शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

शिक्षा संपताच बांगलादेशींना मायदेशात पाठविणार; रत्नागिरीतील चिरेखाणीवर १३ जणांना केली होती अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 16:56 IST

रत्नागिरी : तालुक्यातील निरूळ येथील चिरेखाणीवरून अटक केलेल्या १३ बांगलादेशी नागरिकांना पुन्हा त्यांच्या मायदेशात पाठविण्यात येणार आहे. त्यांची सहा ...

रत्नागिरी : तालुक्यातील निरूळ येथील चिरेखाणीवरून अटक केलेल्या १३ बांगलादेशी नागरिकांना पुन्हा त्यांच्या मायदेशात पाठविण्यात येणार आहे. त्यांची सहा महिन्यांची शिक्षा १४ मे राेजी संपणार असून, त्यानंतर १५ मे रोजी त्यांची बांगलादेशात रवानगी केली जाणार आहे. त्यासाठी बांगलादेश-भारताच्या सीमेवरील सुरक्षायंत्रणेच्या (बीएसएफ) ताब्यात दिले जाणार आहे, अशी माहिती पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.दहशतवादीविरोधी पथकाने ११ नोव्हेंबर २०२४ राेजी पूर्णगड पोलिस स्थानकाच्या हद्दीमध्ये ही कारवाई केली हाेती. पाेलिसांनी टाकलेल्या छाप्यात वाहिद रियाज सरदार, रिजऊल हुसेन कारीकर, शरिफुल हौजिअर सरदार, फारूख महमंद जहिरली मुल्ला, हमीद मुसाफा मुल्ला, राजू अहमंद हजरतअली शेख, बाकीबिलाह अमिर हुसेन सरदार, सैदूर रेहमान मुबारक अली, आलमगीर हुसेन हिरा, अबदुल कादर दलाल, मोहम्मद शाहेन समद सरदार, मोहम्मद नुरूझामन मोरोल बालायत अली, मोहम्मद लालतू मोंदल किताब अलीस या तेरा जणांना अटक केली हाेती.

पाेलिसांनी अधिक तपास केला असता त्यांना भारतीय असल्याबाबतचे कुठल्याही प्रकारचे पुरावे सादर करता आले नाहीत. त्यावरून हे सर्व भारतामध्ये अनधिकृतरित्या प्रवेश करून राहात असल्याची खात्री झाली हाेती. त्या आधारे रत्नागिरी पोलिस दलाने पासपोर्ट अधिनियम, परदेशी व्यक्ती अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल करुन दोषारोपपत्र दाखल केले हाेते.त्याची सुनावणी होऊन रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य न्यायदंडाधिकारी निखिल गोसावी यांनी १३ जणांना प्रत्येकी ६ महिने साधी कैद व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली हाेती. या सर्वांची १४ मे २०२५ राेजी शिक्षा पूर्ण होणार आहे. त्यानंतर त्यांना १५ मे राेजी त्यांच्या मायदेशी पाठविण्यात येणार आहे.

बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या मायदेशी पाठविण्यासाठी लागणारी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घेतली जाणार आहे. शासकीय परवानगीनंतर पोलिसांचे एक पथक या १३ बांगलादेशीयांना सीमेवरील बीएसएफच्या ताब्यात देणार आहे. ते त्यांना बांगलादेशाच्या स्वाधीन करतील. - धनंजय कुलकर्णी, जिल्हा पाेलिस अधीक्षक, रत्नागिरी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBangladeshबांगलादेशBSFसीमा सुरक्षा दलCourtन्यायालय