शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
5
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
6
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
7
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
8
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
9
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
11
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
12
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
13
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
14
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
15
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
16
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
17
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
18
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
19
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
20
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!

रत्नागिरी, गुहागर व कणकवली-देवगड विधानसभेच्या जागेवर भाजप करणार दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 11:55 IST

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीनंतर भाजप, संघ परिवाराने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. या निवडणुकीत सेना - भाजप ...

ठळक मुद्देविधानसभेच्या जागेवर भाजप करणार दावारत्नागिरी, गुहागर व कणकवली-देवगड विधानसभा लढवाव्यात

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीनंतर भाजप, संघ परिवाराने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. या निवडणुकीत सेना - भाजप युती झाल्यास रत्नागिरी, गुहागर व कणकवली - देवगड हे युती म्हणून भाजपच्या वाटणीला आलेले विधानसभा मतदारसंघ भाजपने परत घ्यावेत. या जागा सर्वशक्तिनिशी लढवाव्यात, अशी मागणी येथील संघ परिवाराच्या समन्वय समितीच्या स्थानिक प्रमुखांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे भाजप या जागांवर दावा करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविल्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे भाजप व संघ परिवाराने लक्ष केंद्रीत केले आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेतील बदल, पक्ष विस्तार याबाबत विचार करून निर्णय घेण्यासाठी समन्वय समितीची ही बैठक रत्नागिरीत घेण्यात आली. या बैठकीला भाजपच्या सर्व विंग्जचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. या सभेचा अहवाल पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठविला जाणार आहे. मात्र, संघ परिवाराच्या समन्वय समितीच्या या सभेबाबत गुप्तता पाळण्यात येत आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप - सेना युती होती. राज्यात या युतीने घवघवीत यश संपादन केले आहे. आता विधानसभा निवडणुकीतही युती कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ शिवसेना व भाजप यांची युती होती. गेल्या लोकसभा निवडणुकीतही युती होती. मात्र, २०१४च्या विधानसभा निवडणुकीत युती तुटली. त्यामुळे सेना व भाजप उमेदवार निवडणुकीत आमने सामने उभे ठाकल्याने मतांचे विभाजन झाल्याचे पुढे आले.तरीही राज्याची सत्ता भाजप व सेनेकडेच आली. मात्र, त्यावेळच्या निवडणुकीत सेना - भाजपमध्ये टोकाचे आरोप झाले होते. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील कार्यकर्त्यांची मने दुखावली होती. यावेळी मात्र युती कायम ठेवण्याची भूमिका दोन्ही पक्षांकडून घेतली जात आहे. समन्वय समितीच्या या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. भाजप पदाधिकारी, कार्यकारिणी, विविध सेलचे प्रमुख पदाधिकारी यांचा कार्यकाल संपलेला आहे. मात्र, निवडणुका समोर असल्याने त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. पक्षांतर्गत निवडणुका आता विधानसभा निवडणुकीनंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.मात्र, पक्षसंघटनेत काही बदल करायचेच असतील तर संबंधितांची प्रभारी म्हणून निवड होऊ शकते, यावरही चर्चा झाली. त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. भाजप सर्वसमावेशक पक्ष म्हणून लोकांपुढे यावा, यासाठी प्रयत्न होणार आहेत. पक्ष संघटना अधिक भक्कम करण्यावर सभेत भर देण्यात आला. तसेच भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्याशी संबंधित कामांना जिल्ह्यात गती दिली जाणार आहे. या कामातून पक्ष संघटना मजबूत करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.रत्नागिरीकडे लक्षभाजप जिल्हाध्यक्ष ,जिल्हा सरचिटणीस, कार्यकारिणी सदस्य यांचा कार्यकाल संपलेला आहे. त्यामुळे या पदांवर कोणाची निवड होऊ शकते, याचा अंदाजही घेतला जात आहे. मात्र, या पदांवर विधानसभा निवडणूक झाल्यानंतरच निर्णय होणार आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत पक्षाचा कारभार त्यांच्याच माध्यमातून हाकला जाणार आहे.सेना जागा सोडणार?गेल्या विधानसभा निवडणुकीत सेना भाजप युती तुटली. त्यानंतर राष्ट्रवादीचे तत्कालिन आमदार उदय सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर सेनेतर्फे रत्नागिरीतून निवडणूक लढवून त्यांनी विजयही संपादन केला. यावेळी विधानसभेसाठी युती झाली तर मूळ भाजपच्या वाट्याची रत्नागिरी ही जागा असल्याने पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :BJPभाजपाRatnagiriरत्नागिरी