शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

रत्नागिरी जिल्ह्यात खावटी कर्जधारकच नाही, योजनेचे लाभार्थी शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 12:18 IST

राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमधून वगळण्यात आलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची खावटी कर्जे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु रत्नागिरी जिल्ह्यात एकही खावटी कर्जधारक नसल्यामुळे या योजनेचे जिल्ह्यात सध्या तरी कोणीच लाभार्थी नाहीत.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात खावटी कर्जधारकच नाहीशेतकऱ्यांना लावणी किंवा पेरणीसाठी तात्काळ कर्ज वितरण

रत्नागिरी : राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमधून वगळण्यात आलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची खावटी कर्जे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु रत्नागिरी जिल्ह्यात एकही खावटी कर्जधारक नसल्यामुळे या योजनेचे जिल्ह्यात सध्या तरी कोणीच लाभार्थी नाहीत.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविण्यात येत असतानाच जिल्ह्यातील एकूण ३५ हजार १४१ शेतकऱ्यांना ६८ कोटी ९३ लाखाची कर्जमाफी मिळाली आहे. मात्र अद्याप १२ हजार ५३ शेतकरी प्रतिक्षा यादीमध्ये आहेत. २००९-१० ते २०१५-१६ या कालावधीत कर्जाचे पुर्नगठण केलेल्या शेतकऱ्यांपैकी जे शेतकरी ३० जून २०१६ पर्यत थकबाकीदार असतील त्यांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला होता.

शासन निर्णयानुसार जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांनी जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची राज्य शासनाने पुरविलेल्या कॉलम १ ते ६६ नमुन्याप्रमाणे आॅनलाईन माहिती भरून दिली होती. जिल्ह्यातील त्यातील १४ हजार ९८८ शेतकऱ्यांना ४५ कोटी ८५ लाखाचे कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.सन्मान योजनेंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाख रूपयांपर्यत कर्ज माफी व दीड लाख वरील शेतकऱ्यांना एकवेळ समजोता योजना लागू केली होती. या योजनेतंर्गत जिल्ह्यातील एकूण ४२४ शेतकऱ्यांना एकवेळ समजोता योजनेतंर्गत ३ कोटी ८४ लाखाची कर्जमाफीचा लाभ मिळाली आहे.शासनाने २०१५-१६ व २०१६-२०१७ वर्षात ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याना २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषित केले होते. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या एकूण १९ हजार ७२९ शेतकऱ्यांना १९ कोटी २५ लाख रूपयांचा प्रोत्साहनपर लाभ मिळाला आहे.बचतगटातील महिलांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी सणासाठी जिल्ह्यातील महिला बचतगटांच्या सदस्यांसाठी माऊली बचतगट खावटी कर्ज योजना सुरु केली असून गटांना तत्काळ कर्ज मिळण्यासाठी रु. ३ लाख पर्यंतचे कर्ज वितरण करण्यात येते. याशिवाय ९२१७ शेतकऱ्यांना शेतीपूरक खावटी कर्ज देण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास मंडळ नाशिकतर्फे खावटी कर्ज योजना १९७८ पासून राबविण्यात येत आहे. राज्य सरकार खावटी कर्ज योजना राबविताना ३० टक्के अनुदान व ७० टक्के कर्ज या पध्दतीने कर्ज वितरण करीत असते. रत्नागिरी जिल्हा वगळता अन्य जिल्ह्यातून या प्रकारचे कर्ज वितरण होत आहे. शेतकऱ्यांना लावणी किंवा पेरणीसाठी तात्काळ कर्ज वितरणासाठी खावटी कर्ज देण्यात येते. सातबारावरील जमिनीप्रमाणे कर्ज वितरण करण्यात येते (हेक्टरी ४० हजार कर्ज देण्यात येते. २० हजाराची मर्यादा आहे) 

शेतकरी सन्मान योजनेतंर्गत जिल्ह्यातील एकूण ३५ हजार १४१ शेतकऱ्यांना ६८ कोटी ९३ लाखची कर्जमाफी मिळाली आहे. त्यापैकी रत्नागिरी जिल्हा बँकेचे २६ हजार ३८० लाभार्थी असून ३२ कोटी १८ लाख ३२ हजाराची कर्जमाफी मिळाली आहे. राष्ट्रीयकृत २०२२ शेतकरी असून ६ कोटी ९० लाख २६ हजाराची कर्जमाफी देण्यात आली आहे. जिल्हा बँकेकडून खावटी कर्जाऐवजी सुधारीत पिक कर्जाचे वितरण करण्यात येत आहे.- जीवन गांगण,कार्यकारी संचालक, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक

टॅग्स :GovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी