शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक पुनर्बांधणीचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 16:29 IST

ग्रामीण भागातील जीवनवाहिनी ठरलेली एस. टी. चालवण्याचे महत्वपूर्ण काम चालक, वाहक करीत आहेत. सध्या रस्ते खराब असल्यामुळे ग्रामीण भागात काहीवेळा चालक एस. टी. घालण्यास तयार होत नाहीत. परंतु यामुळे विद्यार्थीवर्गाचे नुकसान होण्याची शक्यता असते.

ठळक मुद्देरत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक पुनर्बांधणीचे भूमिपूजनएसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडविण्यास प्रयत्नशील

रत्नागिरी : ग्रामीण भागातील जीवनवाहिनी ठरलेली एस. टी. चालवण्याचे महत्वपूर्ण काम चालक, वाहक करीत आहेत. सध्या रस्ते खराब असल्यामुळे ग्रामीण भागात काहीवेळा चालक एस. टी. घालण्यास तयार होत नाहीत. परंतु यामुळे विद्यार्थीवर्गाचे नुकसान होण्याची शक्यता असते.

प्रवाशांना सौजन्याची वागणूक मिळणे अपेक्षित आहे. कर्मचाऱ्यांनीही एकसंघ राहून शासनाच्या सोयीसुविधा मिळविणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या सोडविण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी केले.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक पुनर्बांधणीचे भूमिपूजन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, म्हाडाचे अध्यक्ष, आमदार उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपा साळवी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, नगराध्यक्ष राहुल पंडित, नगरसेविका शिल्पा सुर्वे, नगरसेवक बंड्या साळवी, राजेंद्र महाडिक, विभाग नियंत्रक अनिल मेहतर, यंत्र अभियंता चालन विजय दिवटे आदी मान्यवर उपस्थित होते.ग्रामीण भागातील रस्ते चांगले राहावेत, यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनांसारख्या योजनांतून ८ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम करण्यात येत असल्याचे सांगितले. परिवहन मंत्री रावते यांच्या संकल्पनेतून शासकीय निधीतून रत्नागिरी बसस्थानक १० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत आहे. लवकरच लांजा बसस्थानकाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.खासदार विनायक राऊत यांनी मार्गदर्शन करताना रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्लक्षित बसस्थानके उभारण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ३५ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. अत्याधुनिक सुविधांसह उभारण्यात येणारे रत्नागिरी बसस्थानक भविष्यात माईल स्टोन ठरणार आहे.

महामंडळाचा कर्मचारी शासकीय कर्मचारी व्हावा, अशीच लोकप्रतिनिधींची मागणी आहे. शिल्लक बसस्थानकांनाही निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन राऊत यांनी दिले. मुंबई प्रादेशिक मंडळाचे कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांनी बसस्थानकाची रूपरेषा स्पष्ट केली. सूत्रसंचालन राजलक्ष्मी सुर्वे यांनी केले.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळRatnagiriरत्नागिरी