शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात स्वयंचलित हवामान केंद्रासाठी जागेची प्रतिक्षा; यंत्रणा ‘हवेतच’

By मेहरून नाकाडे | Updated: August 8, 2023 13:30 IST

जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर ३०० हवामान केंद्र उभारण्यात येणार

मेहरून नाकाडेरत्नागिरी : शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती मिळावी, नुकसानभरपाई, पीक विमा योजनेचा लाभ देणे सुलभ व्हावे, यासाठी जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर ३०० हवामान केंद्र उभारण्यात येणार आहेत. कृषी विभागाने केंद्रासाठी जागेची पाहणी करून शासनाला अहवाल पाठवून सात महिने उलटले तरी याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही सुरू झालेली नसल्याने ‘स्वयंचलित हवामान केंद्र तूर्तास हवेत’ असा सूर उमटत आहे.हवामानातील बदलाची अचूक माहिती शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आली आहेत. या केंद्रावरून पर्जन्यमान, तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग याची नोंद घेतली जाते. या नोंदीनुसार हवामानातील बदलामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई तसेच पीक विमा योजनेचा लाभ देणे सुलभ होते. मात्र महसूल मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्रातील नोंदीच्या अचूकतेबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. अनेक शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहत आहेत. शेतकऱ्यांकडून होणाऱ्या तक्रारीची दखल घेत शासनाने महसूल मंडळाऐवजी ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जागेची पाहणी करून कृषी विभागाला अहवाल सादर करण्याचे सूचित केले होते.कृषी विभागाकडून ३०० ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याबाबतचा अहवाल डिसेंबरमध्ये शासनाला सादर करण्यात आला होता. मात्र, त्यावर अद्याप तरी हवामान केंद्र उभारण्याबाबत कोणतीही हालचाल दिसत नाही. ग्रामपंचायत स्तरावरील हवामान केंद्राचा फायदा कृषी संशोधन, आपत्ती व्यवस्थापन, मार्गदर्शनासाठीही होणार आहे.

प्रत्येक महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र आहे. याद्वारे तापमान, पर्जन्यमान, वाऱ्याची दिशा याची नोंद ठेवली जाते. महसूल मंडळातील गावागावातील तापमान वेगळे असल्याने नुकसानभरपाई / विमा परतावा देण्यास अडथळा उद्भवू नये यासाठी शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील ३०० गावात केंद्रासाठी जागेची पाहणी करून अहवाल पाठविण्यात आला आहे. - सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीweatherहवामान