शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Amba Ghat: आंबा घाट वाहतुकीसाठी बनतोय जीवघेणा, दुरुस्ती तकलादू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 12:51 IST

घाटातील वाहतूक धोकादायक ठरत असताना घाटामधून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक अद्यापही सुरूच

सागर पाटीलटेंभ्ये: पश्चिम महाराष्ट्र व कोकणाला जोडणारा आंबा घाट सध्या वाहतुकीसाठी जीवघेणा बनत आहे. अतिवृष्टीनंतर आंबा घाटात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. दुरुस्तीच्या कामानंतर त्याठिकाणी लोखंडी सळ्या उघड्या झाल्या आहेत. वाहनचालकांसाठी या सळ्या धोकादायक ठरत आहे.रत्नागिरी व कोल्हापूर या दोन महत्त्वपूर्ण जिल्ह्यांना जोडणारा सर्वात सुरक्षित घाट म्हणून आंबा घाटाची ओळख आहे. घाटातून जाणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या हा घाट जीवघेणा ठरत आहे. रत्नागिरीच्या हद्दीतील पाच ते सात किलोमीटरचा रस्ता सोडता घाटातील सर्व रस्ता पूर्णतः उखडला आहे.अनेक ठिकाणी एक ते दीड फूट खोलीचे खड्डे पडले आहेत. दोन वर्षांपूर्वी दरड कोसळलेल्या ठिकाणी अद्यापही दुरुस्ती सुरू आहे. या ठिकाणी बांधकाम खात्याकडून काँक्रीट करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे केवळ एक ते दोन महिन्यांमध्येच या काँक्रीटमधील लोखंडी सळ्या उघड्या झाल्या आहेत.घाटातील वाहतूक धोकादायक ठरत असताना घाटामधून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक अद्यापही सुरूच आहे. घाटाची पूर्ण दुरुस्ती होईपर्यंत अवजड वाहतुकीवर निर्बंध घालणे आवश्यक असल्याचे मत प्रवाशांमधून व्यक्त केले जात आहे. बांधकाम खात्याने किमान तात्कळ कार्यवाही करत घाट रस्त्यावरी जीवघेणे खड्डे बुजवणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीroad transportरस्ते वाहतूक