शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

आंबेनळी बस दुर्घटनेच्या आठवणी आजही ताज्याच -: तिथीनुसार एक वर्ष पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 00:00 IST

बस दरीत कोसळून ३० कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना २८ जुलै रोजी घडली होती. या मृत्यूने कोकण कृषी विद्यापीठाने ३० कर्मचारी गमावले होते तर ३० कुटुंबियांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.

ठळक मुद्दे३० कुटुंबियांनी वर्षश्राद्धनिमित्त वाहिली श्रद्धांजली, वर्षश्राध्दाला अनेकांना अश्रू झाले अनावर

शिवाजी गोरे ।दापोली : आंबेनळी बस अपघात दुर्घटनेला बुधवारी तिथीनुसार एक वर्ष पूर्ण झाले आणि मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या आठवणी ताज्या झाल्या. यावेळी अनेकांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे ३१ कर्मचारी अभ्यास दौºयासाठी जात असताना आंबेनळी घाटात त्यांची बस दरीत कोसळून ३० कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना २८ जुलै रोजी घडली होती. या मृत्यूने कोकण कृषी विद्यापीठाने ३० कर्मचारी गमावले होते तर ३० कुटुंबियांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यांच्या जाण्याने ३० कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेला आता एक वर्ष पूर्ण होत आहे.

बुधवार, १७ जुलै रोजी ३० कुटुंबियांच्या नातेवाईकांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली. वर्षश्राद्ध करताना डोंगराएवढे दु:ख व जुन्या आठवणी ताज्या झाल्या. प्रत्येक कुटुंबात मृतांच्या आठवणी होत्या. नातेवाईक तर एक वर्ष होऊनही या दुर्दैवी दुर्घटनेतून बाहेर पडलेले नाहीत. त्यांच्या चेहºयावर सुखाचा लवलेश सुद्धा दिसला नाही. डोंगराएवढे दु:ख घेऊन दु:खी अंत:करणाने यावेळी श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडला खरा. परंतु, त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी अजून या कुटुंबांना न्यायाची प्रतीक्षा आहे. दु:ख सहन करताना, त्यांच्या मनात चीड व असंतोष आहे. हा अपघात नसून घातपात आहे, असा निष्कर्ष प्रत्येक नातेवाईकाने काढला आहे. त्यामुळे त्यांना न्यायाची प्रतीक्षा आहे. खरा गुन्हेगार पुढे येण्याची गरज ते बोलून दाखवत आहेत.

आंबेनळी बस दुर्घटनेपासून आजपर्यंत मृत कर्मचाºयांचे नातेवाईक एक-एक दिवस त्यांच्या आठवणींना उजाळा देत जगत आहेत. आंबेनळी घाटातील बस अपघातात कोणी आपले वडील, कोणी पती तर कोणी आपला मुलगा गमावला आहे. मृत कर्मचारी हे सगळे ३० ते ४५ दरम्यानचे होते. कुटुंबातील कर्ती कमावती व्यक्तीच निघून गेल्याने सगळे कुटुंबच पोरके झाले आहे. या कुटुंबांना आधार देण्याची गरज आहे. दापोली कोकण कृषी विद्यापीठाने मृत कर्मचाºयांच्या नातेवाईकांना अनुकंपा तत्वावर अजूनही घेतलेले नाही. पोलिसांकडून त्यांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे या कुटुंबांच्या पदरात वर्षभरात वेदनेशिवाय काहीही पडलेले नाही.

कोकण कृषी विद्यापीठ कर्मचारी अपघाताच्या दुर्घटनेला एक वर्ष होऊनसुद्धा मृतांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे आम्हाला न्याय कधी मिळणार? या आंबेनळी बस अपघात दुर्घटनेत प्रकाश सावंतदेसाई दोषी असतील तर त्यांना शिक्षा होणार की नाही, असे अनेक प्रश्न वर्षभरानंतरही अनुत्तरीत आहेत. पोलिसांचा तपास पूर्ण झाला असून, यातून काय निष्कर्ष निघाला याचीही कल्पना या कुटुंबियांना नाही. त्यामुळे मृत कुटुंबियांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांना दोन ते तीनवेळा भेटून कैफियत मांडूनसुद्धा आम्हाला न्याय मिळत नसेल तर दाद कोणाकडे मागायची, असा सवाल मृतांच्या कुटुंबियांकडून केला जात आहे.

प्रकाश सावंतदेसाई खरा गुन्हेगार आहे. त्याला शिक्षा व्हायला हवी. पोलादपूर पोलिसांनी तपास योग्य पद्धतीने केला नाही. महाड कोर्टात तपास थांबवण्यासंदर्भात व तपास पूर्ण झाल्याचे लेखी दिले आहे. ही बस प्रशांत भांबीड चालवत होता, असा खोटा दावा करण्यात आला आहे. प्रकाश सावंतदेसाई यांनीच ही बस दरीत सोडून दिली असावी. त्याची नार्को टेस्ट करावी. तपास थांबवू नये.- हरिश्चंद्र कदम 

२८ जुलै २०१८ रोजी आंबेनळी बस अपघातात ३० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या अपघातातून प्रकाश सावंतदेसाई एकमेव वाचले आहेत. त्यामुळे सावंतदेसाईच बस चालवत असावेत, असा निष्कर्ष नातेवाईक व्यक्त करत आहेत. पोलीस प्रशासन व सरकार सावंतदेसार्इंना वाचवत आहे. प्रकाश सावंतदेसाई निर्दोष असतील तर त्यांची नार्को टेस्ट का केली जात नाही.- पी. एन. चौगुले, हर्णै

टॅग्स :ratlam-pcरतलामAccidentअपघातBus Driverबसचालक