शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

निळ्या चकाकणाऱ्या लाटांनी कोकण किनारपट्टी उजळली, समुद्रातील ऑक्सिजन कमी होत असल्याचे द्योतक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 07:48 IST

Ratnagiri News : रत्नागिरीतील विविध ठिकाणच्या किनाऱ्यांवर सध्या निळ्या रंगातील चकाकणाऱ्या लाटा आकर्षणाचा विषय ठरत आहेत.

रत्नागिरी : रत्नागिरीतील विविध ठिकाणच्या किनाऱ्यांवर सध्या निळ्या रंगातील चकाकणाऱ्या लाटा आकर्षणाचा विषय ठरत आहेत. फ्लोरोसंट लाइटप्रमाणे उजळून निघणाऱ्या या लाटा पर्यटकांसाठी पर्वणी असल्या तरी समुद्रातील ऑक्सिजन कमी होत असल्याचे हे द्योतक आहे.लाटा  उजळून टाकणारे हे  जीव  आहेत प्लवंग. त्यांचे शास्त्रीय नाव नॉकटिल्युका (noctiluca). समुद्राच्या पाण्याबरोबर हे सूक्ष्म प्लवंग किनाऱ्यावर येतात आणि एखाद्या गोष्टीच्या संपर्कात येतात तेव्हा प्रकाशमान होतात. या प्राण्यामध्ये जैविक प्रकाश निर्माण करण्याची क्षमता असते. नॉकटिल्युका हा एकपेशीय डायनोफ्लॅजेलेट गटात मोडणारा प्राणी प्लवंग आहे. तो काजव्यासारखा जैविक प्रकाश निर्माण करू शकतो.  गणपतीपुळे, वरवडे, रिळ या किनाऱ्यावर त्या प्रथम दिसतात.  नंतर एक-एक दिवसाच्या अंतराने ते बसणी काळबादेवी व रत्नागिरीच्या मांडवी, भाट्ये किनारी दिसत आहेत. 

अचानक नॉकटिल्युका या प्राण्यांच्या संख्येत प्रचंड  वाढ होण्याची कारणे पाहता समुद्राच्या पाण्यात कमी झालेला ऑक्सिजन आणि कार्बन डाय ऑक्साइडचे वाढलेले प्रमाण, हिमालयीन तिबेटीयन पठारावरील  ग्लेशियर्सचे कमी होत जाणारे प्रमाण आणि त्यामुळे तेथून येणाऱ्या थंड वाऱ्यांवर झालेला परिणाम ही कारणे दिसून येत आहेत.     - डाॅ. स्वप्नजा मोहिते, मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNatureनिसर्ग