शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे काळी फित आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 15:27 IST

Agricultruredepartment, college, 7th Pay Commission, dapoli, Ratnagiri राज्यातील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा, या मागणीसाठी दापोली कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून काळ्या फिती बांधून आंदोलन सुरू केले आहे.

ठळक मुद्देकृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे काळी फित आंदोलनकर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी

दापोली : राज्यातील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा, या मागणीसाठी दापोली कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून काळ्या फिती बांधून आंदोलन सुरू केले आहे.आश्वासित प्रगती योजनेसह सातवा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासंदर्भात मंगळवारपासून हे आंदोलन सुरू झाले आहे. १ नोव्हेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास १ तारखेपासून लेखणी बंद, काम बंद, लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. कृषी विद्यापीठाच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोरील ग्रंथालयाच्या प्रांगणामध्ये मंगळवारी कृषी विद्यापीठातील प्राध्यापकांपासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. २७ ऑक्टोबर रोजी पहिल्या दिवशी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून आंदोलन केले.या आंदोलनामध्ये सर्वच अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. सरकारने कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे वेळीच लक्ष दिल्यास पुढील आंदोलन आणि त्यामुळे होणारे त्रास टळेल, असे मत यावेळी प्रमुख नेत्यांनी मांडले...तर बेमुदत लेखणी बंदकाळ्या फिती आंदोलन केल्यानंतर आता १ नोव्हेंबरपासून कर्मचाऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र केले जाणार आहे. २ ते ५ नोव्हेंबरपर्यंत सर्व अधिकारी व कर्मचारी लेखणीबंद आंदोलन करतील. सहा नोव्हेंबर रोजी अधिकारी आणि कर्मचारी एक दिवस सामूहिक रजा घेऊन आंदोलन करतील. ७ नोव्हेंबरपासून सर्व अधिकारी आणि कर्मचारी बेमुदत लेखणीबंद आंदोलन करतील, असा निर्णय कृषी विद्यापीठातील सर्व कर्मचाऱ्यांनी घेतला असून, त्याला सर्वांनी पाठिंबा दिला आहे.

चारही कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून सातवा वेतन आयोग लागू झालेला नाही. गेले अनेक महिने सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. कोरोना संकटामुळे आम्ही थांबलो होतो. परंतु इतर विद्यापीठांना द्यायला सरकारकडे पैसे असतील, तर कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग द्यायला अडचण का येते? हा आयोग लागू झाला नाही तर भविष्यात विद्यापीठातील कर्मचारी आंदोलन अधिक तीव्र करतील.- डॉ. विठ्ठल नाईक,अध्यक्ष, विद्यापीठ कर्मचारी संघटना

राज्यातील इतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून दीड वर्ष झाले. कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांना मात्र तो मिळालेला नाही. केवळ आश्वासने दिली जात आहेत. चतुर्थ कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळत नाही. काही कर्मचारी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा. लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा हे आंदोलन अधिक चिघळू शकते.- सुनील दळवी, सहाय्यक कुलसचिव

टॅग्स :dapoli-acदापोलीcollegeमहाविद्यालय7th Pay Commissionसातवा वेतन आयोगRatnagiriरत्नागिरीagricultureशेती