शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

भरधाव ट्रकच्या धडकेने बापलेकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 12:14 IST

Accident Ratnagiri- ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील तरुण आणि त्यांचा चार वर्षाचा मुलगा ठार झाल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा (ता. रत्नागिरी) येथे बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. राजेश महादेव धुमक (३४) आणि साईश धुमक (४) अशी या दोघांची नावे असून, साईशी आई ऋतुजा (३०) या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत.

ठळक मुद्देभरधाव ट्रकच्या धडकेने बापलेकाचा मृत्यू हातखंबा येथील दुर्घटना, महिला गंभीर जखमी

रत्नागिरी : ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील तरुण आणि त्यांचा चार वर्षाचा मुलगा ठार झाल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा (ता. रत्नागिरी) येथे बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. राजेश महादेव धुमक (३४) आणि साईश धुमक (४) अशी या दोघांची नावे असून, साईशी आई ऋतुजा (३०) या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत.रत्नागिरी तालुक्यातील झरेवाडी येथील राजेश आणि ऋतुजा आपल्या चार वर्षाच्या मुलाला घेऊन रत्नागिरीतील रुग्णालयात आले होते. तेथून आपली इतर कामे आटोपून ते झरेवाडीकडे जात होते. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ते हातखंबा येथे पोहोचले.हातखंबा गावातील बसथांब्यावर तेव्हा एक आरामबस उभी होती. एक ट्रक (एमएच ४२- टी १३०१) या बसला ओव्हरटेक करून रत्नागिरीच्या दिशेने येत होता. या ट्रकने धुमक यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, दुचाकी जवळजवळ २०० मीटर ट्रकसोबत फरपटत गेली. दुचाकीवरील राजेश, ऋतुजा आणि साई हे तिघेही फेकले गेले.गंभीर दुखापत झालेल्या राजेश यांचा जागीच मृत्यू झाला. ऋतुजा आणि साईश हे दोघेही गंभीर जखमी झाले. तिघांनाही जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या मोफत रुग्णवाहिकेतून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच दुर्दैवाने साईशची प्राणज्योत मालवली. ऋतुजा यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले आहे.मुलाला आणले होते रुग्णालयातराजेश धुमक आणि ऋतुजा हे दाम्पत्य मुलाला घेऊन रत्नागिरीला रुग्णालयात उपचारासाठी आले होते. रुग्णालयातील काम आटोपून ते घरी जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. अपघातानंतर त्यांची बॅग जवळच पडली होती. फरफटत गेलेल्या दुचाकीचा व त्याच्या नंबरप्लेटचा चुराडा झाला होता. त्यामुळे या गाडीचा नंबरही मिळू शकला नाही.ट्रकचालकाचा पळण्याचा प्रयत्नअपघातानंतर ट्रकचालक शेखर राजेंद्र कोंडे (रा. सोनाळवाडी, अहमदनगर) जंगलातून पळत होता. महामार्गावर ईश्वर ढाब्यानजीक त्याला ग्रामस्थांनी पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. तो ट्रकमधून साखरेची पोती घेऊन जयगडकडे जात होता. 

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी