शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

भरधाव ट्रकच्या धडकेने बापलेकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 12:14 IST

Accident Ratnagiri- ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील तरुण आणि त्यांचा चार वर्षाचा मुलगा ठार झाल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा (ता. रत्नागिरी) येथे बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. राजेश महादेव धुमक (३४) आणि साईश धुमक (४) अशी या दोघांची नावे असून, साईशी आई ऋतुजा (३०) या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत.

ठळक मुद्देभरधाव ट्रकच्या धडकेने बापलेकाचा मृत्यू हातखंबा येथील दुर्घटना, महिला गंभीर जखमी

रत्नागिरी : ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील तरुण आणि त्यांचा चार वर्षाचा मुलगा ठार झाल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा (ता. रत्नागिरी) येथे बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. राजेश महादेव धुमक (३४) आणि साईश धुमक (४) अशी या दोघांची नावे असून, साईशी आई ऋतुजा (३०) या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत.रत्नागिरी तालुक्यातील झरेवाडी येथील राजेश आणि ऋतुजा आपल्या चार वर्षाच्या मुलाला घेऊन रत्नागिरीतील रुग्णालयात आले होते. तेथून आपली इतर कामे आटोपून ते झरेवाडीकडे जात होते. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ते हातखंबा येथे पोहोचले.हातखंबा गावातील बसथांब्यावर तेव्हा एक आरामबस उभी होती. एक ट्रक (एमएच ४२- टी १३०१) या बसला ओव्हरटेक करून रत्नागिरीच्या दिशेने येत होता. या ट्रकने धुमक यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, दुचाकी जवळजवळ २०० मीटर ट्रकसोबत फरपटत गेली. दुचाकीवरील राजेश, ऋतुजा आणि साई हे तिघेही फेकले गेले.गंभीर दुखापत झालेल्या राजेश यांचा जागीच मृत्यू झाला. ऋतुजा आणि साईश हे दोघेही गंभीर जखमी झाले. तिघांनाही जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या मोफत रुग्णवाहिकेतून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच दुर्दैवाने साईशची प्राणज्योत मालवली. ऋतुजा यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले आहे.मुलाला आणले होते रुग्णालयातराजेश धुमक आणि ऋतुजा हे दाम्पत्य मुलाला घेऊन रत्नागिरीला रुग्णालयात उपचारासाठी आले होते. रुग्णालयातील काम आटोपून ते घरी जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. अपघातानंतर त्यांची बॅग जवळच पडली होती. फरफटत गेलेल्या दुचाकीचा व त्याच्या नंबरप्लेटचा चुराडा झाला होता. त्यामुळे या गाडीचा नंबरही मिळू शकला नाही.ट्रकचालकाचा पळण्याचा प्रयत्नअपघातानंतर ट्रकचालक शेखर राजेंद्र कोंडे (रा. सोनाळवाडी, अहमदनगर) जंगलातून पळत होता. महामार्गावर ईश्वर ढाब्यानजीक त्याला ग्रामस्थांनी पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. तो ट्रकमधून साखरेची पोती घेऊन जयगडकडे जात होता. 

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी