शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

भास्कर जाधव मला अजूनही आशीर्वाद द्यायला तयार नाहीत! पालकमंत्री उदय सामंतांची कोपरखळी

By संदीप बांद्रे | Updated: August 16, 2023 05:23 IST

निमित्त होते ते चिपळुणातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याचे!

संदीप बांद्रे / चिपळूण : एखाद्या अधिकाऱ्याने चांगले काम केले की लोकप्रतिनिधी सुद्धा यशस्वी ठरतो. चांगला अधिकारी मिळवण्याचे कौशल्य आमदार भास्कर जाधव यांच्याकडे आहे. याबाबत त्यांचे म्हणावे तेवढे कौतुक कमीच आहे. त्यांचा आशीर्वाद अनेकांना मिळतो, पण मला ते आशीर्वाद द्यायला तयार नाहीत, अशा शब्दात पालकमंत्री उदय सामंत यांनी कोपरखळी मारताच सभागृहात एकच हश्या पिकला. निमित्त होते ते चिपळुणातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याचे!

येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे १८ वर्षांनंतर नूतनीकरण होऊन मंगळवारी स्वातंत्र्यदिनी त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री उदय सामंत, माजी पालकमंत्री आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, जिल्हाप्रमुख सचिन कदम हे एका व्यासपीठावर होते. या संपूर्ण कार्यक्रमात एकापेक्षा टोलेबाजी   प्रांताधिकारी आकाश लिगाडे,मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रसाद शिंगटे, यांच्यासह अनेक राजकीय व अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, आमदार भास्कर जाधव यांना मी धन्यवाद देतो, की त्यांनी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या सारखा अधिकारी या जिल्ह्यात आणला. त्यांनी गुहागरमध्ये आणून त्यांना ट्रेंनिग दिली आणि ते चिपळूणमध्ये आले. त्यामुळेच फक्त ७५ दिवसात त्यांनी नाट्यगृहाचे काम पूर्ण झाले. भास्कर जाधव यांनी त्यांना आशीर्वाद दिला, पण मला ते अजूनही आशीर्वाद द्यायला तयार नाहीत, अशी कोपरखळी मारली. एवढेच नव्हे तर सामंत हे आमदार शेखर निकम यांच्या विषयी म्हणाले की, हल्ली निकम जास्तच मूडमध्ये आहेत. त्यांनी काही विषय माझ्या कानात सांगतीलेत. पण या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी शब्द देतो. तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यास मी कटिबद्ध आहे. शेखर निकमांनी फार उशीर केला. अगोदरच आमच्या बरोबर आले असते, तर यापूर्वीच मागण्या पूर्ण झाल्या असत्या. ही त्यांची व अजित दादांची चूक आहे मी काय करू, असा टोला लगावताच पुन्हा नाट्यगृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. 

आमदार भास्कर जाधव यांनीही जोरदार फटकेबाजी केली. चिपळूणचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांचा गुहागरचा शिक्षक मीच होतो, एवढेच नव्हे तर रत्नागिरीचे आताचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांना चांगला अधिकारी म्हणून चिपळूण तहसीलदारपदी आणणारा देखील मीच होतो, हे नमूद करण्यास देखील ते विसरले नाहीत. यानंतर आमदार शेखर निकम यांनी तर धमालच उडवून दिली. सर्वात मोठे कलाकार तर आम्हीच आहोत. आम्ही कधी शत्रू, तर कधी मित्र होतो हे कोणालाच कळत नाही, असे बोलताच सभागृहात एकच हश्या पिकला.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतBhaskar Jadhavभास्कर जाधव