतर अधिकारी, तटरक्षक दलाचे जवान, पोलीस, मत्स्य विभागाचे अधिकारी तसेच महसूल विभागाचे कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले.

प्रशासनाच्या मदतीला विविध सामाजिक संस्थाही धावल्या. या कालावधीत खलाशांसाठी आवश्यक असणाऱ्या अन्नधान्याची तसेच इतर बाबींची सुविधा प्रशासनाच्या या सर्व यंत्रणांनी त्यांना उपलब्ध करून दिल्या होत्या.सोमवारी ओखी वादळ केरळच्या सागरी किनाऱ्यावरून ईशान्य दिशेकडे वळेल, असा प्राथमिक अंदाज होता. परंतु ते ईशान्येकडे वळण्याऐेवजी वायव्येकडे वळल्याने गुजरातच्या दिशेने पुढे गेले आहे. तरीही दोन दिवस सतर्कता बाळगण्यात आल्याने या बोटींना या बंदरातच थांबविण्यात आले होते. मात्र, आता येथील किनारपट्टीला धोका नसल्याने या नौका आता कालपासून परतू लागल्या आहेत.

गोवा, गुजरात आणि कर्नाटक येथील नौकांना डिझेल, पेट्रोल देऊन काल जाण्याची परवानगी देण्यात आली. बुधवारी सकाळी केरळचे सहाय्यक संचालक (मत्स्य विभाग) यांनी जिल्हा प्रशासनाला भेट दिली. निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांच्याशी त्यांनी चर्चा केली.

रत्नागिरीचे तहसीलदार मच्छिंद्र सुकटे यांच्यासमवेत डॉ. दिनेश चेरूवात यांनी या नौकांची पाहाणी केली. उद्या तामिळनाडूचे प्रधान सचिव येणार आहेत. रत्नागिरीतील मिऱ्या बंदर येथे २४ नौका उभ्या केलेल्या आहेत. त्यापैकी २१ नौका केरळमध्ये नोंदणी झालेल्या आहेत, तर ३ नौकांची नोंदणी तामिळनाडूमधील आहे. मात्र, यावरील खलाशी केरळचे आहेत.जिल्ह्यात सोमवारपर्यंत विविध बंदरात आलेल्या नौकांची संख्या ९८ इतकी होती. मात्र, त्यानंतर ही संख्या १०७ वर पोहोचली. खलाशांची संख्या सुमारे १७०० पर्यंत पोहोचली होती. या बोटींना इंधन तसेच अन्नधान्यासाठी मिळून सुमारे ४५ लाख रूपयांचा खर्च अपेक्षित होता. किनारपट्टी सुरक्षित झाल्याने आवश्यक बोटींना इंधनाचा पुरवठा करून जाण्यासाठी परवानगी देण्यात आली. उद्या केरळमधील नौका निघतील. मात्र, तामिळनाडूच्या ३० नौका थांबवल्या आहेत. 

ओखी वादळाचा सामना करण्यासाठी विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी तसेच मच्छीमार यांचे सहकार्य उत्तम लाभले. जिल्ह्यातील मच्छीमारांनी आपत्तीचे गांभीर्य लक्षात घेऊन सहकार्य केल्याने जिल्ह्यातील बोट बुडण्याचे वा मच्छीमाराला धोका पोहोचल्याची घटना ऐकिवात नाही. परराज्यातील नौका जिल्ह्यात आल्यानंतर बंदर विभागाला यंत्रणांनी सहकार्य केले, याबद्दल धन्यवाद.- कॅ. संजय उगलमुगले,प्रादेशिक बंदर अधिकारी, रत्नागिरी

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळRatnagiriरत्नागिरीMirkarwada Bandarमिरकरवाडा बंदर