शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
3
काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
4
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
5
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
6
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
7
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
8
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
9
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
10
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
11
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
12
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
13
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
14
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
15
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
16
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
17
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
18
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
19
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
20
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी

सावधान, अपुऱ्या झोपेमुळे रोगप्रतिकारशक्तीही खालावते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शांत आणि पुरेशी झोप ही निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यक्तीची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शांत आणि पुरेशी झोप ही निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यक्तीची झोप अपुरी होऊ लागली आहे. त्यातच सध्या अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर राहण्यामुळे झोप गायब झाली आहे. मात्र, अपुऱ्या झोपेमुळे विविध आजार बळावत असून व्यक्तीची रोगप्रतिकारशक्तीही कमी होऊ लागली आहे.

सर्वसाधारणपणे लहान मुलांना १० ते १२ तास तर प्राैढांना किमान ६ ते ८ तास झोपेची गरज असते. मात्र, सध्या नोकरी-धंद्यानिमित्त दगदग वाढल्याने झोप अपुरी होऊ लागली आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीही कमी होत आहे.

अपुऱ्या झाेपेचे ताेटे

झोप अपुरी झाली तर उत्साह कमी होतो आणि करताना मरगळ जाणवते. सुस्तपणा वाढतो.

झोप मिळाली नाही तर रक्तदाब, मधुमेह यासारखे विकार वाढतात.

अपुऱ्या झोपेमुळे व्यक्तीची स्मरणशक्ती कमी होते.

राेगप्रतिकार शक्ती आपल्या शरीराची ढाल...

व्यक्तीची रोग प्रतिकारशक्ती कमी असेल तर त्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. कुठल्याही आजाराचा संसर्ग लगेचच होतो. संतुलित आहार, पुरेशी निद्रा आणि व्यायाम त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते.

संतुलित आहार आणि व्यायाम आवश्यक

निराेगी आयुष्यासाठी व्यक्तीला पुरेशी झोप त्याचबरोबर संतुलित आहार आणि नेहमी व्यायाम आवश्यक आहे. परंतु सध्या बैठे काम, कामाचा ताण आणि बाहेरील खाणे यामुळे व्यक्तीची दिनचर्या बदलली आहे. यामुळे कमी वयातच मधुमेह, रक्तदाबासारखे विकार जडू लागले आहेत. त्यांना दूर ठेवण्यासाठी योग्य आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप गरजेची आहे.

किमान सहा तास झाेप आवश्यक डाॅक्टरांच्या मते, आरोग्य चांगले रहाण्यासाठी व्यक्तीला किमान सहा तासांची शांत झोप मिळणे गरजेचे असते. अपुरी झोप झाल्यास दिवसभर निरूत्साह जाणवतो. थकवा जाणवतो. त्याचबरोबर रक्तदाब, डोळ्यांचे विकार वाढतात. व्यक्तीला भविष्यात निद्रानाशासारख्या आजाराला सामोरे जावे लागते. त्यामुळे आरोग्य चांगले रहाण्यासाठी पुरेशी झोप घ्यावी.

चांगली झोप झाल्यास व्यक्तीचे आरोग्य उत्तम रहाते. त्यासाठी योग्य वेळेत झोपणे आणि सकाळीही वेळेत झोपणे आवश्यक असते. अवेळी झोपही आजाराला आमंत्रण देणारी असते. अधिक झोप झाली तर वजन वाढते. झोपेबरोबरच सकस आहार आणि नियमित व्यायामही गरजेचा असतो. ही त्रिसुत्री जपल्यास व्यक्तीचे आरोग्य चांगले रहाते.

- डाॅ. कल्पना मेहता, आहारतज्ज्ञ, रत्नागिरी.