शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

भाजपचा दावा तिन्ही मतदारसंघांवर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला पुनरुच्चार

By मनोज मुळ्ये | Updated: March 3, 2024 14:24 IST

सगळे पक्ष संपून भाजपला एकट्यालाच राहायचे आहे का, या शिवसेना नेते रामदास कदम यांच्या टीकेवर कोणतेही उत्तर न देता रत्नागिरी, रायगड आणि मावळ या तीनही मतदारसंघांवर भाजपचा दावा आहे, असे उद्गार गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना काढले.

रत्नागिरी : सगळे पक्ष संपून भाजपला एकट्यालाच राहायचे आहे का, या शिवसेना नेते रामदास कदम यांच्या टीकेवर कोणतेही उत्तर न देता रत्नागिरी, रायगड आणि मावळ या तीनही मतदारसंघांवर भाजपचा दावा आहे, असे उद्गार गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना काढले.

आपण कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी दौरा करत आहोत. कार्यकर्त्यांच्या मनातली भावना मी बोलून दाखवली आहे आणि ती वरिष्ठांपर्यंत पोहोचवणे हे माझे काम आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

भाजपने तिन्ही मतदारसंघांवर दावा केल्यानंतर शिवसेना नेते रामदास कदम यांनी लोटे येथील आपल्या सभेपूर्वी भाजपला फटकारले होते. रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघ शिवसेनेचा आहे. भाजपला सगळ्या पक्षांना संपवून एकट्यालाच शिल्लक राहायचे आहे का, असा प्रश्न रामदास कदम यांनी केला होता. त्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली असता मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, कोणी काय आरोप केले आहेत यात मी जात नाही. मी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा आणि भाजपचा प्रचार करण्यासाठी आलो आहे. कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत, ते मी मांडले आहे आणि ते मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवेन.

भाजपने लोकसभेच्या आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात महाराष्ट्रातील एकही नाव नाही, या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्राची बैठक अजून झालेली नाही. ती झाल्यानंतर दुसरी यादी जाहीर होईल. त्यामध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश असेल. अबकी बार ४०० पार असे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. मी केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा दौरा केला आहे. कार्यकर्त्यांचा, लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतचा प्रतिसाद पाहता ४०० पार ही गोष्ट अशक्य नाही, हेच लक्षात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

 मुख्यमंत्री सावंत यांनी रत्नागिरीतील कार्यकर्ता मेळाव्याला जाण्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना बंदी बनवून ठेवण्यात आलेली रत्नागिरीच्या विशेष कारागृहातील खोली पाहिली. याआधी आपण अंदमान येथील कोठडी पाहून तेथे नमन केले आहे. रत्नागिरीच्या कारागृहातील खोली तसेच जिथे सावरकर यांना स्थानबद्ध करून ठेवण्यात आले होते ती जागाही आपण पाहिली आणि तेथे वंदन केले आहे. अशी ठिकाणे राज्य आणि केंद्र सरकारने विशेष लक्ष देऊन संरक्षित केली पाहिजेत, असे आपल्याला वाटते आणि आपण तसे पत्र पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे माजी आमदार आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे सहप्रभारी बाळ माने हेही उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपा