शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

एप्रिल, मे महिन्यात सामान्य तापमानापेक्षा राहणार अधिक तापमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:31 IST

रत्नागिरी : मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात वातावरणात बदल दिसत आहे. गेल्या काही ...

रत्नागिरी : मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात वातावरणात बदल दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमान कमी झाले असून मंगळवारपासून मळभाचे आच्छादन दिसू लागले आहे. एप्रिल आणि मे हे दोन्ही महिने अधिक तापमानाचे मानले जातात. मात्र, यावर्षी या कालावधीतील तापमानापेक्षा साधारणत: एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढलेले राहील, असा अंदाज दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामान सल्ला केंद्राकडून व्यक्त करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अनेक बदल घडून येत आहेत. गेल्या आठवड्यात कमालीची उष्णता वाढली होती. मात्र, आता पुन्हा सामान्य वातावरण आहे. मंगळवारपासून जिल्ह्यात मळभाचे वातावरण निर्माण झाले असून कधीही पाऊस पडेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत माहिती देताना डाॅ. मोरे म्हणाले की, मराठवाडा, विदर्भ, दक्षिण कोकण, तामिळनाडू, कर्नाटक आदी भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा परिणाम रत्नागिरी जिल्ह्यात जाणवत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी वाढलेले तापमान काहीअंशी कमी झाले आहे.

भारत मोसम विज्ञान विभागाकडून (आय. एम. डी.) या हवामान केंद्राकडे प्रत्येक पाच दिवसांनी हवामानाचा अंदाज पाठविला जातो. त्यानुसार दोन आठवड्यांपूर्वी तापमानात वाढ झाली होती आणि आर्द्रता कमी झाली होती. मात्र, आता कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आता तापमान खाली आले आहे. मात्र, या एप्रिल, मे महिन्यात नेहमीपेक्षा एक ते दोन अंश सेल्सिअसने तापमान वाढलेले रहाणार आहे. आय. एम. डी. कडून आलेल्या पाच दिवसांच्या अंदाजानुसार सध्या कमी दाबाचा पट्टा असल्याने ७ ते ११ एप्रिल या कालावधीत कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअस इतके राहणार आहे. तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस इतके राहणार आहे. त्यानंतर मात्र, नेहमीपेक्षा कमाल तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज आय.एम. डी. कडून व्यक्त करण्यात आला आहे. यावर्षी एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत नेहमीपेक्षा १ ते २ अंश सेल्सिअसने तापमान वाढणार असल्याचे या केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

कोट..........

यावर्षी तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ राहणार आहे. एप्रिल आणि मे हे दोन महिने सर्वाधिक तापमानाचे मानले जातात. या महिन्यात १ ते २ अंश सेल्सिअसने तापमान वाढलेले राहणार आहे.

डाॅ. विजय मोरे, नोडल अधिकारी, कृषी विद्या विभाग, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली