शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

मुंबईकर निघाले परतीला, रत्नागिरीतून एसटीच्या १६५ जादा गाड्या रवाना; प्रवाशांची गर्दी

By मेहरून नाकाडे | Updated: September 5, 2022 18:48 IST

प्रवाशांच्या मागणीनुसार आणखी गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार

रत्नागिरी : गौरी-गणपतीचा सण साजरा करून विसर्जन होताच काही मुंबईकर परतीसाठी निघाले आहेत. कामावर वेळेवर पोहोचण्यासाठी भाविकांना घाई झाली आहे. सोमवारी गणेश विसर्जन झाल्याने सायंकाळी जादा गाडीने मुंबईरांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. रेल्वे, खासगी गाड्यांना प्रवाशांची गर्दी झाली असून राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातर्फे सोमवारी १६५ जादा एसटी मुंबईकडे रवाना झाल्या.कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. सलग दोन वर्ष असलेले कोरोना निर्बंध यावर्षी नसल्याने भाविक मोठ्या संख्येने गणेशोत्सवासाठी गावाकडे आले होते. मुंबई व उपनगरातून जिल्ह्यात १८२५ जादा गाड्या आल्या होत्या. मुंबईकरांना घेवून आलेल्या एसटी बसेस प्रत्येक आगारात थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. गणेशोत्सव साजरा करून सोमवारपासूनच परतीसाठी एसटीच्या गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मंडणगड आगारातून ७, दापोली ५६, खेड २५, चिपळूण २८, गुहागर ८, देवरूख १७, रत्नागिरी १७, लांजा ६, राजापूर आगारातून एक एसटी मिळून एकूण १६५ गाड्या सायंकाळनंतर मुंबईकडे रवाना झाल्या.अनंत चतुर्दशी दि.९ सप्टेंबर रोजी आहे. त्यामुळे रविवार दि. ११ सप्टेंबरपर्यंत जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. दि. ५ रोजी १६५ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. सर्वाधिक जादा गाड्या दि. ६ सप्टेंबर रोजी सुटणार असून, जिल्ह्यातून ६३० गाड्या मुंबई मार्गावर धावणार आहेत. दि. ७ रोजी ३५० गाड्यांचे नियोजन आहे. दि. ११ पर्यंत जादा गाड्या सुटणार असून प्रवाशांच्या मागणीनुसार आणखी गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ७५० गाड्यांचे ग्रुप बुकिंग करण्यात आले आहे. याशिवाय दैनंदिन १०० गाड्या मुंबई मार्गावर धावत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGanesh Mahotsavगणेशोत्सवMumbaiमुंबई