शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

रत्नागिरी जिल्ह्यातील सारेच रस्ते झाले निर्मनुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 14:28 IST

CoronaVirus Ratnagiri : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या विकेंड लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवेतील दुकान वगळता सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आल्याने जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे जिल्हाभरातील सारेच रस्ते शनिवारी सकाळपासून निर्मनुष्य झाले होते.

ठळक मुद्देठिकठिकाणी तपासणी नाके, अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

रत्नागिरी : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या विकेंड लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवेतील दुकान वगळता सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आल्याने जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे जिल्हाभरातील सारेच रस्ते शनिवारी सकाळपासून निर्मनुष्य झाले होते.कोरोनाचा संसर्ग वेगाने होऊ लागल्याने शासनाने विकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. शासनाच्या निर्दशानुसार शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्यास सांगितले आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवार दोन दिवस पाळण्यात येणाऱ्या विकेंड लॉकडाऊनला रत्नागिरी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. मंडणगड ते राजापूरपर्यंत सर्वच तालुक्यातील दुकाने बंद ठेवण्यात आल्याने बाजारपेठा शांत झाल्या होत्या. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता अन्य कोणतेच वाहन रस्त्यावर फिरताना दिसत नव्हते. जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये शुकशुकाट दिसत होता.लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील महत्वाच्या नाक्यांवर शुक्रवारी रात्रीपासूनच बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ठिकठिकाणी बॅरिकेटस् लावून प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येत होती. विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगाही उगारण्यात आला होता. रत्नागिरी शहरात मारूती मंदिर परिसरात उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी आपल्या सहकाऱ्यांसह उभे होते.

शनिवारी सकाळपासून प्रत्येक भागातून येणाऱ्या वाहनचालकांची तपासणी करण्यात येत होती. तसेच जिल्ह्यात परजिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांचीही पोलिसांकडून तपासणी करण्यात येत होती. रत्नागिरी - कोल्हापूर मार्गावरील मुर्शी पोलीस नाका, चिपळूण - कऱ्हाड मार्गावरील कुंभार्ली, राजापूर - कोल्हापूर मार्गावरील अणुस्कुरा, मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाट येथे पोलीस तैनात ठेवण्यात आले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी