शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

असुर्डे :  सत्तेची मस्ती आलेल्या सरकारला आंबेडकरी जनता माफ करणार नाही  - जयदेव गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 17:20 IST

अच्छे दिन च्या नावाखाली जनतेची फसवणूक करुन देश पर्यायाने राज्य देशोधडीला लावणाऱ्या व सत्तेची मस्ती आलेल्या राज्य आणि केंद्र शासनाला आंबेडकरी जनता माफ करणार नाही,

ठळक मुद्देआ. जयदेव गायकवाड:  प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले यांच्यावरही टीका आंबेडकरवादी सामान्य माणूस कधीही भाजपलापाठिंबा देणार नाही

असुर्डे : अच्छे दिन च्या नावाखाली जनतेची फसवणूक करुन देश पर्यायाने राज्य देशोधडीला लावणाऱ्या व सत्तेची मस्ती आलेल्या राज्य आणि केंद्र शासनाला आंबेडकरी जनता माफ करणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयदेव गायकवाड यांनी सावर्डे येथे पत्रकार परिषदेत दिला. आंबेडकरी जनतेत केवळ आपल्या स्वार्थासाठी उभी फुट पाडणाऱ्या रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर यांची क्रेझ संपली आहे.

आंबेडकरी जनता यांना कंटाळले आहे. प्रकाश आंबेडकराचा महाराष्ट्रात केवळ एकच आमदार आहे. आठवलेंनी आपल्या मंत्रीपदासाठी रिपब्लिकन पक्ष मोदींच्या दावणीला बांधला. महाराष्ट्रात त्याचा एकही आमदार नाही.  यामध्ये आंबेडकरी जनतेची मोठी फरफटझाली.  आठवले व प्रकाश आंबेडकर यांनी विश्वासार्हता गमावली आहे. आठवले जनतेला भाजपकडे न्यायला लागलेत पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर असते तर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला असता. मनुस्मृतीचा पुरस्कार करणाऱ्या भाजपबरोबर आंबेडकर जनतेने जावे का? भाजप हा हिंदूत्ववादी फॅसिस्ट पक्ष आहे. आंबेडकरवादी सामान्य माणूस कधीही भाजपलापाठिंबा देणार नाही. की मतदान करणार नाही, असे ते म्हणाले. 

प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघ पक्षाचे रजिस्ट्रेशन करणारा मी कार्यकर्ता आहे. चळवळ पुढे गेलीच नाही. आमच्या आयुष्यातील अठरा वर्षे वाया गेलीत. अशा चळवळीत यश मिळत नसेल तर टाचा घासत बसण्यात काही अर्थ नाही.  प्रकाश आंबेडकरांनी कॉग्रेस सारख्या पक्षाचा स्विकार केला असता तर लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले असते. आता आंबेडकर जनता ठप्प आहे. एमआयएमला पाठिंबा दिल्या पासून आंबेडकरी जनता प्रकाश आंबेडकरांच्या पासून दूर जावू लागली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षच आंबेडकर जनतेला न्याय देवू शकतो असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरRatnagiriरत्नागिरी