शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

विमान सेवा महागल्याने हापूस निर्यातीला अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 15:26 IST

रत्नागिरी : यावर्षी एकूणच आंबा उत्पादन कमी आहे. परदेशातून आंब्याला मागणी असली तरी पुरेसा आंबा नसल्याने निर्यातीत अडथळा येत ...

ठळक मुद्देविमान सेवा महागल्याने हापूस निर्यातीला अडथळादर कोसळल्यामुळे परदेशी आंबा निर्यातीबाबत प्रश्नचिन्ह

रत्नागिरी : यावर्षी एकूणच आंबा उत्पादन कमी आहे. परदेशातून आंब्याला मागणी असली तरी पुरेसा आंबा नसल्याने निर्यातीत अडथळा येत आहे. त्याचबरोबर विमान कंपन्यांनी आंबा वाहतूक दरात वाढ केल्यामुळे निर्यात करणे अडचणीचे होत आहे.कोकणातून बहुतांश हापूस हा विक्रीसाठी मुंबईतील वाशी मार्केटला पाठविण्यात येतो. दररोज सुमारे ६० ते ६५ हजार पेट्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल होत असून, ६०० ते २५०० रूपये दर पेटीला दिला जात आहे. वाशी मार्केटमध्ये येणाऱ्या आंब्यापैकी ३० टक्के परदेशात निर्यात होत आहे.हवाईमार्गे आंबा परदेशात निर्यात केला जात आहे. मात्र, यावेळी विमान कंपन्यांनी आंबा वाहतुकीच्या दरात वाढ केल्याने परदेशात आंबा पाठवणे अवघड बनले आहे. परदेशात आंबा निर्यात करताना या कंपन्यांकडून किलोनुसार भाडे आकारले जाते. यापूर्वी युरोपला १०० रूपये किलो दराने भाडे आकारण्यात येत असे. परंतु, यावर्षी त्यात २० रूपयांनी वाढ झाली आहे.

अमेरिकेला आंबा निर्यात करताना १४० रूपये किलो दराने पाठविण्यात येणारा आंबा आता १८० रूपये किलो दराने पाठविण्यात येत आहे. त्यातच जेट एअरवेजची सेवा बंद झाल्यामुळे आंबा निर्यात अधिक त्रासदायक ठरत आहे.विमान कंपन्यांकडून दरवर्षी दरात वाढ करण्यात येत आहे. एपीएमसी मार्केटमधील दर कोसळल्यामुळे परदेशी आंबा निर्यातीबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरी