शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Conflict: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
2
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
3
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
4
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
5
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
6
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
7
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
8
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
9
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
10
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
11
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
12
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
13
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
14
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
15
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
16
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
17
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
18
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
19
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
20
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश

रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक पुनर्बांधणीचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 16:29 IST

ग्रामीण भागातील जीवनवाहिनी ठरलेली एस. टी. चालवण्याचे महत्वपूर्ण काम चालक, वाहक करीत आहेत. सध्या रस्ते खराब असल्यामुळे ग्रामीण भागात काहीवेळा चालक एस. टी. घालण्यास तयार होत नाहीत. परंतु यामुळे विद्यार्थीवर्गाचे नुकसान होण्याची शक्यता असते.

ठळक मुद्देरत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक पुनर्बांधणीचे भूमिपूजनएसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडविण्यास प्रयत्नशील

रत्नागिरी : ग्रामीण भागातील जीवनवाहिनी ठरलेली एस. टी. चालवण्याचे महत्वपूर्ण काम चालक, वाहक करीत आहेत. सध्या रस्ते खराब असल्यामुळे ग्रामीण भागात काहीवेळा चालक एस. टी. घालण्यास तयार होत नाहीत. परंतु यामुळे विद्यार्थीवर्गाचे नुकसान होण्याची शक्यता असते.

प्रवाशांना सौजन्याची वागणूक मिळणे अपेक्षित आहे. कर्मचाऱ्यांनीही एकसंघ राहून शासनाच्या सोयीसुविधा मिळविणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या सोडविण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी केले.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक पुनर्बांधणीचे भूमिपूजन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, म्हाडाचे अध्यक्ष, आमदार उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपा साळवी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, नगराध्यक्ष राहुल पंडित, नगरसेविका शिल्पा सुर्वे, नगरसेवक बंड्या साळवी, राजेंद्र महाडिक, विभाग नियंत्रक अनिल मेहतर, यंत्र अभियंता चालन विजय दिवटे आदी मान्यवर उपस्थित होते.ग्रामीण भागातील रस्ते चांगले राहावेत, यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनांसारख्या योजनांतून ८ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम करण्यात येत असल्याचे सांगितले. परिवहन मंत्री रावते यांच्या संकल्पनेतून शासकीय निधीतून रत्नागिरी बसस्थानक १० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत आहे. लवकरच लांजा बसस्थानकाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.खासदार विनायक राऊत यांनी मार्गदर्शन करताना रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्लक्षित बसस्थानके उभारण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ३५ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. अत्याधुनिक सुविधांसह उभारण्यात येणारे रत्नागिरी बसस्थानक भविष्यात माईल स्टोन ठरणार आहे.

महामंडळाचा कर्मचारी शासकीय कर्मचारी व्हावा, अशीच लोकप्रतिनिधींची मागणी आहे. शिल्लक बसस्थानकांनाही निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन राऊत यांनी दिले. मुंबई प्रादेशिक मंडळाचे कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांनी बसस्थानकाची रूपरेषा स्पष्ट केली. सूत्रसंचालन राजलक्ष्मी सुर्वे यांनी केले.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळRatnagiriरत्नागिरी