शहरं
Join us  
Trending Stories
1
फिलीपींसमध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या
2
RBI MPC Policy Live: दिवाळीत कर्ज महागच! EMI कमी होण्याची वाट पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास; रेपो दर 'जैसे थे'
3
Asia Cup 2025: ' ट्रॉफी पाहिजे तर...',  बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट...
4
७५ वर्षाचा नवरदेव अन् ३५ वर्षाची नवरी; लग्नाच्या रात्रीच वृद्ध पतीचा मृत्यू, घातपाताचा संशय
5
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनची वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
6
बनावट नोटाचा 'बाजार'; कोणत्या राज्यात सर्वाधिक छपाई, महाराष्ट्रा कोणत्या गुन्ह्यांमध्ये पहिला?
7
आजपासून UPI पेमेंटचं महत्त्वाचं फीचर बंद; आता थेट पैसे मागता येणार नाहीत!
8
दुसऱ्यांदा आई होणार सोनम कपूर? 'वायू'च्या जन्मानंतर कुटुंबात पुन्हा चिमुकल्या पाहुण्याची चाहुल
9
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
10
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
11
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल
12
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिस शोधायला गेले...
13
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं
14
RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी
15
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
16
'कल्कि २' मधून बाहेर पडल्यानंतर दीपिका पादुकोणचं मोठं वक्तव्य; म्हणाली- 'मी नेहमी माझ्या अटींवर...'
17
"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
18
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
19
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
20
"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील

सावधान, अपुऱ्या झोपेमुळे रोगप्रतिकारशक्तीही खालावते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शांत आणि पुरेशी झोप ही निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यक्तीची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शांत आणि पुरेशी झोप ही निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यक्तीची झोप अपुरी होऊ लागली आहे. त्यातच सध्या अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर राहण्यामुळे झोप गायब झाली आहे. मात्र, अपुऱ्या झोपेमुळे विविध आजार बळावत असून व्यक्तीची रोगप्रतिकारशक्तीही कमी होऊ लागली आहे.

सर्वसाधारणपणे लहान मुलांना १० ते १२ तास तर प्राैढांना किमान ६ ते ८ तास झोपेची गरज असते. मात्र, सध्या नोकरी-धंद्यानिमित्त दगदग वाढल्याने झोप अपुरी होऊ लागली आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीही कमी होत आहे.

अपुऱ्या झाेपेचे ताेटे

झोप अपुरी झाली तर उत्साह कमी होतो आणि करताना मरगळ जाणवते. सुस्तपणा वाढतो.

झोप मिळाली नाही तर रक्तदाब, मधुमेह यासारखे विकार वाढतात.

अपुऱ्या झोपेमुळे व्यक्तीची स्मरणशक्ती कमी होते.

राेगप्रतिकार शक्ती आपल्या शरीराची ढाल...

व्यक्तीची रोग प्रतिकारशक्ती कमी असेल तर त्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. कुठल्याही आजाराचा संसर्ग लगेचच होतो. संतुलित आहार, पुरेशी निद्रा आणि व्यायाम त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते.

संतुलित आहार आणि व्यायाम आवश्यक

निराेगी आयुष्यासाठी व्यक्तीला पुरेशी झोप त्याचबरोबर संतुलित आहार आणि नेहमी व्यायाम आवश्यक आहे. परंतु सध्या बैठे काम, कामाचा ताण आणि बाहेरील खाणे यामुळे व्यक्तीची दिनचर्या बदलली आहे. यामुळे कमी वयातच मधुमेह, रक्तदाबासारखे विकार जडू लागले आहेत. त्यांना दूर ठेवण्यासाठी योग्य आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप गरजेची आहे.

किमान सहा तास झाेप आवश्यक डाॅक्टरांच्या मते, आरोग्य चांगले रहाण्यासाठी व्यक्तीला किमान सहा तासांची शांत झोप मिळणे गरजेचे असते. अपुरी झोप झाल्यास दिवसभर निरूत्साह जाणवतो. थकवा जाणवतो. त्याचबरोबर रक्तदाब, डोळ्यांचे विकार वाढतात. व्यक्तीला भविष्यात निद्रानाशासारख्या आजाराला सामोरे जावे लागते. त्यामुळे आरोग्य चांगले रहाण्यासाठी पुरेशी झोप घ्यावी.

चांगली झोप झाल्यास व्यक्तीचे आरोग्य उत्तम रहाते. त्यासाठी योग्य वेळेत झोपणे आणि सकाळीही वेळेत झोपणे आवश्यक असते. अवेळी झोपही आजाराला आमंत्रण देणारी असते. अधिक झोप झाली तर वजन वाढते. झोपेबरोबरच सकस आहार आणि नियमित व्यायामही गरजेचा असतो. ही त्रिसुत्री जपल्यास व्यक्तीचे आरोग्य चांगले रहाते.

- डाॅ. कल्पना मेहता, आहारतज्ज्ञ, रत्नागिरी.