शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

राजापुरात उद्या सर्वपक्षीय रिफायनरी समर्थन मेळावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 14:07 IST

शहरालगतच्या धोपेश्वर बारसू परिसरात शून्य विस्थापनामुळे रिफायनरी प्रकल्प हलविण्याच्या हालचाली सुरु आहेत

राजापूर : तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाबाबत राज्य शासनाने सकारात्मक भूमिका असतानाच आता रिफायनरी प्रकल्पाला असलेले समर्थन शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी रिफायनरी समन्वय समितीने कंबर कसली आहे. त्यासाठी ६ मार्च रोजी सर्वपक्षीय रिफायनरी समर्थन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राजापूर धोपेश्वर येथील यशोदिन गार्डन हॉल येथे दुपारी ३ वाजता हा मेळावा होणार आहे.

नाणार व लगतच्या गावात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना मोठ्या विस्थापनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या विरोधानंतर शासनाने रद्द केली. हा प्रकल्प राजापूर तालुक्याबाहेर जाता कामा नये याकरिता तालुक्यातून सतत मोठा उठाव सुरू आहे. अशातच शहरालगतच्या धोपेश्वर बारसू परिसरात शून्य विस्थापनामुळे रिफायनरी प्रकल्प हलविण्याच्या हालचाली सुरु आहेत. राजापूर तालुक्यातून रिफायनरी प्रकल्पाला मोठे समर्थन मिळत असताना काही दिवसांपूर्वी राज्य शासनाकडून रिफायनरी प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रिफायनरी प्रकल्पाला असलेले समर्थन शासनापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार समर्थकांनी केला आहे.

रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प या सर्व बाबी पूर्ण करणारा असून, सोबतच मोठ्या स्वरूपाच्या वैद्यकीय सुविधा, तालुका व जिल्हावासीयांसाठी घेऊन येणारा आहे. तसेच रस्ते, रेल्वे, वीज इत्यादी पायाभूत सुविधांचा विकासही करणारा आहे.

राजापूर नगर परिषदेसह तालुक्यातील सुमारे सव्वाशे गावांनी तसेच जवळपास ५० विविध संघटनांनी हा प्रकल्प राजापूर तालुक्यातच व्हावा, याकरिता सरकारकडे साकडे घातले आहे. या प्रकल्पाचे सर्वंकष स्वागत करण्यासाठी व या रिफायनरी प्रकल्पाला राजापूर तालुक्याचे समर्थन आहे, हे दर्शविण्यासाठी रिफायनरी समन्वय समितीने सर्वपक्षीय मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला तालुकावासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन समन्वय समितीने केले आहे.

उद्याेग निर्माण हाेणे गरजेचे

राजापूर तालुक्याचे व रत्नागिरी जिल्ह्याचे औद्योगिक मागासलेपण दूर करण्यासाठी निरनिराळ्या उद्योगधंद्याची आवश्यकता आहे. शहराच्या दिशेने विस्थापित होणारे तरुण - तरुणी व त्यांचे कुटुंबीय यांचे कायमस्वरूपी होणारे स्थलांतर थांबवायचे असेल तर छोटे उद्योग निर्माण होणे आवश्यक आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajapurराजापुर