शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

तटरक्षक दलाच्या वर्धापनदिनानिमित्त रत्नागिरीत बाईक रॅली, कार्याबाबत केली जनजागृती

By शोभना कांबळे | Updated: January 20, 2024 17:11 IST

रत्नागिरी : भारतीय तटरक्षक दलाच्या वर्धापन दिनानिमित्त येथील कार्यालयाने गुरूवारी (दि. १९) रत्नागिरी आणि परिसरातून बाईक रॅलीचे आयोजन केले ...

रत्नागिरी : भारतीय तटरक्षक दलाच्या वर्धापन दिनानिमित्त येथील कार्यालयाने गुरूवारी (दि. १९) रत्नागिरी आणि परिसरातून बाईक रॅलीचे आयोजन केले होते. यात ४० स्वारांनी सहभाग घेतला. जनसामान्यांमध्ये तटरक्षक दलाच्या कार्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली.भारतीय तटरक्षक दल १ फेब्रुवारी २०२४ रोजी आपला ४८ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या दिनाच्या अनुषंगाने तटरक्षक दल विविध उपक्रम राबवित असते. याचाच एक भाग म्हणून आयोजित केलेली ही बाईक रॅली तटरक्षक दलाच्या प्रांगणापासुन सकाळी ८ वाजता सुरू झाली. वेतोशी येथील शिवार अॅग्रो टुरिजम ते आरे वारे मार्गे रत्नागिरी असा ४४ किलोमीटर अंतराच्या निर्धारित मार्गावरून ही रॅली काढण्यात आली.या रॅलीला तटरक्षक अवस्थान रत्नागिरीचे स्टेशन कमांडर उपमहानिर्देशक शत्रूजीत सिंग यांनी हिरवा झेंडा दाखवला. तटरक्षक दलाच्या जवानांबरोबरच रत्नागिरी शहरातील हॉर्समेन या मोटर बाईकिंग ग्रुपच्या सदस्यांनी देखील या रॅलीमध्ये समावेश घेतला. या ग्रुपचे मिलिंद पाटकर, अंकिता पाटकर, फतीन वस्ता, मयूरेश यादव व स्वप्नील रसाळ यांच्यासह सुमारे ४० बाईक राईडर्सनी या रॅलीत सहभाग घेतला.वेतोशी येथील शिवार अॅग्रो टुरिजम येथे या रॅलीत सहभागी सदस्यांना तटरक्षक दलाचे कार्य आणि त्यात भरती होण्यासाठी आवश्यक प्रक्रिया याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच तेथे शिवार अॅग्रो टुरिजमचे प्रवर्तक अशोक साळुंखे व पराग साळुंखे यांनी त्यांच्या या प्रकल्पाची आणि तेथील सोयी सुविधांची माहिती रॅलीत सहभागी झालेल्या सर्व सदस्यांना दिली. त्यानंतर आरे वारे मार्गे रत्नागिरी येथील तटरक्षक दलाच्या प्रांगणात परत येऊन या बाईक रॅलीची ११ वाजता सांगता झाली.रॅलीला मार्गक्रमण करण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांचे सहकार्य लाभले. या रॅलीचा उद्देश जनसामान्यांमध्ये तटरक्षक दलाच्या कार्याबद्दल जागरूकता निर्माण करणे, बाईक पर्यटनाबद्दल प्रेरणा देणे आणि वाहतुकीचे नियम पाळण्याच्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा होता.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी