शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

भाजपचा दावा तिन्ही मतदारसंघांवर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला पुनरुच्चार

By मनोज मुळ्ये | Updated: March 3, 2024 14:24 IST

सगळे पक्ष संपून भाजपला एकट्यालाच राहायचे आहे का, या शिवसेना नेते रामदास कदम यांच्या टीकेवर कोणतेही उत्तर न देता रत्नागिरी, रायगड आणि मावळ या तीनही मतदारसंघांवर भाजपचा दावा आहे, असे उद्गार गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना काढले.

रत्नागिरी : सगळे पक्ष संपून भाजपला एकट्यालाच राहायचे आहे का, या शिवसेना नेते रामदास कदम यांच्या टीकेवर कोणतेही उत्तर न देता रत्नागिरी, रायगड आणि मावळ या तीनही मतदारसंघांवर भाजपचा दावा आहे, असे उद्गार गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना काढले.

आपण कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी दौरा करत आहोत. कार्यकर्त्यांच्या मनातली भावना मी बोलून दाखवली आहे आणि ती वरिष्ठांपर्यंत पोहोचवणे हे माझे काम आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

भाजपने तिन्ही मतदारसंघांवर दावा केल्यानंतर शिवसेना नेते रामदास कदम यांनी लोटे येथील आपल्या सभेपूर्वी भाजपला फटकारले होते. रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघ शिवसेनेचा आहे. भाजपला सगळ्या पक्षांना संपवून एकट्यालाच शिल्लक राहायचे आहे का, असा प्रश्न रामदास कदम यांनी केला होता. त्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली असता मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, कोणी काय आरोप केले आहेत यात मी जात नाही. मी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा आणि भाजपचा प्रचार करण्यासाठी आलो आहे. कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत, ते मी मांडले आहे आणि ते मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवेन.

भाजपने लोकसभेच्या आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात महाराष्ट्रातील एकही नाव नाही, या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्राची बैठक अजून झालेली नाही. ती झाल्यानंतर दुसरी यादी जाहीर होईल. त्यामध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश असेल. अबकी बार ४०० पार असे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. मी केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा दौरा केला आहे. कार्यकर्त्यांचा, लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतचा प्रतिसाद पाहता ४०० पार ही गोष्ट अशक्य नाही, हेच लक्षात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

 मुख्यमंत्री सावंत यांनी रत्नागिरीतील कार्यकर्ता मेळाव्याला जाण्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना बंदी बनवून ठेवण्यात आलेली रत्नागिरीच्या विशेष कारागृहातील खोली पाहिली. याआधी आपण अंदमान येथील कोठडी पाहून तेथे नमन केले आहे. रत्नागिरीच्या कारागृहातील खोली तसेच जिथे सावरकर यांना स्थानबद्ध करून ठेवण्यात आले होते ती जागाही आपण पाहिली आणि तेथे वंदन केले आहे. अशी ठिकाणे राज्य आणि केंद्र सरकारने विशेष लक्ष देऊन संरक्षित केली पाहिजेत, असे आपल्याला वाटते आणि आपण तसे पत्र पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे माजी आमदार आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे सहप्रभारी बाळ माने हेही उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपा