शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

फलक, ट्विटर विषय माझ्यासाठी संपले : उदय सामंत

By मनोज मुळ्ये | Updated: June 17, 2024 19:55 IST

शनिवारी कणकवली येथे मंत्री उदय सामंत व किरण सामंत यांचे छायाचित्र असलेले व अप्रत्यक्षणपणे राणे यांना इशारा देणारा फलक लागला.

रत्नागिरी : कणकवली येथे शिवसेना कार्यालयाबाहेर फलक लावण्यात आल्याचे आमदार नितेश राणे यांनी आपल्या सांगितल्यानंतर लगेचच तो काढून टाकण्याची सूचना मी केली. माझ्यासाठी फलक आणि ट्विटर हा विषय संपला आहे, असे सांगून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सध्या सुरू असलेल्या फलकयुद्धाबाबत काहीही भाष्य करण्यास नकार दिला.

शनिवारी कणकवली येथे मंत्री उदय सामंत व किरण सामंत यांचे छायाचित्र असलेले व अप्रत्यक्षणपणे राणे यांना इशारा देणारा फलक लागला. त्यानंतर आमदार नितेश राणे यांचे छायाचित्र असलेला व अप्रत्यक्षपणे सामंत यांना इशारा देणारा फलक लागला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंत्री उदय सामंत यांच्या गावी म्हणजे पाली येथे खासदार नारायण राणे यांचे छायाचित्र असलेला फलक लागला. सोमवारी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत मंत्री सामंत यांनी याविषयावर फारसे भाष्य केले नाही.गुंतवणुकीवर नाही, फलकांवर चर्चा अधिक

आपण मर्सिडिझ कंपनीची मोठी गुंतवणूक आणली, त्याबद्दल जेवढी चर्चा झाली, त्यापेक्षा कितीतरी अधिक चर्चा फलकांबाबत झाली, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. पाली येथे ज्यांनी कोणी फलक लावला, त्यामुळे पाली गावाला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. जर आपल्याकडे हे फलक आणून दिले गेले असते तर ते आपणही लावले असते, असेही ते उपरोधिकपणे म्हणाले................

महायुतीत सर्व आलबेलफलकांमुळे महायुतीबाबतही अनेकांना शंका येत आहेत. पण महायुतीत सर्व काही आलबेल आहे. आता छोटा भाऊ आणि मोठा भाऊ हे विषय महाविकास आघाडीत सुरू आहेत. कुठल्याही फलकांमुळे महायुतीत फरक पडणार नाही. ज्याक्षणी आपल्याला आमदार नितेश राणे यांनी कणकवलीतील फलकाबाबत सांगितले, त्याचक्षणी आपण फलक काढून टाकला. आमच्यामध्ये संवाद आहे, याचा हा पुरावा आहे, असेही मंत्री सामंत म्हणाले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतNarayan Raneनारायण राणे