शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

मुंबईकर निघाले परतीला, रत्नागिरीतून एसटीच्या १६५ जादा गाड्या रवाना; प्रवाशांची गर्दी

By मेहरून नाकाडे | Updated: September 5, 2022 18:48 IST

प्रवाशांच्या मागणीनुसार आणखी गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार

रत्नागिरी : गौरी-गणपतीचा सण साजरा करून विसर्जन होताच काही मुंबईकर परतीसाठी निघाले आहेत. कामावर वेळेवर पोहोचण्यासाठी भाविकांना घाई झाली आहे. सोमवारी गणेश विसर्जन झाल्याने सायंकाळी जादा गाडीने मुंबईरांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. रेल्वे, खासगी गाड्यांना प्रवाशांची गर्दी झाली असून राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातर्फे सोमवारी १६५ जादा एसटी मुंबईकडे रवाना झाल्या.कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. सलग दोन वर्ष असलेले कोरोना निर्बंध यावर्षी नसल्याने भाविक मोठ्या संख्येने गणेशोत्सवासाठी गावाकडे आले होते. मुंबई व उपनगरातून जिल्ह्यात १८२५ जादा गाड्या आल्या होत्या. मुंबईकरांना घेवून आलेल्या एसटी बसेस प्रत्येक आगारात थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. गणेशोत्सव साजरा करून सोमवारपासूनच परतीसाठी एसटीच्या गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मंडणगड आगारातून ७, दापोली ५६, खेड २५, चिपळूण २८, गुहागर ८, देवरूख १७, रत्नागिरी १७, लांजा ६, राजापूर आगारातून एक एसटी मिळून एकूण १६५ गाड्या सायंकाळनंतर मुंबईकडे रवाना झाल्या.अनंत चतुर्दशी दि.९ सप्टेंबर रोजी आहे. त्यामुळे रविवार दि. ११ सप्टेंबरपर्यंत जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. दि. ५ रोजी १६५ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. सर्वाधिक जादा गाड्या दि. ६ सप्टेंबर रोजी सुटणार असून, जिल्ह्यातून ६३० गाड्या मुंबई मार्गावर धावणार आहेत. दि. ७ रोजी ३५० गाड्यांचे नियोजन आहे. दि. ११ पर्यंत जादा गाड्या सुटणार असून प्रवाशांच्या मागणीनुसार आणखी गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ७५० गाड्यांचे ग्रुप बुकिंग करण्यात आले आहे. याशिवाय दैनंदिन १०० गाड्या मुंबई मार्गावर धावत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGanesh Mahotsavगणेशोत्सवMumbaiमुंबई