शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

विमान सेवा महागल्याने हापूस निर्यातीला अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 15:26 IST

रत्नागिरी : यावर्षी एकूणच आंबा उत्पादन कमी आहे. परदेशातून आंब्याला मागणी असली तरी पुरेसा आंबा नसल्याने निर्यातीत अडथळा येत ...

ठळक मुद्देविमान सेवा महागल्याने हापूस निर्यातीला अडथळादर कोसळल्यामुळे परदेशी आंबा निर्यातीबाबत प्रश्नचिन्ह

रत्नागिरी : यावर्षी एकूणच आंबा उत्पादन कमी आहे. परदेशातून आंब्याला मागणी असली तरी पुरेसा आंबा नसल्याने निर्यातीत अडथळा येत आहे. त्याचबरोबर विमान कंपन्यांनी आंबा वाहतूक दरात वाढ केल्यामुळे निर्यात करणे अडचणीचे होत आहे.कोकणातून बहुतांश हापूस हा विक्रीसाठी मुंबईतील वाशी मार्केटला पाठविण्यात येतो. दररोज सुमारे ६० ते ६५ हजार पेट्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल होत असून, ६०० ते २५०० रूपये दर पेटीला दिला जात आहे. वाशी मार्केटमध्ये येणाऱ्या आंब्यापैकी ३० टक्के परदेशात निर्यात होत आहे.हवाईमार्गे आंबा परदेशात निर्यात केला जात आहे. मात्र, यावेळी विमान कंपन्यांनी आंबा वाहतुकीच्या दरात वाढ केल्याने परदेशात आंबा पाठवणे अवघड बनले आहे. परदेशात आंबा निर्यात करताना या कंपन्यांकडून किलोनुसार भाडे आकारले जाते. यापूर्वी युरोपला १०० रूपये किलो दराने भाडे आकारण्यात येत असे. परंतु, यावर्षी त्यात २० रूपयांनी वाढ झाली आहे.

अमेरिकेला आंबा निर्यात करताना १४० रूपये किलो दराने पाठविण्यात येणारा आंबा आता १८० रूपये किलो दराने पाठविण्यात येत आहे. त्यातच जेट एअरवेजची सेवा बंद झाल्यामुळे आंबा निर्यात अधिक त्रासदायक ठरत आहे.विमान कंपन्यांकडून दरवर्षी दरात वाढ करण्यात येत आहे. एपीएमसी मार्केटमधील दर कोसळल्यामुळे परदेशी आंबा निर्यातीबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरी