शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

घड्याळाचा उमेदवार ही भाजपचीच सुपारी, उदय सामंत यांचा घणाघाती आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 17:05 IST

रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीत येथील काही लोकांनी हट्टाने भाजपची सुपारी घेऊन शिवसेनेतून आयात केलेल्या उमेदवाराला घड्याळ निशाणीवर उमेदवार म्हणून उभे केले आहे. मात्र, या निर्णयाशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा सुतराम संबंध नाही. भाजपचे चाणक्य व राष्ट्रवादीतील काही स्थानिकांचे हे षड्यंत्र रत्नागिरीतील जनता उधळून लावेल, असा दावा आमदार उदय सामंत यांनी केला.

ठळक मुद्देघड्याळाचा उमेदवार ही भाजपचीच सुपारी, उदय सामंत यांचा घणाघाती आरोपमुस्लिम मतांसाठी भाजपतील चाणक्यांनी राष्ट्रवादीला धरले हाताशी

रत्नागिरी : रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीत येथील काही लोकांनी हट्टाने भाजपची सुपारी घेऊन शिवसेनेतून आयात केलेल्या उमेदवाराला घड्याळ निशाणीवर उमेदवार म्हणून उभे केले आहे. मात्र, या निर्णयाशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा सुतराम संबंध नाही. भाजपचे चाणक्य व राष्ट्रवादीतील काही स्थानिकांचे हे षड्यंत्र रत्नागिरीतील जनता उधळून लावेल, असा दावा आमदार उदय सामंत यांनी केला.सामंत म्हणाले, रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शहरात मी, बंड्या साळवी आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी प्रचार करीत आहोत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जो महत्त्वाचा निर्णय घेतला आहे तो रत्नागिरीच्या लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यापुढील निवडणुका या महाविकास आघाडीतर्फे लढविल्या जातील, अशी चर्चा झाली आहे. परंतु काही लोकांच्या हट्टामुळे आमचा मित्रपक्ष राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या घड्याळ निशाणीवर लढतोय, हे दुर्दैवी आहे.राष्ट्रवादीचे नेते बशीर मुर्तुझा किंवा राष्ट्रवादीचा अन्य कोणताही उमेदवार नगराध्यक्ष निवडणुकीसाठी उभा राहिला असता तर आम्ही समजू शकलो असतो. परंतु मिलिंद कीर यांना शिवसेनेतून आयात करून त्यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे घड्याळ चिन्ह दिले आहे. याबाबत पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांना माहिती नाही. त्यामुळे हा उमेदवार राज्यस्तरीय नेत्यांना चुकीची माहिती देऊन उभा केलेला उमेदवार आहे. राष्ट्रवादीचा हा उमेदवार असताना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेवरच टीका करीत आहे.भाजप चाणक्याचे षड्यंत्र!भाजपमध्ये रत्नागिरीतही काही चाणक्य आहेत. त्यातीलच चाणक्याने राष्ट्रवादीकडून या उमेदवाराला घड्याळ निशाणी घ्यायला लावली आहे. शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या मुस्लिम मतदारांची मते मिळवणे, हा या षड्यंत्राचा भाग आहे. परंतु लोक ते यशस्वी होऊ देणार नाहीत, दावाही सामंत यांनी केला.शिवसेनेत यावे लागेलकाहीजण नगराध्यक्षपदाच्या या निवडणुकीत शिवसेनेच्या काळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत आहेत. हे आरोप सिध्द झाले तर शिवसेना यापुढे नगराध्यक्ष निवडणूक लढविणार नाही. मात्र, आरोप सिध्द झाले नाहीत तर आरोप करणाऱ्यांना शिवसेनेत यावे लागेल, असा टोलाही आमदार सामंत यांनी लगावला.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतRatnagiriरत्नागिरीShiv Senaशिवसेना