शहरं
Join us  
Trending Stories
1
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख; योगायोग की राजकीय भूकंपाचे संकेत?
2
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
3
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
4
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
5
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
6
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
7
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
8
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
9
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
10
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
12
Viral Video: "हे फूटपाथ चालण्यासाठी आहेत, गाड्यांसाठी नाही!" परदेशी नागरिकांकडून पुणेकरांना शिस्तीचा धडा
13
ड्रॅगनला मोठा झटका! चिनच्या 'या' वस्तूवर ५ वर्षांसाठी 'अँटी-डंपिंग ड्युटी' लागू; स्थानिक उद्योगांना मिळणार बळ
14
Anurag Dwivedi : क्रूझवर शाही लग्न, लक्झरी कारचा मालक; कोट्यवधींची कमाई करुन दुबईला पळाला प्रसिद्ध युट्यूबर
15
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
16
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
17
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
18
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
19
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
20
ICICI Prudential AMC IPO: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी शहरावर जलसंकटाचे काळे ढग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:38 IST

प्रकाश वराडकर । लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : रत्नागिरी शहराला दररोज १५ ते १६ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणीपुरवठा करणाऱ्या ...

प्रकाश वराडकर ।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : रत्नागिरी शहराला दररोज १५ ते १६ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणातील साठ्यात मोठी घसरण झाली आहे. हा पुरवठा १२ एमएलडीवर आला आहे. शीळ धरणातील साठा बाष्पीभवनामुळे आणखी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरावर जलसंकटाचे ढग जमू लागले आहे.शहराला शीळ धरणातून दररोज सुमारे १५ ते १६ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा केला जातो. पानवल धरणातून १ ते २ दशलक्ष लीटर पाणी पुरविले जाते. मात्र, पानवल धरण हे दरवर्षी फेब्रुवारी किवा मार्च महिन्यात कोरडे होते. त्यामुळे पानवलचा पुरवठा आधी बंद होतो. नाचणे तलावातूनही अर्धा ते एक एमएलडी पाणीपुरवठा होतो. सध्या पानवल व नाचणेचा पाणीपुरवठा बंद आहे.बाष्पीभवनाचे प्रमाण वाढणारसध्या शीळ धरणातून शहराला १२ एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जात आहे. शीळ धरणामध्ये कमी साठा असल्याने पाणी उपसा कमी करण्यात आला आहे. बाष्पीभवनामुळे शीळ धरणातील साठा येत्या काही दिवसात आणखी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांना येत्या मे महिन्यात पाणी टंचाईशी सामना करावा लागणार अशी चिन्ह दिसू लागली आहेत.१५ जूनपर्यंतचा साठा?गेल्या काही वर्षांमध्ये जुलै ते आॅगस्ट महिन्यापर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शीळ धरणात असायचा. गेल्या पावसाळ्यात सुरूवातीला दोन महिने जोरदार पाऊस झाला. त्यावेळी धरण पूर्ण भरले. मात्र नंतरच्या काळात पाऊस कमी झाला. त्यामुळे घसरलेली पाणी पातळी भरून आली नाही. परिणामी यंदा पाणी संकट निर्माण झाले आहे. चिपळूण पाटबंधारे विभागाकडे असलेल्या या शीळ धरणामध्ये सध्या १.३१४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. हे पाणी येत्या १५ जूनपर्यंत पुरेल, असा अंदाज आहे. पाऊस उशिरा सुरू झाला तर आधीच टंचाई, कमी दाबाने पाणी व जलवाहिन्यांची गळती यामुळे पाणी टंचाईचे संकट अधिक गडद होण्याची भीती आहे.जलवाहिनी फुटण्याचे प्रकारसध्या वापरात असलेली मुख्य जलवाहिनी जागोजागी फुटत असल्याने दुरुस्ती करण्यातच वेळ वाया जात असल्याने पंपाद्वारे पाणी उपसा करण्यासाठी कमी वेळ उपलब्ध होत आहे. शहराअंतर्गत वितरण वाहिन्याही जुनाट झाल्याने सातत्याने नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे पाणी गळतीचे प्रमाण मोठे असून, गेल्या पाच वर्षांपासून कमी दाबाने पाणी पुरवठ्याची समस्या कायम आहे.दररोज टॅँकरच्या ५०-५५ फेºयाअपुºया पाणी पुरवठ्याची गंभीर स्थिती पाहता गेल्या तीन महिन्यांपासूनच १५ प्रभागांमध्ये टॅँकरने पाणी पुरवठा केला जातो. सध्या दररोज ५ टॅँकरद्वारे ५० ते ५५ फेºया करून शहरवासियांना पुरवठा केला जात आहे. तरीही टॅँकरद्वारे पाण्याची मागणी पूर्ण होत नसल्याचे दिसून येत आहे.