शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
2
'ऑपरेशन सिंदूर' हा फक्त ट्रेलर होता', लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला उघड इशारा, दिल्ली स्फोटानंतर लष्कर सज्ज
3
मोबाईलवर मिनिटांत तपासा तुमचा NPS बॅलन्स; पाहा NSDL, उमंग ॲप आणि मिस्ड कॉलची सोपी पद्धत
4
ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर...
5
फलटणमध्ये महायुतीतच 'खेळ'! शिंदेंच्या शिवसेनेकडून रामराजेंचा मुलगा, भाजपाकडून माजी खासदारांचा भाऊ मैदानात
6
बांगलादेश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या? 
7
Delhi Blast: दिल्लीत स्फोट घडवण्यासाठी किती पैसे दिले गेले होते, डॉ. शाहीनची काय होती भूमिका?
8
बँकिंग शेअर्समध्ये ऐतिहासिक तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जोरदार वाढ; 'ही' आहेत प्रमुख ४ कारणं
9
किरकोळ गुंतवणूकदारांनी 'या' १० शेअर्समध्ये टाकले ₹१८,००० कोटी! सुजलॉन त्यापैकी एक, आणखी नावं कोणती?
10
DIY Tips: ड्राय क्लीनिंगचा खर्च वाचवा! कपड्यांवरील चिवट डाग काढण्यासाठी 'हा' घरगुती फॉर्म्युला वापरा 
11
"राहुल गांधी पंतप्रधान होवोत अथवा न होवोत, आमचा हेतू...!" बिहार निवडणुकीसंदर्भात बोलताना काय म्हणाले रॉबर्ट वाड्रा? 
12
क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! बिटकॉइन १५ लाख तर इथर १.३५ लाखानं कोसळला; ही आहेत कारणं
13
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
14
MLA Disqualification Case: 'आमदारांचं प्रकरण दोन आठवड्यात निकाली काढा, नाहीतर...'; सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांवर संतापले
15
दिल्ली स्फोट तपास: कोडवर्ड, 'वुल्फ आवर' आणि महिला दहशतवाद्यांचे 'ऑरोरा-लूना' पथक!
16
ओवेसींच्या पाठिंब्यामुळे प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत मारली बाजी, कोण आहेत काँग्रेसचे आमदार नवीन यादव?
17
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
18
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
19
Gold & Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; Gold २ हजारांपेक्षा अधिकनं झालं स्वस्त, Silver मध्ये ६५०० ची घसरण
Daily Top 2Weekly Top 5

खरा भारत समजण्यासाठी पायी भारतभ्रमण- डोंबिवलीचे ज्येष्ठ नागरिक विद्याधर भुस्कुटे यांचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 14:34 IST

भारताच्या सशक्तीकरणासाठी आवश्यक, शांती, मानवता, पर्यावरण, संस्कार व स्त्रीभृण हत्या या २१ व्या शतकातील पंचमहाभूतावर आधारित, साबरमती आश्रम (गुजरात) - कन्याकुमारी ते शांती निकेतन (कलकत्ता)  असा समुद्र किनारालगतचा भारत पदयात्रेतून पूर्ण करण्याचा संकल्प डोंबिवलीचे ज्येष्ठ नागरिक विद्याधर भुस्कुटे

ठळक मुद्देमहात्मा गांधी-स्वामी विवेकानंद स्मारक (कुन्याकुमारी) व शांती निकेतन रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारांवर चालणारा भारत त्यांना जवळून पहायचा आहे

चिपळूण : भारताच्या सशक्तीकरणासाठी आवश्यक, शांती, मानवता, पर्यावरण, संस्कार व स्त्रीभृण हत्या या २१ व्या शतकातील पंचमहाभूतावर आधारित, साबरमती आश्रम (गुजरात) - कन्याकुमारी ते शांती निकेतन (कलकत्ता)  असा समुद्र किनारालगतचा भारत पदयात्रेतून पूर्ण करण्याचा संकल्प डोंबिवलीचे ज्येष्ठ नागरिक विद्याधर भुस्कुटे (६७) यांनी केला आहे. चालत भारतभ्रमण केल्यास खरा भारत समजेल या भावनेतून त्यांनी हा प्रवास सुरू केला आहे.

 

दि.३१ आॅक्टोबर रोजी त्यांनी साबरमती आश्रमातून पदयात्रेस प्रारंभ केला आहे. दि.१७ नोव्हेंबरला त्यांनी महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. मनोर-वसई-घोडबंदर-ठाणे-पनवेल-पेण- वडखळ-नागोठणे-इंदापूर-माणगांव-महाड-भरणा नाका-चिपळूण-संगमेश्वर-हातखंबा तिठा-राजापूर-कुडाळ-सावंतवाडी व त्यानंतर गोव्यात ते प्रवेश करणार आहेत. सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी काश्मिर ते कन्याकुमारी असे ४ हजार ५०० किमी अंतर चालून पूर्ण केले.

 

 ६३ व्या वर्षी या पदयात्रेतील अनुभवांवर आधारित एक पुस्तक लिहिले व प्रकाशित केले. ६४ व्या वर्षी किबीतू (अरुणाचल प्रदेश) ते पोरबंदर (गुजरात) अशी ४ हजार २०० किमीची पदयात्रा पूर्ण केली व त्या पदयात्रेच्या अनुभवावर आधारित पुस्तक ६५ व्या वर्षी प्रकाशित केले. एक वर्षाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा वयाच ६७ व्या वर्षी भारताचा समुद्र किनारा व त्याहून महत्त्वाचे साबरमती आश्रम (गुजरात) महात्मा गांधी-स्वामी विवेकानंद स्मारक (कुन्याकुमारी) व शांती निकेतन रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारांवर चालणारा भारत त्यांना जवळून पहायचा आहे. 

टॅग्स :IndiaभारतRatnagiriरत्नागिरी