शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

विमान सेवा महागल्याने हापूस निर्यातीला अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 15:26 IST

रत्नागिरी : यावर्षी एकूणच आंबा उत्पादन कमी आहे. परदेशातून आंब्याला मागणी असली तरी पुरेसा आंबा नसल्याने निर्यातीत अडथळा येत ...

ठळक मुद्देविमान सेवा महागल्याने हापूस निर्यातीला अडथळादर कोसळल्यामुळे परदेशी आंबा निर्यातीबाबत प्रश्नचिन्ह

रत्नागिरी : यावर्षी एकूणच आंबा उत्पादन कमी आहे. परदेशातून आंब्याला मागणी असली तरी पुरेसा आंबा नसल्याने निर्यातीत अडथळा येत आहे. त्याचबरोबर विमान कंपन्यांनी आंबा वाहतूक दरात वाढ केल्यामुळे निर्यात करणे अडचणीचे होत आहे.कोकणातून बहुतांश हापूस हा विक्रीसाठी मुंबईतील वाशी मार्केटला पाठविण्यात येतो. दररोज सुमारे ६० ते ६५ हजार पेट्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल होत असून, ६०० ते २५०० रूपये दर पेटीला दिला जात आहे. वाशी मार्केटमध्ये येणाऱ्या आंब्यापैकी ३० टक्के परदेशात निर्यात होत आहे.हवाईमार्गे आंबा परदेशात निर्यात केला जात आहे. मात्र, यावेळी विमान कंपन्यांनी आंबा वाहतुकीच्या दरात वाढ केल्याने परदेशात आंबा पाठवणे अवघड बनले आहे. परदेशात आंबा निर्यात करताना या कंपन्यांकडून किलोनुसार भाडे आकारले जाते. यापूर्वी युरोपला १०० रूपये किलो दराने भाडे आकारण्यात येत असे. परंतु, यावर्षी त्यात २० रूपयांनी वाढ झाली आहे.

अमेरिकेला आंबा निर्यात करताना १४० रूपये किलो दराने पाठविण्यात येणारा आंबा आता १८० रूपये किलो दराने पाठविण्यात येत आहे. त्यातच जेट एअरवेजची सेवा बंद झाल्यामुळे आंबा निर्यात अधिक त्रासदायक ठरत आहे.विमान कंपन्यांकडून दरवर्षी दरात वाढ करण्यात येत आहे. एपीएमसी मार्केटमधील दर कोसळल्यामुळे परदेशी आंबा निर्यातीबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरी