शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

परशुराम घाटातील चौपदरीकरणास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 16:51 IST

चिपळूण : गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील पेढे परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम २३ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून ...

चिपळूण : गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील पेढे परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम २३ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी बुधवारी पेढे परशुराम संघर्ष समितीच्या उपस्थितीत झालेल्या सर्वेक्षणात ग्रामस्थांनी अनेक बाबी समजून घेतल्या. मात्र भगवान परशुराम मंदिराकडे जाणाऱ्या मार्गाच्या ठिकाणी उड्डाणपूल की सर्कल तयार करायचा यावरून नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दोन दिवसांपूर्वी प्रांताधिकारी प्रवण पवार यांनी तहसीलदार, राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी, दोन्ही ठेकेदार कंपन्या, पेढे परशुराम संघर्ष समिती, उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक आदींची संयुक्त बैठक घेतली. बैठकीला जनहित याचिका दाखल करणारे उच्च न्यायालयाचे ॲड. ओवेस पेचकर हेही उपस्थित होते. या बैठकीत पेढे परशुराम संघर्ष समितीने चौपदरीकरणास सहमती दर्शवल्याने चार वर्षांपासून रखडलेल्या या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. समितीच्यावतीने उच्च न्यायालयाचे ॲड. ओवेस पेचकर यांनी बाजू मांडली व संबंधित ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारीही स्वीकारली.

काम सुरू करण्यापूर्वी बुधवारी कल्याणी टोलवेज, चेतक ईगल इन्फा या दोन्ही कंत्राटदार कंपन्याचे तसेच महामार्गाचे अधिकारी, संघर्ष समिती, सरपंच यांच्या उपस्थितीत जागेचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात सवतसडा धबधबा येथे व पेढे येथून मंदिराकडे जाण्यासाठी पाखाडीसह काही सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरले. त्यानंतर परशुराम येथे पाहणी केली असता तेथील काही दुकानदारांनी उड्डाणपूल ऐवजी सर्कल उभारण्याची मागणी केली, तर काही ग्रामस्थ उड्डाणपुलाच्या मागणीवर ठाम होते. त्यामुळे याविषयी ग्रामस्थांनी एकमुखाने निर्णय द्यावा, त्याप्रमाणे काम केले जाईल, असे ठरले. तूर्तास चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात केली जाणार असून, त्याला ग्रामस्थांनी हिरवा कंदील दाखवला आहे. तरीही उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात हे काम सुरू केले जाणार आहे.

यावेळी महामार्गचे उपविभागीय अभियंता रोजर मराठे, पेढे सरपंच प्रवीण पाकळे, परशुरामचे गजानन कदम, संघर्ष समितीचे विश्वास सुर्वे, सुरेश बहुतले, दीपक मोरे, संतोष चोपडे, जनार्दन मालवणकर, अभय सहस्रबुद्धे, प्रकाश काजवे, पांडुरंग येसरे, प्रसाद थत्ते, गोपीनाथ रेपाळ आदींसह ३० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी