शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
3
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
6
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
7
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
8
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
9
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
10
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
11
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
12
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
13
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
14
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
15
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
16
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
17
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
18
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
19
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
20
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  

‘अंजनवेल’ची पाण्यावाचून तडफड

By admin | Updated: March 25, 2015 00:45 IST

‘रत्नागिरी गॅस’ने नाकारले : पंचायत समितीच्या आराखड्यातही समावेश नाही

गुहागर : अंजनवेल ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेच्या विहिरीमध्ये आठ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. यावर्षी रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पाकडून टँकरने होणारा पाणी पुरवठा नाकारण्यात आला आहे व पंचायत समितीच्या टंचाई कृती आराखड्यातही अंजनवेल ग्रामपंचायतीचे नाव नसल्याने पाणी पुरवठा होऊ शकत नसल्याने अंजनवेलवासियांना यावेळी पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. या विरोधात हंडामोर्चा काढण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.एन्रॉन प्रकल्प म्हणजेच दाभोळ वीज प्रकल्पापासून अंजनवेल गावातील विहिरी दूषित झाल्याने पाणी प्रश्नाला सामोरे जावे लागे. ब्राह्मणवाडी येथील ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेच्या एकमेव विहिरीचे पाणी चांगले असल्याने या विहिरीवरुन गावात पाणी पुरवठा केला जातो. एप्रिल व मे महिन्यामध्ये ही विहिरही आटत असून पाणीटंचाई स्थिती निर्माण होते. रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्प २००५ पासून सुरु झाल्यानंतर वारंवार ग्रामपंचायतीद्वारे मागणी केल्यानंतर टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. गतवर्षी दहा टँकरने दररोज पाणी पुरवठा केला जात होता. गतवर्षी दहा टँकरने दररोज पाणी पुरवठा केला जात होता. यावेळी ग्रामपंचायतीकडून कंपनी प्रशासनाला टँकरने पाणी पुरवठ्यासंदर्भात पत्रव्यवहार केल्यानंतर दुर्लक्ष करण्यात आले.याबाबत तहसीलदार वैशाली पाटील यांनी रत्नागिरी गॅस कंपनीचे अधिकारी अतुल देसाई, अंजनवेल ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राजेश आंबरे, पंचायत समिती कक्ष अधिकारी दत्तात्रय आंबी यांच्या उपस्थितीत चर्चात्मक बैठक घेतली असता, यावेळी कंपनी प्रशासन पाणी पुरवठा करु शकत नसल्याचे स्पष्ट केले.याबाबत कंपनी अधिकारी अतुल देसाई यांनी सांगितले की, कंपनीला वाशिष्ठी नदीतून शिरळ पंप हाऊसद्वारे चिपळूण ते गुहागर अशा पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा होतो. या पाईपलाईनला अनेक ठिकाणी अनधिकृतरित्या पाईप जोडून मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत असल्याने कंपनीला आवश्यक पाणी पुरवठा सध्या होत नाही. प्रकल्प बंद असला तरी प्रकल्पातील फायर सिस्टीमसाठी दररोजचा आवश्यक पाणी साठा ठेवावा लागतो. प्रकल्पासाठीच जर पाणी पुरत नसेल तर वेगळा पाणीपुरवठा आम्ही करूच शकत नाही, असे स्पष्ट करत प्रथम या कंपनी लाईनवर अनधिकृतपणे राजरोस होणाऱ्या पाणी चोरीवर कारवाई झाली पाहिजे, असे मत व्यक्त केले.याबाबत ग्रामविकास अधिकारी राजेश आंबरे यांनी सांगितले की, कंपनीला प्रकल्प पूर्ण कार्यान्वित असताना ६ टीएमसी पाणी आवश्यक आहे. सध्या प्रकल्प बंद असल्याने थोडेच पाणी प्रकल्पाला लागते. अंजनवेल ग्रामपंचायतीसाठी पाईपलाईनद्वारे दिलेला टॅप खोलून आवश्यक दररोजचा ३ लाख लिटर पाणी पुरवठा ग्रामपंचायतीला होऊ शकतो असे सुचित केले.रत्नागिरी गॅस प्रकल्पाकडून दरवर्षी पाणीपुरवठा होत असल्याने पंचायत समितीच्या टंचाई कृती आराखड्यात अंजनवेल गावाचा समावेश नाही. तालुक्यातील ४२ वाड्या टंचाईकृती आराखड्यात आहेत. सध्या एक टँकर उपलब्ध असून, दुसऱ्या टँकरचा ताबा अद्याप मिळालेला नाही. यावर सध्या तरी कोणताच मार्ग नसल्याचे तहसीलदार वैशाली पाटील यांनी स्पष्ट केले. अंजनवेलच्या पाणीटंचाईचे संकट समोर असताना कंपनी प्रशासन व शासकीय यंत्रणेकडून कोणताच मार्ग काढला जात नसल्याने ग्रामस्थांनी हंडा मोर्चा काढण्याची तयारी सुरु केली आहे. (प्रतिनिधी)