शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

रत्नागिरी जिल्ह्यात स्वयंचलित हवामान केंद्रासाठी जागेची प्रतिक्षा; यंत्रणा ‘हवेतच’

By मेहरून नाकाडे | Updated: August 8, 2023 13:30 IST

जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर ३०० हवामान केंद्र उभारण्यात येणार

मेहरून नाकाडेरत्नागिरी : शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती मिळावी, नुकसानभरपाई, पीक विमा योजनेचा लाभ देणे सुलभ व्हावे, यासाठी जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर ३०० हवामान केंद्र उभारण्यात येणार आहेत. कृषी विभागाने केंद्रासाठी जागेची पाहणी करून शासनाला अहवाल पाठवून सात महिने उलटले तरी याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही सुरू झालेली नसल्याने ‘स्वयंचलित हवामान केंद्र तूर्तास हवेत’ असा सूर उमटत आहे.हवामानातील बदलाची अचूक माहिती शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आली आहेत. या केंद्रावरून पर्जन्यमान, तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग याची नोंद घेतली जाते. या नोंदीनुसार हवामानातील बदलामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई तसेच पीक विमा योजनेचा लाभ देणे सुलभ होते. मात्र महसूल मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्रातील नोंदीच्या अचूकतेबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. अनेक शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहत आहेत. शेतकऱ्यांकडून होणाऱ्या तक्रारीची दखल घेत शासनाने महसूल मंडळाऐवजी ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जागेची पाहणी करून कृषी विभागाला अहवाल सादर करण्याचे सूचित केले होते.कृषी विभागाकडून ३०० ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याबाबतचा अहवाल डिसेंबरमध्ये शासनाला सादर करण्यात आला होता. मात्र, त्यावर अद्याप तरी हवामान केंद्र उभारण्याबाबत कोणतीही हालचाल दिसत नाही. ग्रामपंचायत स्तरावरील हवामान केंद्राचा फायदा कृषी संशोधन, आपत्ती व्यवस्थापन, मार्गदर्शनासाठीही होणार आहे.

प्रत्येक महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र आहे. याद्वारे तापमान, पर्जन्यमान, वाऱ्याची दिशा याची नोंद ठेवली जाते. महसूल मंडळातील गावागावातील तापमान वेगळे असल्याने नुकसानभरपाई / विमा परतावा देण्यास अडथळा उद्भवू नये यासाठी शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील ३०० गावात केंद्रासाठी जागेची पाहणी करून अहवाल पाठविण्यात आला आहे. - सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीweatherहवामान