शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणारी जिवंत माणुसकी कोरोनापासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 12:41 IST

corona virus Ratnagiri- कोरोनाने अख्ख्या जगात रक्ताची नाती विसरायला लावली. कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांवर अंतिम संस्कार करण्यासाठीही त्यांचे आप्त येऊ शकत नव्हते. मात्र, अशावेळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जितू विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेचे ११ कर्मचारी रात्री बेरात्री अंत्यसंस्कार करण्याचे कर्तव्य करतात.

ठळक मुद्देकोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणारी जिवंत माणुसकी कोरोनापासून दूर कुटुंबियांच्या सुरक्षिततेची काळजी हृदयात, तरीही लोकसेवा करण्याचे समाधान मनात

शोभना कांबळेरत्नागिरी : कोरोनाने अख्ख्या जगात रक्ताची नाती विसरायला लावली. कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांवर अंतिम संस्कार करण्यासाठीही त्यांचे आप्त येऊ शकत नव्हते. मात्र, अशावेळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जितू विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेचे ११ कर्मचारी रात्री बेरात्री अंत्यसंस्कार करण्याचे कर्तव्य करतात.सुरुवातीला त्यांच्या मनावरही दडपण होते. काहींच्या घरातील व्यक्तींनी तर ही नोकरी सोड, असे भीतीपोटी निर्वाणीने सांगितले. पण ही सेवा देशसेवा आहे, असे समजून ते आपल्या ध्येयापासून ढळले नाहीत.

हे करत असताना घरातील वयस्कर आई, वडील, पत्नी, मुलं यांच्या सुरक्षिततेची काळजी असतेच. त्यामुळे घरी आल्यावर बाहेरच आंघोळ करून कपडे निर्जंतुक करून घरात प्रवेश होतो. घरातल्यांपासून अलिप्त रहावे लागते. त्यामुळेच कोरोनापासून सुरक्षित रहाता आले. कोरोनाने शेवटच्या क्षणी दूर केले. मात्र, हे कर्मचारी माणुसकीच्या भावनेने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत आहेत.

सुरुवातीला भीती होती. पण लोकसेवेची ही संधी आहे, असं समजून रात्री अपरात्री कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करत होतो. वयस्कर आई, पत्नी, लहान मुलगी यांची चिंता होती. १४ दिवस त्यांच्यापासून लांब रहायचो. कोरोना मृताला अग्नी देताना वाईट वाटायचं. काही वेळा रडलोही आहे. वर्षभरात सण स्मशानातच साजरे झाले.- ज्ञानेश कदम, कर्मचारी

कोरोनाची भीती होती. पण या रूग्णांवर अंत्यसंस्कार करायला कुणीच तयार नव्हतं. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीने कुणीतरी पुढे यायला हवंच होतं आणि ड्यूटीचा भाग म्हणून हे काम करणे क्रमप्राप्तच होते. मात्र, ते करताना घरच्या मंडळींची आणि आमचीही काळजी घेत आहोत.- संजय मकवाना, कर्मचारी

कोरोनाने मृत्यू झालेल्या रूग्णांवर अंत्यसंस्कार करताना सुरुवातीला आपल्या सुरक्षिततेविषयी भीती वाटली. पण त्यानंतर कर्तव्याचा भाग म्हणून ते करू लागलो. आतापर्यंत शेकडो मृतांवर अंत्यसंस्कार केले आहेत. हे करताना माझ्या आणि माझ्या घरच्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेत असतो.- प्रीतम कांबळे, कर्मचारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी