शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Ratnagiri: वादळामुळे कळाशी समुद्रात बोट बुडाली, सुदैवाने ६ खलाशांना वाचविण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 12:08 IST

स्थानिक मच्छीमारांमध्ये चिंतेचे वातावरण

देवगड : तालुक्यातील कळाशी समुद्र परिसरात गुरुवारी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास मासेमारीसाठी गेलेली राजेंद्र बाळकृष्ण भिलारे यांची ‘त्रिवेणी’ (नोंदणी क्रमांक : आयएनडी-एमएच-५-एमएम ७३२) ही मासेमारी बोट वादळी वाऱ्यामुळे बुडाल्याची घटना घडली. या अपघातामुळे बोटीसह त्यावरील साहित्याचे अंदाजे २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, बोटीवरील सर्व ६ खलाशांना सुखरूप वाचविण्यात यश आले आहे.हवामान विभागाने दिलेल्या वादळी वाऱ्याच्या सूचनेनंतर त्रिवेणी बोट देवगड बंदराकडे परत येत होती. मात्र, कळाशी परिसरात अचानक तीव्र वादळी वारे सुरू झाल्याने बोटीच्या खालील बाजूच्या दोन फळ्या निघून गेल्या आणि बोटीत पाणी शिरले, असे बोटीचे तांडेल बसप्पा कुरे (वय ४३) यांनी सांगितले. त्यांनी तत्काळ वायरलेसद्वारे जवळील ‘देवयानी’ या बोटीला मदतीसाठी संपर्क साधला. देवयानी बोटीच्या तांडेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दाेरीच्या साहाय्याने त्रिवेणी बोटीवरील तांडेलांसह ६ खलाशांना सुखरूप बाहेर काढले.या घटनेत बोट पूर्णपणे बुडाल्याने ती वाचविणे शक्य झाले नाही. बोटीवर ३ बॅरेल डिझेल, ४ डिस्को जाळे, वायरलेस उपकरण, आउटर बोर्ड (पाटे), टप, गॅस सिलिंडर, भांडी, दोरी आणि अंदाजे ३० क्रेट यांचेही नुकसान झाले. यामुळे बोटीचे मालक राजेंद्र भिलारे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.घटनेची माहिती मिळताच, साहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे यांनी सागरी सुरक्षा रक्षकांसह घटनास्थळी भेट देऊन मालक आणि खलाशांची विचारपूस केली. त्यांनी घटनेची सविस्तर माहिती गोळा करून १९ सप्टेंबर रोजी सकाळी मोका पंचनामा केला. अहवाल, बोटीची कागदपत्रे आणि छायाचित्रांसह साहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, मालवण यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात येणार आहे.या घटनेमुळे स्थानिक मच्छीमारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी हवामान सूचनांचे काटेकोर पालन आणि सागरी सुरक्षा उपाययोजनांवर अधिक भर देण्याची गरज व्यक्त होत आहे.