शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
3
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
4
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
7
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
8
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
9
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
10
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
11
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
12
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
13
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
14
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
15
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
16
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
17
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
18
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
19
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
20
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

रत्नागिरी शहरावर जलसंकटाचे काळे ढग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:38 IST

प्रकाश वराडकर । लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : रत्नागिरी शहराला दररोज १५ ते १६ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणीपुरवठा करणाऱ्या ...

प्रकाश वराडकर ।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : रत्नागिरी शहराला दररोज १५ ते १६ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणातील साठ्यात मोठी घसरण झाली आहे. हा पुरवठा १२ एमएलडीवर आला आहे. शीळ धरणातील साठा बाष्पीभवनामुळे आणखी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरावर जलसंकटाचे ढग जमू लागले आहे.शहराला शीळ धरणातून दररोज सुमारे १५ ते १६ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा केला जातो. पानवल धरणातून १ ते २ दशलक्ष लीटर पाणी पुरविले जाते. मात्र, पानवल धरण हे दरवर्षी फेब्रुवारी किवा मार्च महिन्यात कोरडे होते. त्यामुळे पानवलचा पुरवठा आधी बंद होतो. नाचणे तलावातूनही अर्धा ते एक एमएलडी पाणीपुरवठा होतो. सध्या पानवल व नाचणेचा पाणीपुरवठा बंद आहे.बाष्पीभवनाचे प्रमाण वाढणारसध्या शीळ धरणातून शहराला १२ एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जात आहे. शीळ धरणामध्ये कमी साठा असल्याने पाणी उपसा कमी करण्यात आला आहे. बाष्पीभवनामुळे शीळ धरणातील साठा येत्या काही दिवसात आणखी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांना येत्या मे महिन्यात पाणी टंचाईशी सामना करावा लागणार अशी चिन्ह दिसू लागली आहेत.१५ जूनपर्यंतचा साठा?गेल्या काही वर्षांमध्ये जुलै ते आॅगस्ट महिन्यापर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शीळ धरणात असायचा. गेल्या पावसाळ्यात सुरूवातीला दोन महिने जोरदार पाऊस झाला. त्यावेळी धरण पूर्ण भरले. मात्र नंतरच्या काळात पाऊस कमी झाला. त्यामुळे घसरलेली पाणी पातळी भरून आली नाही. परिणामी यंदा पाणी संकट निर्माण झाले आहे. चिपळूण पाटबंधारे विभागाकडे असलेल्या या शीळ धरणामध्ये सध्या १.३१४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. हे पाणी येत्या १५ जूनपर्यंत पुरेल, असा अंदाज आहे. पाऊस उशिरा सुरू झाला तर आधीच टंचाई, कमी दाबाने पाणी व जलवाहिन्यांची गळती यामुळे पाणी टंचाईचे संकट अधिक गडद होण्याची भीती आहे.जलवाहिनी फुटण्याचे प्रकारसध्या वापरात असलेली मुख्य जलवाहिनी जागोजागी फुटत असल्याने दुरुस्ती करण्यातच वेळ वाया जात असल्याने पंपाद्वारे पाणी उपसा करण्यासाठी कमी वेळ उपलब्ध होत आहे. शहराअंतर्गत वितरण वाहिन्याही जुनाट झाल्याने सातत्याने नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे पाणी गळतीचे प्रमाण मोठे असून, गेल्या पाच वर्षांपासून कमी दाबाने पाणी पुरवठ्याची समस्या कायम आहे.दररोज टॅँकरच्या ५०-५५ फेºयाअपुºया पाणी पुरवठ्याची गंभीर स्थिती पाहता गेल्या तीन महिन्यांपासूनच १५ प्रभागांमध्ये टॅँकरने पाणी पुरवठा केला जातो. सध्या दररोज ५ टॅँकरद्वारे ५० ते ५५ फेºया करून शहरवासियांना पुरवठा केला जात आहे. तरीही टॅँकरद्वारे पाण्याची मागणी पूर्ण होत नसल्याचे दिसून येत आहे.