शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

संचारबंदी असतानाही कोकणात समुद्रमार्गे बोटीतून वाहतूक, गुहागरमध्ये बोट मालकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 21:27 IST

पुढील काही दिवस कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळेच सरकारने या काळात नागरिकांनी प्रवास न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, असं असतानाही काही ठिकाणी नियम धाब्यावर बसवून सार्वजनिक आरोग्याला बाधा होईल, अशा कृती केल्या जात आहेत. यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढत आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणेवरील ताण देखील वाढतो आहे.

ठळक मुद्दे जमावबंदी आदेश धुडकावल्याप्रकरणी जयगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. तसेच दोन्ही बोट मालकांवरही होणार गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

गुहागर : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सीमा बंद असतानाही समुद्रमार्गे मुंबईतून चाकरमान्यांची वाहतूक करण्यात आल्याप्रकरणी वाहतूक करणाऱ्या बोट मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती गुहागरचे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी दिली.

 

पुढील काही दिवस कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळेच सरकारने या काळात नागरिकांनी प्रवास न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, असं असतानाही काही ठिकाणी नियम धाब्यावर बसवून सार्वजनिक आरोग्याला बाधा होईल, अशा कृती केल्या जात आहेत. यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढत आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणेवरील ताण देखील वाढतो आहे.

वरवडेत आले ३४ ग्रामस्थ

मुंबईतील चाकरमान्यांना घेऊन दोन नौका विनापरवाना वरवडे (ता. रत्नागिरी) येथेही दाखल झाल्याचे उघड झाले आहे. दोन मासेमारी बोटीतून तब्बल ३४ माणसे अनधिकृतरित्या वरवडेतील तिवरी बंदरात उतरल्याचे पुढे आले आहे. कोणतीही तपासणी न करता त्यांनी गावात प्रवेश केल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी तक्रार केली. त्यानंतर आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली. तपासणी नंतर ३४ जणांवर जमावबंदी आदेश धुडकावल्याप्रकरणी जयगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. तसेच दोन्ही बोट मालकांवरही होणार गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

टॅग्स :konkanकोकणRatnagiriरत्नागिरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस