शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

रत्नागिरी जिल्ह्यात स्वयंचलित हवामान केंद्रासाठी जागेची प्रतिक्षा; यंत्रणा ‘हवेतच’

By मेहरून नाकाडे | Updated: August 8, 2023 13:30 IST

जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर ३०० हवामान केंद्र उभारण्यात येणार

मेहरून नाकाडेरत्नागिरी : शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती मिळावी, नुकसानभरपाई, पीक विमा योजनेचा लाभ देणे सुलभ व्हावे, यासाठी जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर ३०० हवामान केंद्र उभारण्यात येणार आहेत. कृषी विभागाने केंद्रासाठी जागेची पाहणी करून शासनाला अहवाल पाठवून सात महिने उलटले तरी याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही सुरू झालेली नसल्याने ‘स्वयंचलित हवामान केंद्र तूर्तास हवेत’ असा सूर उमटत आहे.हवामानातील बदलाची अचूक माहिती शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आली आहेत. या केंद्रावरून पर्जन्यमान, तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग याची नोंद घेतली जाते. या नोंदीनुसार हवामानातील बदलामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई तसेच पीक विमा योजनेचा लाभ देणे सुलभ होते. मात्र महसूल मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्रातील नोंदीच्या अचूकतेबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. अनेक शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहत आहेत. शेतकऱ्यांकडून होणाऱ्या तक्रारीची दखल घेत शासनाने महसूल मंडळाऐवजी ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जागेची पाहणी करून कृषी विभागाला अहवाल सादर करण्याचे सूचित केले होते.कृषी विभागाकडून ३०० ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याबाबतचा अहवाल डिसेंबरमध्ये शासनाला सादर करण्यात आला होता. मात्र, त्यावर अद्याप तरी हवामान केंद्र उभारण्याबाबत कोणतीही हालचाल दिसत नाही. ग्रामपंचायत स्तरावरील हवामान केंद्राचा फायदा कृषी संशोधन, आपत्ती व्यवस्थापन, मार्गदर्शनासाठीही होणार आहे.

प्रत्येक महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र आहे. याद्वारे तापमान, पर्जन्यमान, वाऱ्याची दिशा याची नोंद ठेवली जाते. महसूल मंडळातील गावागावातील तापमान वेगळे असल्याने नुकसानभरपाई / विमा परतावा देण्यास अडथळा उद्भवू नये यासाठी शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील ३०० गावात केंद्रासाठी जागेची पाहणी करून अहवाल पाठविण्यात आला आहे. - सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीweatherहवामान