शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

सावधान, अपुऱ्या झोपेमुळे रोगप्रतिकारशक्तीही खालावते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शांत आणि पुरेशी झोप ही निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यक्तीची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शांत आणि पुरेशी झोप ही निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यक्तीची झोप अपुरी होऊ लागली आहे. त्यातच सध्या अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर राहण्यामुळे झोप गायब झाली आहे. मात्र, अपुऱ्या झोपेमुळे विविध आजार बळावत असून व्यक्तीची रोगप्रतिकारशक्तीही कमी होऊ लागली आहे.

सर्वसाधारणपणे लहान मुलांना १० ते १२ तास तर प्राैढांना किमान ६ ते ८ तास झोपेची गरज असते. मात्र, सध्या नोकरी-धंद्यानिमित्त दगदग वाढल्याने झोप अपुरी होऊ लागली आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीही कमी होत आहे.

अपुऱ्या झाेपेचे ताेटे

झोप अपुरी झाली तर उत्साह कमी होतो आणि करताना मरगळ जाणवते. सुस्तपणा वाढतो.

झोप मिळाली नाही तर रक्तदाब, मधुमेह यासारखे विकार वाढतात.

अपुऱ्या झोपेमुळे व्यक्तीची स्मरणशक्ती कमी होते.

राेगप्रतिकार शक्ती आपल्या शरीराची ढाल...

व्यक्तीची रोग प्रतिकारशक्ती कमी असेल तर त्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. कुठल्याही आजाराचा संसर्ग लगेचच होतो. संतुलित आहार, पुरेशी निद्रा आणि व्यायाम त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते.

संतुलित आहार आणि व्यायाम आवश्यक

निराेगी आयुष्यासाठी व्यक्तीला पुरेशी झोप त्याचबरोबर संतुलित आहार आणि नेहमी व्यायाम आवश्यक आहे. परंतु सध्या बैठे काम, कामाचा ताण आणि बाहेरील खाणे यामुळे व्यक्तीची दिनचर्या बदलली आहे. यामुळे कमी वयातच मधुमेह, रक्तदाबासारखे विकार जडू लागले आहेत. त्यांना दूर ठेवण्यासाठी योग्य आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप गरजेची आहे.

किमान सहा तास झाेप आवश्यक डाॅक्टरांच्या मते, आरोग्य चांगले रहाण्यासाठी व्यक्तीला किमान सहा तासांची शांत झोप मिळणे गरजेचे असते. अपुरी झोप झाल्यास दिवसभर निरूत्साह जाणवतो. थकवा जाणवतो. त्याचबरोबर रक्तदाब, डोळ्यांचे विकार वाढतात. व्यक्तीला भविष्यात निद्रानाशासारख्या आजाराला सामोरे जावे लागते. त्यामुळे आरोग्य चांगले रहाण्यासाठी पुरेशी झोप घ्यावी.

चांगली झोप झाल्यास व्यक्तीचे आरोग्य उत्तम रहाते. त्यासाठी योग्य वेळेत झोपणे आणि सकाळीही वेळेत झोपणे आवश्यक असते. अवेळी झोपही आजाराला आमंत्रण देणारी असते. अधिक झोप झाली तर वजन वाढते. झोपेबरोबरच सकस आहार आणि नियमित व्यायामही गरजेचा असतो. ही त्रिसुत्री जपल्यास व्यक्तीचे आरोग्य चांगले रहाते.

- डाॅ. कल्पना मेहता, आहारतज्ज्ञ, रत्नागिरी.