शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: अंनिस कार्यकर्त्यांनी देवसडेत चक्क पाण्याने पेटवली होळी, त्यामागील विज्ञान केलं स्पष्ट 

By शोभना कांबळे | Updated: March 27, 2024 13:51 IST

चमत्कार पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली

रत्नागिरी : समाजातील अंधश्रद्धा दूर करायच्या असतील, तर आपल्याला लोकांमध्ये जावे लागेल. लोकांना चमत्कारामागे विज्ञान असते किंवा त्या व्यक्तीची हातचलाखी असते, हे पटवून द्यावे लागेल. याच उद्देशाने खेड तालुक्यातील देवसडे गावामध्ये होळीच्या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बुवाबाजी संघर्ष प्रमुख संदीप गोवळकर यांनी देवसडे गावची होळी पाण्याने पेटवून त्यामागचे विज्ञान स्पष्ट केले.कोकणात शिमगाेत्सव खूप मोठा सण असून, या सणानिमित्ताने मुंबई, पुणे या ठिकाणचे सर्व लोक आपल्या मूळ गावी येतात. या सणाचे औचित्य साधून खेड तालुक्यातील देवसडे गावामध्ये मुंबई मंडळ व ग्रामस्थ मंडळाकडून सालाबादाप्रमाणे होळीच्या ठिकाणी सत्यनारायणाच्या पूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बुवाबाजी संघर्ष प्रमुख संदीप गोवळकर यांनी देवसडे गावची होळी पाण्याने पेटवून त्यामागचे विज्ञान सांगितले. जगातील सर्व आगी या पाण्याने विझवल्या जातात. पाण्याने होळी पेटणार असल्याने हा चमत्कार पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गोवळकर यांनी भोंदूबाबा, भगत, मांत्रिक अशाच विज्ञानाचा वापर करून आजपर्यंत आपल्याला फसवत आले आहेत. आपण चिकित्सा करायला हवी. आपण विज्ञानाची साधने वापरायला शिकलो, पण वैज्ञानिक दृष्टिकोन वापरायला शिकलो नाही. आपल्या आजूबाजूला घडणारे चमत्कार हे वैज्ञानिक कसोटीवर तपासले पाहिजेत, असेही यावेळी सांगितले.अंनिस खेड शाखेचे कार्याध्यक्ष सचिन शिर्के यांनी प्रबोधनात्मक गीत गाऊन व्यसनमुक्तीबाबत लोकांमध्ये प्रबोधन केले. यावेळी कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा खेड ग्रामीणचे खजिनदार व देवसडे गावचे ग्रामीण अध्यक्ष सुधीर वैराग, ग्रामीण सचिव संतोष कदम, मुंबई मंडळाचे अध्यक्ष सुनील कदम, सचिव रवींद्र शिगवण, ग्रामपंचायत सदस्य स्वाती वैराग, सल्लागार संजय कदम, मुंबई महिला मंडळ अध्यक्ष वैशाली कदम, ग्रामीण महिला अध्यक्ष निर्मला कदम यांचे मोलाचे योगदान लाभले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी