शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

असुर्डे :  सत्तेची मस्ती आलेल्या सरकारला आंबेडकरी जनता माफ करणार नाही  - जयदेव गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 17:20 IST

अच्छे दिन च्या नावाखाली जनतेची फसवणूक करुन देश पर्यायाने राज्य देशोधडीला लावणाऱ्या व सत्तेची मस्ती आलेल्या राज्य आणि केंद्र शासनाला आंबेडकरी जनता माफ करणार नाही,

ठळक मुद्देआ. जयदेव गायकवाड:  प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले यांच्यावरही टीका आंबेडकरवादी सामान्य माणूस कधीही भाजपलापाठिंबा देणार नाही

असुर्डे : अच्छे दिन च्या नावाखाली जनतेची फसवणूक करुन देश पर्यायाने राज्य देशोधडीला लावणाऱ्या व सत्तेची मस्ती आलेल्या राज्य आणि केंद्र शासनाला आंबेडकरी जनता माफ करणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयदेव गायकवाड यांनी सावर्डे येथे पत्रकार परिषदेत दिला. आंबेडकरी जनतेत केवळ आपल्या स्वार्थासाठी उभी फुट पाडणाऱ्या रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर यांची क्रेझ संपली आहे.

आंबेडकरी जनता यांना कंटाळले आहे. प्रकाश आंबेडकराचा महाराष्ट्रात केवळ एकच आमदार आहे. आठवलेंनी आपल्या मंत्रीपदासाठी रिपब्लिकन पक्ष मोदींच्या दावणीला बांधला. महाराष्ट्रात त्याचा एकही आमदार नाही.  यामध्ये आंबेडकरी जनतेची मोठी फरफटझाली.  आठवले व प्रकाश आंबेडकर यांनी विश्वासार्हता गमावली आहे. आठवले जनतेला भाजपकडे न्यायला लागलेत पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर असते तर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला असता. मनुस्मृतीचा पुरस्कार करणाऱ्या भाजपबरोबर आंबेडकर जनतेने जावे का? भाजप हा हिंदूत्ववादी फॅसिस्ट पक्ष आहे. आंबेडकरवादी सामान्य माणूस कधीही भाजपलापाठिंबा देणार नाही. की मतदान करणार नाही, असे ते म्हणाले. 

प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघ पक्षाचे रजिस्ट्रेशन करणारा मी कार्यकर्ता आहे. चळवळ पुढे गेलीच नाही. आमच्या आयुष्यातील अठरा वर्षे वाया गेलीत. अशा चळवळीत यश मिळत नसेल तर टाचा घासत बसण्यात काही अर्थ नाही.  प्रकाश आंबेडकरांनी कॉग्रेस सारख्या पक्षाचा स्विकार केला असता तर लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले असते. आता आंबेडकर जनता ठप्प आहे. एमआयएमला पाठिंबा दिल्या पासून आंबेडकरी जनता प्रकाश आंबेडकरांच्या पासून दूर जावू लागली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षच आंबेडकर जनतेला न्याय देवू शकतो असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरRatnagiriरत्नागिरी