शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणारी जिवंत माणुसकी कोरोनापासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 12:41 IST

corona virus Ratnagiri- कोरोनाने अख्ख्या जगात रक्ताची नाती विसरायला लावली. कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांवर अंतिम संस्कार करण्यासाठीही त्यांचे आप्त येऊ शकत नव्हते. मात्र, अशावेळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जितू विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेचे ११ कर्मचारी रात्री बेरात्री अंत्यसंस्कार करण्याचे कर्तव्य करतात.

ठळक मुद्देकोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणारी जिवंत माणुसकी कोरोनापासून दूर कुटुंबियांच्या सुरक्षिततेची काळजी हृदयात, तरीही लोकसेवा करण्याचे समाधान मनात

शोभना कांबळेरत्नागिरी : कोरोनाने अख्ख्या जगात रक्ताची नाती विसरायला लावली. कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांवर अंतिम संस्कार करण्यासाठीही त्यांचे आप्त येऊ शकत नव्हते. मात्र, अशावेळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जितू विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेचे ११ कर्मचारी रात्री बेरात्री अंत्यसंस्कार करण्याचे कर्तव्य करतात.सुरुवातीला त्यांच्या मनावरही दडपण होते. काहींच्या घरातील व्यक्तींनी तर ही नोकरी सोड, असे भीतीपोटी निर्वाणीने सांगितले. पण ही सेवा देशसेवा आहे, असे समजून ते आपल्या ध्येयापासून ढळले नाहीत.

हे करत असताना घरातील वयस्कर आई, वडील, पत्नी, मुलं यांच्या सुरक्षिततेची काळजी असतेच. त्यामुळे घरी आल्यावर बाहेरच आंघोळ करून कपडे निर्जंतुक करून घरात प्रवेश होतो. घरातल्यांपासून अलिप्त रहावे लागते. त्यामुळेच कोरोनापासून सुरक्षित रहाता आले. कोरोनाने शेवटच्या क्षणी दूर केले. मात्र, हे कर्मचारी माणुसकीच्या भावनेने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत आहेत.

सुरुवातीला भीती होती. पण लोकसेवेची ही संधी आहे, असं समजून रात्री अपरात्री कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करत होतो. वयस्कर आई, पत्नी, लहान मुलगी यांची चिंता होती. १४ दिवस त्यांच्यापासून लांब रहायचो. कोरोना मृताला अग्नी देताना वाईट वाटायचं. काही वेळा रडलोही आहे. वर्षभरात सण स्मशानातच साजरे झाले.- ज्ञानेश कदम, कर्मचारी

कोरोनाची भीती होती. पण या रूग्णांवर अंत्यसंस्कार करायला कुणीच तयार नव्हतं. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीने कुणीतरी पुढे यायला हवंच होतं आणि ड्यूटीचा भाग म्हणून हे काम करणे क्रमप्राप्तच होते. मात्र, ते करताना घरच्या मंडळींची आणि आमचीही काळजी घेत आहोत.- संजय मकवाना, कर्मचारी

कोरोनाने मृत्यू झालेल्या रूग्णांवर अंत्यसंस्कार करताना सुरुवातीला आपल्या सुरक्षिततेविषयी भीती वाटली. पण त्यानंतर कर्तव्याचा भाग म्हणून ते करू लागलो. आतापर्यंत शेकडो मृतांवर अंत्यसंस्कार केले आहेत. हे करताना माझ्या आणि माझ्या घरच्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेत असतो.- प्रीतम कांबळे, कर्मचारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी