शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या बलाढ्य सैन्याला, सशस्त्र दलांना, गुप्तचर संस्थांना आणि शास्त्रज्ञांना सलाम- पंतप्रधान मोदी
3
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
4
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
5
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
6
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
7
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
8
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
9
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
10
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
11
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
12
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
13
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
14
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
15
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
16
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
17
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
18
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
19
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
20
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा

खरा भारत समजण्यासाठी पायी भारतभ्रमण- डोंबिवलीचे ज्येष्ठ नागरिक विद्याधर भुस्कुटे यांचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 14:34 IST

भारताच्या सशक्तीकरणासाठी आवश्यक, शांती, मानवता, पर्यावरण, संस्कार व स्त्रीभृण हत्या या २१ व्या शतकातील पंचमहाभूतावर आधारित, साबरमती आश्रम (गुजरात) - कन्याकुमारी ते शांती निकेतन (कलकत्ता)  असा समुद्र किनारालगतचा भारत पदयात्रेतून पूर्ण करण्याचा संकल्प डोंबिवलीचे ज्येष्ठ नागरिक विद्याधर भुस्कुटे

ठळक मुद्देमहात्मा गांधी-स्वामी विवेकानंद स्मारक (कुन्याकुमारी) व शांती निकेतन रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारांवर चालणारा भारत त्यांना जवळून पहायचा आहे

चिपळूण : भारताच्या सशक्तीकरणासाठी आवश्यक, शांती, मानवता, पर्यावरण, संस्कार व स्त्रीभृण हत्या या २१ व्या शतकातील पंचमहाभूतावर आधारित, साबरमती आश्रम (गुजरात) - कन्याकुमारी ते शांती निकेतन (कलकत्ता)  असा समुद्र किनारालगतचा भारत पदयात्रेतून पूर्ण करण्याचा संकल्प डोंबिवलीचे ज्येष्ठ नागरिक विद्याधर भुस्कुटे (६७) यांनी केला आहे. चालत भारतभ्रमण केल्यास खरा भारत समजेल या भावनेतून त्यांनी हा प्रवास सुरू केला आहे.

 

दि.३१ आॅक्टोबर रोजी त्यांनी साबरमती आश्रमातून पदयात्रेस प्रारंभ केला आहे. दि.१७ नोव्हेंबरला त्यांनी महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. मनोर-वसई-घोडबंदर-ठाणे-पनवेल-पेण- वडखळ-नागोठणे-इंदापूर-माणगांव-महाड-भरणा नाका-चिपळूण-संगमेश्वर-हातखंबा तिठा-राजापूर-कुडाळ-सावंतवाडी व त्यानंतर गोव्यात ते प्रवेश करणार आहेत. सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी काश्मिर ते कन्याकुमारी असे ४ हजार ५०० किमी अंतर चालून पूर्ण केले.

 

 ६३ व्या वर्षी या पदयात्रेतील अनुभवांवर आधारित एक पुस्तक लिहिले व प्रकाशित केले. ६४ व्या वर्षी किबीतू (अरुणाचल प्रदेश) ते पोरबंदर (गुजरात) अशी ४ हजार २०० किमीची पदयात्रा पूर्ण केली व त्या पदयात्रेच्या अनुभवावर आधारित पुस्तक ६५ व्या वर्षी प्रकाशित केले. एक वर्षाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा वयाच ६७ व्या वर्षी भारताचा समुद्र किनारा व त्याहून महत्त्वाचे साबरमती आश्रम (गुजरात) महात्मा गांधी-स्वामी विवेकानंद स्मारक (कुन्याकुमारी) व शांती निकेतन रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारांवर चालणारा भारत त्यांना जवळून पहायचा आहे. 

टॅग्स :IndiaभारतRatnagiriरत्नागिरी