शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरात उद्या सर्वपक्षीय रिफायनरी समर्थन मेळावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 14:07 IST

शहरालगतच्या धोपेश्वर बारसू परिसरात शून्य विस्थापनामुळे रिफायनरी प्रकल्प हलविण्याच्या हालचाली सुरु आहेत

राजापूर : तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाबाबत राज्य शासनाने सकारात्मक भूमिका असतानाच आता रिफायनरी प्रकल्पाला असलेले समर्थन शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी रिफायनरी समन्वय समितीने कंबर कसली आहे. त्यासाठी ६ मार्च रोजी सर्वपक्षीय रिफायनरी समर्थन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राजापूर धोपेश्वर येथील यशोदिन गार्डन हॉल येथे दुपारी ३ वाजता हा मेळावा होणार आहे.

नाणार व लगतच्या गावात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना मोठ्या विस्थापनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या विरोधानंतर शासनाने रद्द केली. हा प्रकल्प राजापूर तालुक्याबाहेर जाता कामा नये याकरिता तालुक्यातून सतत मोठा उठाव सुरू आहे. अशातच शहरालगतच्या धोपेश्वर बारसू परिसरात शून्य विस्थापनामुळे रिफायनरी प्रकल्प हलविण्याच्या हालचाली सुरु आहेत. राजापूर तालुक्यातून रिफायनरी प्रकल्पाला मोठे समर्थन मिळत असताना काही दिवसांपूर्वी राज्य शासनाकडून रिफायनरी प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रिफायनरी प्रकल्पाला असलेले समर्थन शासनापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार समर्थकांनी केला आहे.

रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प या सर्व बाबी पूर्ण करणारा असून, सोबतच मोठ्या स्वरूपाच्या वैद्यकीय सुविधा, तालुका व जिल्हावासीयांसाठी घेऊन येणारा आहे. तसेच रस्ते, रेल्वे, वीज इत्यादी पायाभूत सुविधांचा विकासही करणारा आहे.

राजापूर नगर परिषदेसह तालुक्यातील सुमारे सव्वाशे गावांनी तसेच जवळपास ५० विविध संघटनांनी हा प्रकल्प राजापूर तालुक्यातच व्हावा, याकरिता सरकारकडे साकडे घातले आहे. या प्रकल्पाचे सर्वंकष स्वागत करण्यासाठी व या रिफायनरी प्रकल्पाला राजापूर तालुक्याचे समर्थन आहे, हे दर्शविण्यासाठी रिफायनरी समन्वय समितीने सर्वपक्षीय मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला तालुकावासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन समन्वय समितीने केले आहे.

उद्याेग निर्माण हाेणे गरजेचे

राजापूर तालुक्याचे व रत्नागिरी जिल्ह्याचे औद्योगिक मागासलेपण दूर करण्यासाठी निरनिराळ्या उद्योगधंद्याची आवश्यकता आहे. शहराच्या दिशेने विस्थापित होणारे तरुण - तरुणी व त्यांचे कुटुंबीय यांचे कायमस्वरूपी होणारे स्थलांतर थांबवायचे असेल तर छोटे उद्योग निर्माण होणे आवश्यक आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajapurराजापुर