शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

खरा भारत समजण्यासाठी पायी भारतभ्रमण- डोंबिवलीचे ज्येष्ठ नागरिक विद्याधर भुस्कुटे यांचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 14:34 IST

भारताच्या सशक्तीकरणासाठी आवश्यक, शांती, मानवता, पर्यावरण, संस्कार व स्त्रीभृण हत्या या २१ व्या शतकातील पंचमहाभूतावर आधारित, साबरमती आश्रम (गुजरात) - कन्याकुमारी ते शांती निकेतन (कलकत्ता)  असा समुद्र किनारालगतचा भारत पदयात्रेतून पूर्ण करण्याचा संकल्प डोंबिवलीचे ज्येष्ठ नागरिक विद्याधर भुस्कुटे

ठळक मुद्देमहात्मा गांधी-स्वामी विवेकानंद स्मारक (कुन्याकुमारी) व शांती निकेतन रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारांवर चालणारा भारत त्यांना जवळून पहायचा आहे

चिपळूण : भारताच्या सशक्तीकरणासाठी आवश्यक, शांती, मानवता, पर्यावरण, संस्कार व स्त्रीभृण हत्या या २१ व्या शतकातील पंचमहाभूतावर आधारित, साबरमती आश्रम (गुजरात) - कन्याकुमारी ते शांती निकेतन (कलकत्ता)  असा समुद्र किनारालगतचा भारत पदयात्रेतून पूर्ण करण्याचा संकल्प डोंबिवलीचे ज्येष्ठ नागरिक विद्याधर भुस्कुटे (६७) यांनी केला आहे. चालत भारतभ्रमण केल्यास खरा भारत समजेल या भावनेतून त्यांनी हा प्रवास सुरू केला आहे.

 

दि.३१ आॅक्टोबर रोजी त्यांनी साबरमती आश्रमातून पदयात्रेस प्रारंभ केला आहे. दि.१७ नोव्हेंबरला त्यांनी महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. मनोर-वसई-घोडबंदर-ठाणे-पनवेल-पेण- वडखळ-नागोठणे-इंदापूर-माणगांव-महाड-भरणा नाका-चिपळूण-संगमेश्वर-हातखंबा तिठा-राजापूर-कुडाळ-सावंतवाडी व त्यानंतर गोव्यात ते प्रवेश करणार आहेत. सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी काश्मिर ते कन्याकुमारी असे ४ हजार ५०० किमी अंतर चालून पूर्ण केले.

 

 ६३ व्या वर्षी या पदयात्रेतील अनुभवांवर आधारित एक पुस्तक लिहिले व प्रकाशित केले. ६४ व्या वर्षी किबीतू (अरुणाचल प्रदेश) ते पोरबंदर (गुजरात) अशी ४ हजार २०० किमीची पदयात्रा पूर्ण केली व त्या पदयात्रेच्या अनुभवावर आधारित पुस्तक ६५ व्या वर्षी प्रकाशित केले. एक वर्षाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा वयाच ६७ व्या वर्षी भारताचा समुद्र किनारा व त्याहून महत्त्वाचे साबरमती आश्रम (गुजरात) महात्मा गांधी-स्वामी विवेकानंद स्मारक (कुन्याकुमारी) व शांती निकेतन रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारांवर चालणारा भारत त्यांना जवळून पहायचा आहे. 

टॅग्स :IndiaभारतRatnagiriरत्नागिरी