शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

Tauktae Cyclone Ratnagiri: जयगड येथे वादळी वाऱ्यामुळे नौकेचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 17:42 IST

Tauktae Cyclone Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात तोक्ते वादळाचा धुमाकूळ रविवारी रात्रभर सुरूच होता. वादळाने जिल्ह्याची वेस ओलांडली असली तरी वादळी वाऱ्याने जिल्ह्याला झोडपून काढले. या वादळाचा मोठा फटका मिरकरवाडा परिसराला बसला आहे.

ठळक मुद्देजयगड येथे वादळी वाऱ्यामुळे नौकेचे नुकसानमिरकरवाडा येथे वाहनांचे नुकसान

रत्नागिरी : जिल्ह्यात तोक्ते वादळाचा धुमाकूळ रविवारी रात्रभर सुरूच होता. वादळाने जिल्ह्याची वेस ओलांडली असली तरी वादळी वाऱ्याने जिल्ह्याला झोडपून काढले. या वादळाचा मोठा फटका मिरकरवाडा परिसराला बसला आहे.वादळी पावसाने मिरकरवाडा परिसरात दाणादाण उडवली. मिरकरवाडा जेटीवर उभ्या नौकांना वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. नौका एकमेकांवर आदळून नौकांचे नुकसान झाले. भीतीपोटी मच्छिमारांनी रात्र जागून काढली.मिरकरवाडा पांढरा समुद्र येथील कांचन ओशियन व्ह्यू समोरील भिंत कोसळली. या भिंतीखाली अनेक गाड्या गाडल्या गेल्याने नुकसान झाले. भिंत कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक सोहेल साखरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.या वादळाचा फटका मच्छिमारांनाही बसला आहे. वादळाच्या इशाऱ्यानंतर सर्व बोटी किनाऱ्यावर परतल्या मात्र सोसाट्याच्या वाऱ्याने व खवळलेल्या समुद्राने किनाऱ्यावर नांगरून ठेवलेल्या अनेक बोटींचे नुकसान झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील जयगड बंदर येथे एका मच्छिमाराची नांगरून ठेवलेली बोट रविवारी रात्रीच्या सुमारास बुडाली आहे. त्यामुळे नुकसान झाले आहे.

जयगड येथे वादळी वाऱ्यामुळे नौकेचे नुकसान- मिरकरवाडा येथे वाहनांचे नुकसानलोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : जिल्ह्यात तोक्ते वादळाचा धुमाकूळ रविवारी रात्रभर सुरूच होता. वादळाने जिल्ह्याची वेस ओलांडली असली तरी वादळी वाऱ्याने जिल्ह्याला झोडपून काढले. या वादळाचा मोठा फटका मिरकरवाडा परिसराला बसला आहे.वादळी पावसाने मिरकरवाडा परिसरात दाणादाण उडवली. मिरकरवाडा जेटीवर उभ्या नौकांना वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. नौका एकमेकांवर आदळून नौकांचे नुकसान झाले. भीतीपोटी मच्छिमारांनी रात्र जागून काढली.मिरकरवाडा पांढरा समुद्र येथील कांचन ओशियन व्ह्यू समोरील भिंत कोसळली. या भिंतीखाली अनेक गाड्या गाडल्या गेल्याने नुकसान झाले. भिंत कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक सोहेल साखरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.या वादळाचा फटका मच्छिमारांनाही बसला आहे. वादळाच्या इशाऱ्यानंतर सर्व बोटी किनाऱ्यावर परतल्या मात्र सोसाट्याच्या वाऱ्याने व खवळलेल्या समुद्राने किनाऱ्यावर नांगरून ठेवलेल्या अनेक बोटींचे नुकसान झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील जयगड बंदर येथे एका मच्छिमाराची नांगरून ठेवलेली बोट रविवारी रात्रीच्या सुमारास बुडाली आहे. त्यामुळे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळRatnagiriरत्नागिरी