शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

रेकॉर्डसाठी नव्हे तर..,रत्नागिरी जिल्ह्यातील आशुतोष जोशी करणार १८ हजार ५०० किलोमीटर पायी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 19:04 IST

पाणी टंचाई, नापीक होणारी जमीन, प्लास्टिकचा वाढता वापर, वारंवार समुद्रात निर्माण होणारे कमी दाबाचे पट्टे, वाढती उष्णता, शेतकऱ्यांच्या आत्महत्या याबाबत जनजागृती करणे, प्रबोधन होणे यासाठी त्याने पायी प्रवासाचा मार्ग निवडला आहे.

गुहागर : गुहागर तालुक्यातील नरवण येथील आशुतोष जोशी याने नरवणे ते जगन्नाथ पुरी (ओरिसा) असा १८ हजार ५०० किलाेमीटर पायी प्रवास करण्याचा संकल्प केला आहे. त्याचा प्रारंभ राम नवमीदिवशी नरवणच्या समुद्रकिनारी सूर्याला नमस्कार करून त्याने केला.

आशुताेषचे आजोबा जयंत जोशी हे निवृत्त तहसीलदार आहेत. वडील अजित जोशी लोटे एमआयडीसीमधील घरडा केमिकल्समध्ये उच्च पदावर नोकरीला, आई गृहिणी, दुसरा भाऊ पुणे येथे शिक्षण घेत आहे. आशुतोषने आपले प्राथमिक, माध्यमिक शिक्षण चिपळूण तालुक्यात केले. त्यानंतर मॉडेल आॅफ आर्ट इन्स्टिट्यूट दादर येथे १ वर्ष तर भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफी पुणे येथे २ वर्षांचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने इंग्लंड येथे व्हिज्युअल आर्ट्सची पदवी संपादन केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर फोटोग्राफी आणि निसर्ग संतुलन याबाबत तो स्कॉटलंड, स्पेन आणि इंग्लंडमध्ये काम करत आहे.

जनजागृती, प्रबोधन होणे यासाठी पायी प्रवासाचा मार्ग निवडला

त्याला पायी प्रवास करणे आणि गिर्यारोहणाची आवड आहे. नेपाळमधील १८ हजार फूट उंची असणाऱ्या अन्नपूर्ण सर्किट हे शिखर त्याने १७ दिवसांत पार केले आहे. पाणी टंचाई, नापीक होणारी जमीन, प्लास्टिकचा वाढता वापर, वारंवार समुद्रात निर्माण होणारे कमी दाबाचे पट्टे, वाढती उष्णता, शेतकऱ्यांच्या आत्महत्या याबाबत जनजागृती करणे, प्रबोधन होणे यासाठी त्याने पायी प्रवासाचा मार्ग निवडला आहे. मागील ६ ते ७ वर्षे पायी चालण्याची सवय आहे. या प्रवासाची पूर्वतयारी इंग्लंडवरून भारतात आल्यानंतर गेले सहा महिने आशुतोष करत आहे.

प्रतिदिनी ३० किलोमीटरचा पायी प्रवास

प्रतिदिनी ३० किलोमीटरचा पायी प्रवास करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून गुहागर तालुक्यातील नरवण गावातून त्याने प्रवास सुरू केला. हा प्रवास चिपळूण, कोयना, पाटण, उंब्रज, सोलापूर, पंढरपूर, लातूर, परभणी, अकोला, अमरावती, नागपूर त्यानंतर छत्तीसगड राज्यातील रायपूरमार्गे ओरिसा राज्यातील जगन्नाथ पुरी येथे पूर्ण होणार आहे.

त्याच्या या प्रवासाला शुभेच्छा देण्यासाठी आजोबा जयंत जोशी, जिल्हा बँकेचे संचालक डॉ. अनिल जोशी, सरपंच प्रवीण वेल्हाळ, शिवसेना युवासेना जिल्हाधिकारी सचिन जाधव, भाजपाचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, नरवणचे माजी उपसरपंच समीर देवकर, माजी सैनिक राजेश जाधव, प्रफुल्ल जाधव, संजय आरेकर, सदानंद मयेकर, आपेश जाधव, अमोघ वैद्य, राहुल ओक, ओम जोशी, श्रीकांत जोशी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी