रत्नागिरी: साेसाट्याच्या वाऱ्यामुळे मच्छिमारी नाैका भरकटत ब्रेक वॉटरच्या वॉलला आदळल्याने नौकेला जलसमाधी मिळाल्याची घटना साेमवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या दरम्यान मिरकरवाडा येथे घडली. नौकेवरील तांडेल व खलाशी यांनी पाण्यात उडी मारून पोहत किनारा गाठल्याने त्यांचे प्राण वाचले.ही नौका जिक्रिया लतीब पटेल व अन्य २ जणांच्या मालकीची आहे. साेमवारी सकाळी ते नाैका घेऊन पांढऱ्या समुद्रावरून भगवती बंदर याठिकाणी जात होते. इंजिनमध्ये काही तांत्रिक बिघाड आल्याने ते बंद पडले. वाऱ्याच्या वेगामुळे नौका भरकटून खडकावर आदळली आणि आडवी झाली. नौकेत पाणी शिरू लागल्याने प्रसंगावधान राखत तांडेल व खलाशांनी पाण्यात उड्या टाकल्या. ते पाेहत समुद्रकिनारी आले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.
VIDEO: ...अन् अवघ्या काही सेकंदांमध्ये नौकेचे तुकडे; रत्नागिरीतील थरारक घटना कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 18:37 IST