शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

ऐन थंडीत झाले कोकण गरमा-गरम-वातावरण दमट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 11:04 IST

रत्नागिरी : गेल्या आठवड्यात बहुतांश भागात ढगाळ स्थिती असल्याने राज्यात गायब झालेली थंडी पुन्हा सुरू झाली असली, तरी कोकणात ...

ठळक मुद्देरत्नागिरीत रविवारी तापमानाचा उच्चांकमुंबई, कोकणात उष्मा अन्यत्र थंडीचा दिलासा

रत्नागिरी : गेल्या आठवड्यात बहुतांश भागात ढगाळ स्थिती असल्याने राज्यात गायब झालेली थंडी पुन्हा सुरू झाली असली, तरी कोकणात मात्र अद्यापही उष्मा जाणवत आहे. मुंबई आणि कोकण विभागात मात्र किमान तापमान अद्यापही २१ ते २४ अंशांच्या आसपास असल्याने वातावरण दमट आहे. रत्नागिरी येथे रविवारी उच्चांकी कमाल तापमान ३५.२ अंश सेल्सियस इतके नोंदविण्यात आले आहे.

उत्तरेकडून थंड वाºयांचा प्रवाह दक्षिणेकडे वाहत असल्याने मुंबई आणि कोकण वगळता इतरत्र किमान तापमानात घट झाली आहे. काही भागांमध्ये सकाळी धुके पडू लागले आहे. पुढील काही दिवस राज्यातील वातावरण कोरडे राहणार असल्याने गारठा वाढत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दुसºया आठवड्यापासून मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये रात्री आणि पहाटे गारवा जाणवत होता. मात्र, त्यानंतर कोकण, मध्य महाराष्ट्रातील कमीदाबाचा पट्टा यामुळे मागील आठवड्यात काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. याच कालावधीत सर्वत्र ढगाळ स्थिती निर्माण झाल्याने थंडी गायब झाली होती. सध्या बहुतांश भागात निरभ्र आकाश आणि कोरडे हवामान आहे. त्याचप्रमाणे उत्तरेकडून थंड वाºयांचे प्रवाह येत आहेत. त्यामुळे किमान तापमानात पुन्हा घट सुरू झाल्याने संध्याकाळपासूनच गारव्याचा अनुभव मिळत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात किमान आणि कमाल अशा दोन्ही तापमानात घट झाली आहे. 

 मध्य महाराष्ट्रात पुणे येथे कमाल तापमान १४.९ अंश होते. महाबळेश्वर येथे १६ अंशांच्या आसपास तापमान आहे. मध्य महाराष्ट्रात नाशिक येथे नीच्चांकी १३.६ तापमान नोंदवले गेले. मराठवाड्यात बहुतांश भागात किमान तापमानाचा पारा १३ ते १६ अंशांवर आहे. 

 

टॅग्स :konkanकोकणRatnagiriरत्नागिरी