शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणारी जिवंत माणुसकी कोरोनापासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 12:41 IST

corona virus Ratnagiri- कोरोनाने अख्ख्या जगात रक्ताची नाती विसरायला लावली. कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांवर अंतिम संस्कार करण्यासाठीही त्यांचे आप्त येऊ शकत नव्हते. मात्र, अशावेळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जितू विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेचे ११ कर्मचारी रात्री बेरात्री अंत्यसंस्कार करण्याचे कर्तव्य करतात.

ठळक मुद्देकोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणारी जिवंत माणुसकी कोरोनापासून दूर कुटुंबियांच्या सुरक्षिततेची काळजी हृदयात, तरीही लोकसेवा करण्याचे समाधान मनात

शोभना कांबळेरत्नागिरी : कोरोनाने अख्ख्या जगात रक्ताची नाती विसरायला लावली. कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांवर अंतिम संस्कार करण्यासाठीही त्यांचे आप्त येऊ शकत नव्हते. मात्र, अशावेळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जितू विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेचे ११ कर्मचारी रात्री बेरात्री अंत्यसंस्कार करण्याचे कर्तव्य करतात.सुरुवातीला त्यांच्या मनावरही दडपण होते. काहींच्या घरातील व्यक्तींनी तर ही नोकरी सोड, असे भीतीपोटी निर्वाणीने सांगितले. पण ही सेवा देशसेवा आहे, असे समजून ते आपल्या ध्येयापासून ढळले नाहीत.

हे करत असताना घरातील वयस्कर आई, वडील, पत्नी, मुलं यांच्या सुरक्षिततेची काळजी असतेच. त्यामुळे घरी आल्यावर बाहेरच आंघोळ करून कपडे निर्जंतुक करून घरात प्रवेश होतो. घरातल्यांपासून अलिप्त रहावे लागते. त्यामुळेच कोरोनापासून सुरक्षित रहाता आले. कोरोनाने शेवटच्या क्षणी दूर केले. मात्र, हे कर्मचारी माणुसकीच्या भावनेने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत आहेत.

सुरुवातीला भीती होती. पण लोकसेवेची ही संधी आहे, असं समजून रात्री अपरात्री कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करत होतो. वयस्कर आई, पत्नी, लहान मुलगी यांची चिंता होती. १४ दिवस त्यांच्यापासून लांब रहायचो. कोरोना मृताला अग्नी देताना वाईट वाटायचं. काही वेळा रडलोही आहे. वर्षभरात सण स्मशानातच साजरे झाले.- ज्ञानेश कदम, कर्मचारी

कोरोनाची भीती होती. पण या रूग्णांवर अंत्यसंस्कार करायला कुणीच तयार नव्हतं. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीने कुणीतरी पुढे यायला हवंच होतं आणि ड्यूटीचा भाग म्हणून हे काम करणे क्रमप्राप्तच होते. मात्र, ते करताना घरच्या मंडळींची आणि आमचीही काळजी घेत आहोत.- संजय मकवाना, कर्मचारी

कोरोनाने मृत्यू झालेल्या रूग्णांवर अंत्यसंस्कार करताना सुरुवातीला आपल्या सुरक्षिततेविषयी भीती वाटली. पण त्यानंतर कर्तव्याचा भाग म्हणून ते करू लागलो. आतापर्यंत शेकडो मृतांवर अंत्यसंस्कार केले आहेत. हे करताना माझ्या आणि माझ्या घरच्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेत असतो.- प्रीतम कांबळे, कर्मचारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी