शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रत्नागिरी, गुहागर व कणकवली-देवगड विधानसभेच्या जागेवर भाजप करणार दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 11:55 IST

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीनंतर भाजप, संघ परिवाराने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. या निवडणुकीत सेना - भाजप ...

ठळक मुद्देविधानसभेच्या जागेवर भाजप करणार दावारत्नागिरी, गुहागर व कणकवली-देवगड विधानसभा लढवाव्यात

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीनंतर भाजप, संघ परिवाराने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. या निवडणुकीत सेना - भाजप युती झाल्यास रत्नागिरी, गुहागर व कणकवली - देवगड हे युती म्हणून भाजपच्या वाटणीला आलेले विधानसभा मतदारसंघ भाजपने परत घ्यावेत. या जागा सर्वशक्तिनिशी लढवाव्यात, अशी मागणी येथील संघ परिवाराच्या समन्वय समितीच्या स्थानिक प्रमुखांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे भाजप या जागांवर दावा करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविल्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे भाजप व संघ परिवाराने लक्ष केंद्रीत केले आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेतील बदल, पक्ष विस्तार याबाबत विचार करून निर्णय घेण्यासाठी समन्वय समितीची ही बैठक रत्नागिरीत घेण्यात आली. या बैठकीला भाजपच्या सर्व विंग्जचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. या सभेचा अहवाल पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठविला जाणार आहे. मात्र, संघ परिवाराच्या समन्वय समितीच्या या सभेबाबत गुप्तता पाळण्यात येत आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप - सेना युती होती. राज्यात या युतीने घवघवीत यश संपादन केले आहे. आता विधानसभा निवडणुकीतही युती कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ शिवसेना व भाजप यांची युती होती. गेल्या लोकसभा निवडणुकीतही युती होती. मात्र, २०१४च्या विधानसभा निवडणुकीत युती तुटली. त्यामुळे सेना व भाजप उमेदवार निवडणुकीत आमने सामने उभे ठाकल्याने मतांचे विभाजन झाल्याचे पुढे आले.तरीही राज्याची सत्ता भाजप व सेनेकडेच आली. मात्र, त्यावेळच्या निवडणुकीत सेना - भाजपमध्ये टोकाचे आरोप झाले होते. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील कार्यकर्त्यांची मने दुखावली होती. यावेळी मात्र युती कायम ठेवण्याची भूमिका दोन्ही पक्षांकडून घेतली जात आहे. समन्वय समितीच्या या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. भाजप पदाधिकारी, कार्यकारिणी, विविध सेलचे प्रमुख पदाधिकारी यांचा कार्यकाल संपलेला आहे. मात्र, निवडणुका समोर असल्याने त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. पक्षांतर्गत निवडणुका आता विधानसभा निवडणुकीनंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.मात्र, पक्षसंघटनेत काही बदल करायचेच असतील तर संबंधितांची प्रभारी म्हणून निवड होऊ शकते, यावरही चर्चा झाली. त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. भाजप सर्वसमावेशक पक्ष म्हणून लोकांपुढे यावा, यासाठी प्रयत्न होणार आहेत. पक्ष संघटना अधिक भक्कम करण्यावर सभेत भर देण्यात आला. तसेच भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्याशी संबंधित कामांना जिल्ह्यात गती दिली जाणार आहे. या कामातून पक्ष संघटना मजबूत करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.रत्नागिरीकडे लक्षभाजप जिल्हाध्यक्ष ,जिल्हा सरचिटणीस, कार्यकारिणी सदस्य यांचा कार्यकाल संपलेला आहे. त्यामुळे या पदांवर कोणाची निवड होऊ शकते, याचा अंदाजही घेतला जात आहे. मात्र, या पदांवर विधानसभा निवडणूक झाल्यानंतरच निर्णय होणार आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत पक्षाचा कारभार त्यांच्याच माध्यमातून हाकला जाणार आहे.सेना जागा सोडणार?गेल्या विधानसभा निवडणुकीत सेना भाजप युती तुटली. त्यानंतर राष्ट्रवादीचे तत्कालिन आमदार उदय सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर सेनेतर्फे रत्नागिरीतून निवडणूक लढवून त्यांनी विजयही संपादन केला. यावेळी विधानसभेसाठी युती झाली तर मूळ भाजपच्या वाट्याची रत्नागिरी ही जागा असल्याने पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :BJPभाजपाRatnagiriरत्नागिरी