शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

रत्नागिरी जिल्ह्यातील सारेच रस्ते झाले निर्मनुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 14:28 IST

CoronaVirus Ratnagiri : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या विकेंड लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवेतील दुकान वगळता सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आल्याने जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे जिल्हाभरातील सारेच रस्ते शनिवारी सकाळपासून निर्मनुष्य झाले होते.

ठळक मुद्देठिकठिकाणी तपासणी नाके, अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

रत्नागिरी : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या विकेंड लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवेतील दुकान वगळता सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आल्याने जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे जिल्हाभरातील सारेच रस्ते शनिवारी सकाळपासून निर्मनुष्य झाले होते.कोरोनाचा संसर्ग वेगाने होऊ लागल्याने शासनाने विकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. शासनाच्या निर्दशानुसार शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्यास सांगितले आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवार दोन दिवस पाळण्यात येणाऱ्या विकेंड लॉकडाऊनला रत्नागिरी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. मंडणगड ते राजापूरपर्यंत सर्वच तालुक्यातील दुकाने बंद ठेवण्यात आल्याने बाजारपेठा शांत झाल्या होत्या. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता अन्य कोणतेच वाहन रस्त्यावर फिरताना दिसत नव्हते. जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये शुकशुकाट दिसत होता.लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील महत्वाच्या नाक्यांवर शुक्रवारी रात्रीपासूनच बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ठिकठिकाणी बॅरिकेटस् लावून प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येत होती. विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगाही उगारण्यात आला होता. रत्नागिरी शहरात मारूती मंदिर परिसरात उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी आपल्या सहकाऱ्यांसह उभे होते.

शनिवारी सकाळपासून प्रत्येक भागातून येणाऱ्या वाहनचालकांची तपासणी करण्यात येत होती. तसेच जिल्ह्यात परजिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांचीही पोलिसांकडून तपासणी करण्यात येत होती. रत्नागिरी - कोल्हापूर मार्गावरील मुर्शी पोलीस नाका, चिपळूण - कऱ्हाड मार्गावरील कुंभार्ली, राजापूर - कोल्हापूर मार्गावरील अणुस्कुरा, मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाट येथे पोलीस तैनात ठेवण्यात आले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी