शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

रत्नागिरी शहरावर जलसंकटाचे काळे ढग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:38 IST

प्रकाश वराडकर । लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : रत्नागिरी शहराला दररोज १५ ते १६ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणीपुरवठा करणाऱ्या ...

प्रकाश वराडकर ।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : रत्नागिरी शहराला दररोज १५ ते १६ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणातील साठ्यात मोठी घसरण झाली आहे. हा पुरवठा १२ एमएलडीवर आला आहे. शीळ धरणातील साठा बाष्पीभवनामुळे आणखी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरावर जलसंकटाचे ढग जमू लागले आहे.शहराला शीळ धरणातून दररोज सुमारे १५ ते १६ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा केला जातो. पानवल धरणातून १ ते २ दशलक्ष लीटर पाणी पुरविले जाते. मात्र, पानवल धरण हे दरवर्षी फेब्रुवारी किवा मार्च महिन्यात कोरडे होते. त्यामुळे पानवलचा पुरवठा आधी बंद होतो. नाचणे तलावातूनही अर्धा ते एक एमएलडी पाणीपुरवठा होतो. सध्या पानवल व नाचणेचा पाणीपुरवठा बंद आहे.बाष्पीभवनाचे प्रमाण वाढणारसध्या शीळ धरणातून शहराला १२ एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जात आहे. शीळ धरणामध्ये कमी साठा असल्याने पाणी उपसा कमी करण्यात आला आहे. बाष्पीभवनामुळे शीळ धरणातील साठा येत्या काही दिवसात आणखी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांना येत्या मे महिन्यात पाणी टंचाईशी सामना करावा लागणार अशी चिन्ह दिसू लागली आहेत.१५ जूनपर्यंतचा साठा?गेल्या काही वर्षांमध्ये जुलै ते आॅगस्ट महिन्यापर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शीळ धरणात असायचा. गेल्या पावसाळ्यात सुरूवातीला दोन महिने जोरदार पाऊस झाला. त्यावेळी धरण पूर्ण भरले. मात्र नंतरच्या काळात पाऊस कमी झाला. त्यामुळे घसरलेली पाणी पातळी भरून आली नाही. परिणामी यंदा पाणी संकट निर्माण झाले आहे. चिपळूण पाटबंधारे विभागाकडे असलेल्या या शीळ धरणामध्ये सध्या १.३१४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. हे पाणी येत्या १५ जूनपर्यंत पुरेल, असा अंदाज आहे. पाऊस उशिरा सुरू झाला तर आधीच टंचाई, कमी दाबाने पाणी व जलवाहिन्यांची गळती यामुळे पाणी टंचाईचे संकट अधिक गडद होण्याची भीती आहे.जलवाहिनी फुटण्याचे प्रकारसध्या वापरात असलेली मुख्य जलवाहिनी जागोजागी फुटत असल्याने दुरुस्ती करण्यातच वेळ वाया जात असल्याने पंपाद्वारे पाणी उपसा करण्यासाठी कमी वेळ उपलब्ध होत आहे. शहराअंतर्गत वितरण वाहिन्याही जुनाट झाल्याने सातत्याने नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे पाणी गळतीचे प्रमाण मोठे असून, गेल्या पाच वर्षांपासून कमी दाबाने पाणी पुरवठ्याची समस्या कायम आहे.दररोज टॅँकरच्या ५०-५५ फेºयाअपुºया पाणी पुरवठ्याची गंभीर स्थिती पाहता गेल्या तीन महिन्यांपासूनच १५ प्रभागांमध्ये टॅँकरने पाणी पुरवठा केला जातो. सध्या दररोज ५ टॅँकरद्वारे ५० ते ५५ फेºया करून शहरवासियांना पुरवठा केला जात आहे. तरीही टॅँकरद्वारे पाण्याची मागणी पूर्ण होत नसल्याचे दिसून येत आहे.