शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
‘भाजपा ४०० जागा कदाचित चंद्रावर जिंकेल, भारतात मात्र…’ आदित्य ठाकरेंचा खोचक टोला 
3
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
4
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
5
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
6
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
7
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
8
Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा
9
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
10
घर घ्यायचंय? फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो? कुठे होईल पैशांची बचत
11
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
12
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
14
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
15
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
16
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
17
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
18
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
19
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
20
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच शाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 12:18 IST

corona virus Ratnagiri School- कोरोनाची रूग्णसंख्या वाढत असतानाच पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. कोरोनामुळे नवीन निर्बंध जाहीर केले असून त्यामुळे विद्यार्थी आरोग्य सुरक्षेसाठी पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी जिल्हा शिक्षण विभागाकडूनही दि. ६ एप्रिलपासून सर्व शाळा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ठळक मुद्देखासगी, शासकीय तसेच विविध माध्यमांच्या एकूण ३२०२ शाळा शिक्षक व कर्मचारी मात्र कार्यालयीन कामकाजासाठी उपस्थित राहणार

रत्नागिरी : कोरोनाची रूग्णसंख्या वाढत असतानाच पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. कोरोनामुळे नवीन निर्बंध जाहीर केले असून त्यामुळे विद्यार्थी आरोग्य सुरक्षेसाठी पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी जिल्हा शिक्षण विभागाकडूनही दि. ६ एप्रिलपासून सर्व शाळा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.जिल्ह्यातील खासगी, शासकीय तसेच विविध माध्यमांच्या एकूण ३२०२ शाळा मंगळवारपासून बंद राहणार आहेत. पुढील शासन आदेश येईपर्यत शाळांमधील अध्यापन बंद ठेवण्यात येणार असून, शिक्षक व कर्मचारी मात्र कार्यालयीन कामकाजासाठी उपस्थित राहणार आहेत.राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुलांना पास करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र शाळांना जिल्हा प्रशासनाकडून काहीच आदेश प्राप्त न झाल्याने सोमवारी सर्वच शाळांमध्ये नियमितपणे वर्ग भरले होते. सर्वत्र आदेशाचीच चर्चा होती. अखेर शाळांनी प्रशासनाकडे संपर्क साधला असता शाळा बंद ठेवण्याच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळा बंदची सूचना देण्यात आली. नियोजित वेळापत्रकानुसार सोमवारी अनेकांचे पेपर घेण्यात आले.बहुतांश शाळांच्या नववीच्या व अकरावीच्या परीक्षा सुरू असून, अंतिम टप्यात आहेत. दहावी व बारावीचे विद्यार्थी मात्र अभ्यासासाठी घरीच आहेत. पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग बंद ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर नववी व अकरावीच्या वर्गांबाबत काय करणार, असा प्रश्न होता. सोमवारी नववी व अकरावीचेही वर्ग बंद करण्याचे आदेश शाळांना देण्यात आले. गतवर्षी १५ मार्चपासून शाळा बंद करण्यात आल्या होत्या. तर यावर्षी दि. ६ एप्रिलपासून शाळा बंदचा करण्यात आल्या आहेत.

कोरोनामुळे शासन निर्णयानुसार पहिली ते बारावीपर्यंतच्या ३२०२ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिली ते आठवीपर्यंतची सर्व मुले पास करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे पालन केले जाणार आहे. नववी ते अकरावीचेही वर्ग पुढील शासन आदेश येईपर्यत बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, दहावी व बारावी परीक्षेबाबत बोर्डाकडून निर्णय जाहीर केले जाणार आहेत.- निशादेवी वाघमोडे,शिक्षणाधिकारी, रत्नागिरी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रRatnagiriरत्नागिरी