शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

चिपळुणात वर्षा पर्यटनाचे सर्व मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:21 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क संदीप बांद्रे/चिपळूण : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या चिपळूण तालुक्यातील वर्षा पर्यटनाचे सर्व मार्ग बंद आहेत. धबधबे, धार्मिक ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

संदीप बांद्रे/चिपळूण : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या चिपळूण तालुक्यातील वर्षा पर्यटनाचे सर्व मार्ग बंद आहेत. धबधबे, धार्मिक स्थळांवर पर्यटकांअभावी शांतता कायम आहे. परिणामी, येथील पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरून ये-जा करणारे पर्यटक वर्षा पर्यटनाचा मनसोक्त आनंद घेतात. त्यामुळे धबधबे, धरणे व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी मोठी गर्दी होते. त्यामुळे पावसाळ्यातही पर्यटनातून छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या हातभार मिळतो. मंदिरे आणि घाट रस्त्यातील धबधब्यांच्या परिसरात चहाची टपरी, वडापाव, स्टॉलवाले, तसेच कणीस भाजून विकणारा सामान्य व्यावसायिक या दिवसांची वाट पाहत असतात. त्याशिवाय उपहारगृहे, भोजनालये, तसेच लॉजिंग, निवास व्यवस्थेच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होते, परंतु कोरोनाच्या परिस्थितीमुळे वर्षा पर्यटनाला पूर्णतः ब्रेक लागला आहे. जागोजागी बंदी असल्याने वर्षा पर्यटनाचे बहुतांशी मार्ग बंद झाले आहेत.

सध्या तालुक्यातील सर्वच धार्मिक स्थळे आणि धबधबे बंद आहेत. वर्षा पर्यटनासाठी येणारे लोक प्रामुख्याने परशुराम मंदिर व त्या नजीक असलेला सर्वदूर परिचित सवतसडा धबधबा, डेरवणची शिवसृष्टी, गोविंदगड किल्ला, टेरवची भवानी माता, अडरे धरण, वीर येथील धबधबा आदी ठिकाणी भेटी देतात. मात्र, आता कोरोनाच्या परिस्थितीमुळे या पर्यटन ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सवतसडा धबधब्याच्या ठिकाणी वाढलेली गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तेथे फलक उभारून बंदी घातली. त्यामुळे पर्यटन व्यावसायिक अडचणीत आले आहेत.

-------------------------

अनेक जण कर्जात अडकले

नव्याने व्यवसाय करीत असलेल्या पर्यटन व्यवसायिकांनी लाखो रुपयांचे कर्ज काढून, या व्यवसायात उभे राहण्याचा प्रयत्न केला होता. या कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, याची चिंता सतावत आहे. हॉटेल व्यावसायिकांचे वीजबिल ५० हजारांहून जास्त आले आहे. हे बिल कसे भरायचे, याची चिंता आहे. हातावरचे पोट असलेले आणि मोठे व्यावसायिक अशा सर्वच पर्यटन व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

----------------------------

काही जण भाजी, मच्छीची विक्री करत आहेत

सध्या कोरोनाच्या परिस्थितीत सायंकाळी ४ वाजेपर्यंत बाजारपेठ खुली असते, तर शनिवारी, रविवारी वीकेंड लॉकडाऊनमुळे केवळ जीवनावश्यक वस्तू विक्रीला परवानगी आहे. त्यासाठी काही पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांनी व्यवसायाचे नवे मार्ग स्वीकारले आहेत. काही जण भाजी व मच्छी घरपोच देण्याचे काम करत आहेत.

-----------------------------

जिल्हाबंदी उठल्यामुळे आता लोक घाटमार्गे ये-जा करू लागले आहेत, परंतु सर्वच पर्यटन स्थळांवर बंदी असून, गर्दीच्या ठिकाणी ग्रामकृती दल व पोलिसांनी लक्ष ठेवले आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी फारसे कोणी जात नाही, परंतु शासनाचे सर्व नियम व अटी पाळून हळूहळू पर्यटनाचे मार्ग खुले करायला हवेत.

- समीर कोवळे, पर्यटन दूत, चिपळूण.