शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

अरुण मोर्ये यांचा प्रश्न राज्यात प्रथम

By admin | Updated: November 4, 2015 00:08 IST

पीक परिसंवाद २०१५ : खंडाळा येथील १२ शेतकऱ्यांचा सहभाग

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य कृ षी विभाग आणि मुंबई दूरदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सगुणा बाग कर्जत, जि. रायगड येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘पीक परिसंवाद २०१५’ या शेतीविषयक कार्यक्रमात खंडाळा - सत्कोंडी येथील प्रगतशील शेतकरी अरुण मोर्ये यांच्या प्रश्नाने प्रथम क्रमांक पटकावला.रायगड येथे आयोजित करण्यात आलेल्या या पीक परिसंवादात कोकणातील शेतकरी सहभागी झाले होते. दक्षिण कोकणातील लाल मातीत शासकीय माती परीक्षण अहवालानुसार कोणती फुलशेती करावी? कोकणातील हवामानाचा, आर्द्रतेचा सदर फुलशेतीवर कोणता परिणाम होईल? व यासाठी शासकीय योजना कोणत्या? या प्रश्नाला प्रथम क्रमांक मिळाला. या प्रश्नाबद्दल मुंबई दूरदर्शनचे डेप्युटी जनरल मॅनेजर शिवाजी कुळसुंदकर यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला कृषी आयुक्त विकास देशमुख प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. दापोली कृषी विद्यापीठाचे सुभाष चव्हाण, राहुरी कृषी विद्यापीठाचे डॉ. डी. डी. पवार, शेतीतज्ज्ञ व कृषिभूषण पुरस्कारप्राप्त चंद्रशेखर भडसावळे, दूरदर्शनचे डी. जी. एम. शिवाजी कुळसुंदकर आदींची प्रमुख उपस्थिती लाभली होती.खंडाळा आणि परिसरातून जेएसडब्ल्यू कंपनीच्या माध्यमातून कंपनीचे अधिकारी गणेश घोडके आणि सुधीर तेलंग यांनी या परिसंवादासाठी १२ शेतकऱ्यांचा सहभाग नोंदवला होता. यामध्ये चाफेरीचे उपसरपंच आणि प्रगतशील शेतकरी दीपक बैकर, अरुण मोर्ये, सतीश थुळ, उदय जोग यांच्यासह १२ शेतकरी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि मुंबई दूरदर्शनतर्फे परिसंवादाचे आयोजन.पीक परिसंवाद २०१५ मध्ये राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांचा सहभाग होता.रत्नागिरी तालुक्यातील सत्कोंडी - खंडाळा येथील शेतकऱ्यांचाही परिसंवादात सहभाग.प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या अरूण मोर्ये यांचा सत्कार.