शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
4
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
5
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
6
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
7
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
8
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
9
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
10
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
11
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
12
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
13
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
15
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
16
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
17
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
18
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
19
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
20
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदी असतानाही कोकणात समुद्रमार्गे बोटीतून वाहतूक, गुहागरमध्ये बोट मालकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 21:27 IST

पुढील काही दिवस कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळेच सरकारने या काळात नागरिकांनी प्रवास न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, असं असतानाही काही ठिकाणी नियम धाब्यावर बसवून सार्वजनिक आरोग्याला बाधा होईल, अशा कृती केल्या जात आहेत. यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढत आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणेवरील ताण देखील वाढतो आहे.

ठळक मुद्दे जमावबंदी आदेश धुडकावल्याप्रकरणी जयगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. तसेच दोन्ही बोट मालकांवरही होणार गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

गुहागर : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सीमा बंद असतानाही समुद्रमार्गे मुंबईतून चाकरमान्यांची वाहतूक करण्यात आल्याप्रकरणी वाहतूक करणाऱ्या बोट मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती गुहागरचे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी दिली.

 

पुढील काही दिवस कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळेच सरकारने या काळात नागरिकांनी प्रवास न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, असं असतानाही काही ठिकाणी नियम धाब्यावर बसवून सार्वजनिक आरोग्याला बाधा होईल, अशा कृती केल्या जात आहेत. यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढत आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणेवरील ताण देखील वाढतो आहे.

वरवडेत आले ३४ ग्रामस्थ

मुंबईतील चाकरमान्यांना घेऊन दोन नौका विनापरवाना वरवडे (ता. रत्नागिरी) येथेही दाखल झाल्याचे उघड झाले आहे. दोन मासेमारी बोटीतून तब्बल ३४ माणसे अनधिकृतरित्या वरवडेतील तिवरी बंदरात उतरल्याचे पुढे आले आहे. कोणतीही तपासणी न करता त्यांनी गावात प्रवेश केल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी तक्रार केली. त्यानंतर आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली. तपासणी नंतर ३४ जणांवर जमावबंदी आदेश धुडकावल्याप्रकरणी जयगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. तसेच दोन्ही बोट मालकांवरही होणार गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

टॅग्स :konkanकोकणRatnagiriरत्नागिरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस