शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

भरधाव ट्रकच्या धडकेने बापलेकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 12:14 IST

Accident Ratnagiri- ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील तरुण आणि त्यांचा चार वर्षाचा मुलगा ठार झाल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा (ता. रत्नागिरी) येथे बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. राजेश महादेव धुमक (३४) आणि साईश धुमक (४) अशी या दोघांची नावे असून, साईशी आई ऋतुजा (३०) या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत.

ठळक मुद्देभरधाव ट्रकच्या धडकेने बापलेकाचा मृत्यू हातखंबा येथील दुर्घटना, महिला गंभीर जखमी

रत्नागिरी : ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील तरुण आणि त्यांचा चार वर्षाचा मुलगा ठार झाल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा (ता. रत्नागिरी) येथे बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. राजेश महादेव धुमक (३४) आणि साईश धुमक (४) अशी या दोघांची नावे असून, साईशी आई ऋतुजा (३०) या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत.रत्नागिरी तालुक्यातील झरेवाडी येथील राजेश आणि ऋतुजा आपल्या चार वर्षाच्या मुलाला घेऊन रत्नागिरीतील रुग्णालयात आले होते. तेथून आपली इतर कामे आटोपून ते झरेवाडीकडे जात होते. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ते हातखंबा येथे पोहोचले.हातखंबा गावातील बसथांब्यावर तेव्हा एक आरामबस उभी होती. एक ट्रक (एमएच ४२- टी १३०१) या बसला ओव्हरटेक करून रत्नागिरीच्या दिशेने येत होता. या ट्रकने धुमक यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, दुचाकी जवळजवळ २०० मीटर ट्रकसोबत फरपटत गेली. दुचाकीवरील राजेश, ऋतुजा आणि साई हे तिघेही फेकले गेले.गंभीर दुखापत झालेल्या राजेश यांचा जागीच मृत्यू झाला. ऋतुजा आणि साईश हे दोघेही गंभीर जखमी झाले. तिघांनाही जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या मोफत रुग्णवाहिकेतून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच दुर्दैवाने साईशची प्राणज्योत मालवली. ऋतुजा यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले आहे.मुलाला आणले होते रुग्णालयातराजेश धुमक आणि ऋतुजा हे दाम्पत्य मुलाला घेऊन रत्नागिरीला रुग्णालयात उपचारासाठी आले होते. रुग्णालयातील काम आटोपून ते घरी जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. अपघातानंतर त्यांची बॅग जवळच पडली होती. फरफटत गेलेल्या दुचाकीचा व त्याच्या नंबरप्लेटचा चुराडा झाला होता. त्यामुळे या गाडीचा नंबरही मिळू शकला नाही.ट्रकचालकाचा पळण्याचा प्रयत्नअपघातानंतर ट्रकचालक शेखर राजेंद्र कोंडे (रा. सोनाळवाडी, अहमदनगर) जंगलातून पळत होता. महामार्गावर ईश्वर ढाब्यानजीक त्याला ग्रामस्थांनी पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. तो ट्रकमधून साखरेची पोती घेऊन जयगडकडे जात होता. 

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी