शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

Video: उंच उसळणारी लाट, काय तिचा थाट; गुहागरमधील 'बामणघळ' ठरतं पर्यटकांचं मोठं आकर्षण

By पंढरीनाथ कुंभार | Updated: June 22, 2020 17:14 IST

समुद्राचे पाणी गेली कित्येक वर्षे भरतीच्या वेळी काळ्या खडकांवर आदळून तब्बल ३० ते ४० फुट लांब आणि १५ ते २० फूट उंच अशी मोठी घळ तयार झाली आहे.

- संकेत गोयथळे

गुहागर : समुद्र आणि त्याच्या उंच उसळणाऱ्या लाटा हे साऱ्याच लोकांचे आकर्षण. कोकण किनारपट्टीवर कोठेही अशा उसळत्या लाटा लक्ष वेधून घेतात. पण गुहागरच्या बामणघळचं वैशिष्ट्य सर्वांहून वेगळं. दोन मोठाल्या खडकांमधली जागा म्हणजे ग्रामीण भाषेत घळ. भरतीच्या वेळी त्यात घुसणाऱ्या समुद्राच्या पाण्याची उसळणारी लाट हे पर्यटकांना वेड लावणारं दृश्य. 

गुहागर तालुक्यातील हेदवी येथील दशभूज गणेश सर्वश्रुत आहे. दहा हात असलेल्या गणपतीचं हे मंदिर जेवढे आगळे आणि प्रसिद्ध तेवढाच निसर्गाने देखणा समुद्र किनारा दिला आहे. समुद्राचे पाणी गेली कित्येक वर्षे भरतीच्या वेळी काळ्या खडकांवर आदळून तब्बल ३० ते ४० फुट लांब आणि १५ ते २० फूट उंच अशी मोठी घळ तयार झाली आहे. याला ‘बामणघळ’ या नावाने प्रसिद्धी मिळाली आहे.

हेदवीमध्ये आलेला प्रत्येक पर्यटक भाविक ही बामणघळ पाहिल्याशिवाय राहत नाही. २००८ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी विकासचंद्र रस्तोगी यांनी या बामणघळची वाढती प्रसिद्धी पाहून तिथं प्रत्यक्ष पाहणी केली. सध्या मोठ्या काळ्या खडपातून जाणारी अवघड वाट लक्षात घेऊन येथे पाखाडी व्हावी यासाठी प्रयत्न सुरु केले होते. पण जागेअभावी हे काम मागे पडले.

वर्षानुवर्षे काळ्या दगडात (खडकात किंवा खडपात) भरतीच्या वेळी पाणी विशिष्ट ठिकाणी आदळून भली मोठी घळ निर्माण झाली आहे. या घळीमध्ये जोरदार थडकणारे पाणी थांबून त्यानंतर तब्बल २५ ते ३० फूट वर उंच उसळी घेते. हा नजारा पाहण्यासारखा असतो.

निसर्गाची ही किमया पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येथे येतात. गुहागरपासून हेदवी फक्त २४ किलोमीटर अंतरावर आहे. तर गणपतीपुळेपासून जयगड फेरीबोटमार्गे ५० किलोमीटर अंतरावर आहे. पर्यटनाची आवड असली तर हे ठिकाण आपल्या यादीत आत्ताच नोंदवून ठेवा.

टॅग्स :tourismपर्यटनRatnagiriरत्नागिरीMaharashtraमहाराष्ट्र