शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

मुलांच्या वाढलेल्या वजनाने पालकांमध्ये चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाकाळात सुमारे पावणेदोन वर्षे घरात राहिलेल्या मुलांचे खाणे वाढले आहे. मात्र, टीव्ही आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनाकाळात सुमारे पावणेदोन वर्षे घरात राहिलेल्या मुलांचे खाणे वाढले आहे. मात्र, टीव्ही आणि मोबाईलवर अधिकतर वेळ घालविण्यामुळे शरीराच्या हालचालीही थांबल्या आहेत. त्यामुळे मुलांचे वजन वाढले आहे. मात्र, यामुळे पालकांपुढे चिंता निर्माण झाली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून म्हणजेच मार्च २०२० पासून लाॅकडाऊन सुरू झाले, तेव्हापासून शाळा-महाविद्यालये बंद झाली. सध्या मोठे वर्ग काहीअंशी सुरू झाले असले तरी लहान वर्ग अजूनही बंद आहेत. त्यामुळे ही सर्व मुले घरी आहेत. सध्या या मुलांना घरातील अन्न बऱ्याचअंशी मिळत आहे, ही बाब आरोग्याच्या दृष्टीने चांगली असली तरी सतत खाण्यामुळे वजन वाढू लागले आहे. त्यातच ही मुले बाहेर पडत नसल्याने खेळही बंद आहे. त्यामुळे शारीरिक हालचालीही थांबल्या आहेत.

...........................

डोळे आणि पचनाचे विकारही वाढले

मुले आता दिवसभर घरात राहिल्याने त्यांचे खेळणे थांबले आहे. घरी बसून तासन्तास टीव्हीसमोर बसणे किंवा मोबाईलवर गेम बघत राहाणे यामुळे पचनाचे विकार, लठ्ठपणा यात वाढ होत असून डोळ्यांवरही ताण येत आहे.

पालकांची चिंता वाढली

मुलं घरी आहेत. त्यामुळे सतत काहींना काही नवीन पदार्थ बनविण्याची फर्माईश असते; परंतु खाणे जास्त आणि व्यायाम काहीच नाही. यामुळे वजन वाढू लागले आहे.

- चिंतन तेंडुलकर, पालक, रत्नागिरी.

सध्या शाळा बंद आहेत. त्यामुळे घरचे नेहमीच खाण्याचा कंटाळा असतो. फास्टफूड खाण्याचा हट्ट मुलांकडून केला जात आहे. त्यातच मोबाईल-टीव्हीत लक्ष अधिक असल्याने एकाच ठिकाणी अधिक वेळ बसून राहतात.

- प्रेरणा काळे, पालक, चरवेली, रत्नागिरी.

....................................

तज्ज्ञ काय म्हणतात

मुलं शाळेत असताना भरपूर खेळतात. मात्र, आता घरी असल्याने सतत खाणे आणि मोबाईलवर राहण्याने त्यांचे वजन वाढतेय. पालकांनी त्यांना थोडेसे खेळायला द्यायला हवे. व्यायामाची सवय लावावी.

- डाॅ. रोहित पाटील, बालरोगतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी.

मुलांच्या ॲक्टिव्हिटी थांबल्याने लठ्ठपणात वाढ होत आहे. या काळात त्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम होत आहे. ऑनलाईन अभ्यासामुळे काहीसा आत्मविश्वासही कमी होताना दिसतो. यातून त्यांची चिडचिडही वाढली आहे. डोळ्यांवरही परिणाम होताना दिसतात.

- डाॅ. गोकुळ देसाई, आयुर्वेदिक तज्ज्ञ, रत्नागिरी.