शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
2
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
3
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
4
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
5
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
6
अचानक बेपत्ता झाली होती बॉलिवूड अभिनेत्री; ११ महिन्यांनी सापडला हाडांचा सांगाडा
7
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
8
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
9
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
10
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
11
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
12
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
13
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
14
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
15
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
16
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
17
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
18
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
19
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
20
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य

रत्नदुर्ग किल्ल्यावर उद्या साजरा होणार आरमार विजय दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 4:07 PM

शिवाजी महाराजांचे आरमारप्रमुख दर्यासारंग  मायनाक भंडारी आणि दौलतखान यांनी १८ सप्टेंबर १६७८ रोजी जगज्जेत्या इंग्रजांचा समुद्रात पराभव केला, या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून येथील तालुका भंडारी

ठळक मुद्देअठरा पगड समाजबांधवांचे शोभायात्रेसह आगमनभागेश्वरी मंदिर ते भगवती मंदिर अशी शोभायात्रा अठरा पगड जातींच्या समाजबांधवांकडून काढली जाणार आहे.

रत्नागिरी : शिवाजी महाराजांचे आरमारप्रमुख दर्यासारंग  मायनाक भंडारी आणि दौलतखान यांनी १८ सप्टेंबर १६७८ रोजी जगज्जेत्या इंग्रजांचा समुद्रात पराभव केला, या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून येथील तालुका भंडारी समाज आणि अठरा पगड समाजांच्यावतीने रविवार, २५ रोजी शहरातील भगवती मंदिर येथील रत्नदुर्ग किल्ल्यावर ‘आरमार विजय दिन’ साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त शोभायात्रा तसेच इतिहास संशोधक यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातींना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. अजिंक्य समजल्या जाणाºया इंग्रजांना १८ सप्टेंबर १६७८ रोजी समुद्री हल्ल्यात पराभूत करण्याचा असामान्य पराक्रम रत्नागिरीचे सुपुत्र दर्यासारंग  मायनाक भंडारी, दौलतखान आणि अठरा पगड जातींच्या त्यांच्या शिलेदारांनी केला.  त्यामुळे बहुजन समाजाचा हा इतिहास नव्या पिढीसमोर येणे गरजेचे आहे. त्यासाठी १८ सप्टेंबर हा दिवस आरमार विजय दिन म्हणून गेल्या काही वर्षांपासून तालुका भंडारी समाज तसेच बहुजन समाजातर्फे साजरा करण्यात येत आहे. 

दिनांक २५ नोव्हेंबर रोजी शहरातील भगवती मंदिर येथील रत्नदुर्ग किल्ल्यावर हा आरमार विजय दिन साजरा करण्यात येणार आहे. तालुका भंडारी समाजाबरोबरच कुणबी समाजोन्नती संघ, तेली सेवा संघ, आॅल इंडिया मुस्लिम ओबीसी आॅर्गनायझेशन, खारवी समाज विकास समिती, त्वष्टा कासार ज्ञाती मंडळ, लिंगायत सेवा संघ, नामदेव शिंपी समाज मंडळ, परिट समाज सेवा संघ, भोई समाज, धनगर समाज संघ, संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ, कोळी समाज, सुतार समाज संघ, गाबित समाज, कुंभार समाज, आगरी समाज आदींच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी दुपारी ३.३० वाजता भागेश्वरी मंदिर ते भगवती मंदिर अशी शोभायात्रा अठरा पगड जातींच्या समाजबांधवांकडून काढली जाणार आहे. शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांच्या वेषभूषा केलेल्या समाजबांधव यात सहभागी होणार आहेत. यावेळी रत्नदुर्ग किल्ला येथे भागोजीशेठ कीर यांच्या नावाच्या पाटीचे अनावरण होणार आहे. त्यानंतर याठिकाणी इतिहास संशोधक तसेच विविध समाजातील मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFortगड