शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

‘एपीएल’धारकांना धान्य सुरक्षाच नाही

By admin | Updated: August 26, 2015 00:23 IST

कोकण विभाग : शासनाचे १४ जिल्ह्यांना झुकते माप...

रत्नागिरी : ‘एपीएल’ शिधापत्रिकाधारकांना गेल्या नोव्हेंबरपासून रेशनदुकानावरील धान्यपुरवठा बंद झाला आहे. कमी पाऊस पडलेल्या १४ जिल्ह्यात एपीएल शिधापत्रिकाधारकांना अन्न सुरक्षा योजनेप्रमाणे तांदूळ प्रतिकिलो ३ रुपये आणि गहू प्रतिकिलो २ रुपये याप्रमाणे वितरण करण्यास सुरूवात केली आहे. परंतु कोकणातील एपीएलधारकांची धान्य सुरक्षा शासनाने काढून घेतली आहे.केंद्र सरकारची राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना फेब्रुवारी २०१४ पासून सुरू झाली. या योजनेच्या प्राधान्य गट तसेच अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना धान्यपुरवठा नियमित सुरू आहे. मात्र, ‘एपीएल’धारकांना धान्य पुरवठा अनियमित केला गेला. नोव्हेंबर २०१४पासून तर धान्यपुरवठा पूर्णत: बंद करण्यात आला.जिल्ह्यात ९८,१९३ एपीएल शिधापत्रिकाधारक आहेत. त्यांना प्रतिशिधापत्रिका धान्य देण्यात येते. जिल्ह्यासाठी एपीएलधारकांना ५६४ मेट्रिक टन गहू आणि ४६१ मेट्रिक टन तांदूळ इतके नियतन मंजूर आहे. १ फेब्रुवारीपासून अन्न सुरक्षा योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. ही योजना सुरू झाल्यानंतर एपीएलधारकांंच्या धान्य नियतनात अनियमितपणा आला.नोव्हेंबरपासून या शिधापत्रिकाधारकांना धान्य पुरवठाच बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या कार्डधारकांची आशा आता मावळलेलीच आहे. या कार्डधारकांना आता काळ्या बाजाराने धान्य खरेदी करावे लागते. त्यातच प्राधान्य गटासाठी उत्पन्नाच्या निकषावर यादी करताना अधिक उत्पन्न असलेल्यांनाही अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळत आहे.त्यातच आता शासनाने सुरूवातीच्या काळात पाऊस न झाल्याने काही जिल्ह्यांतील शेतकरी हवालदील झाले आहेत. त्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याचे कारण सांगत यापैकी १४ जिल्ह्यातील ‘एपीएल’ शिधापत्रिकाधारकांनाही तांदूळ प्रतिकिलो ३ रुपये आणि गहू प्रतिकिलो २ रुपयाने देण्यास सुरूवात केली आहे. यात औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे. मात्र, उर्वरित जिल्ह्यात एपीएलधारकांना ९ रुपये दराने तांदूळ आणि ८ रुपये दराने गहू मिळणेही दुरापास्त झाले आहे.कोकणातही गतवर्षीपासून पावसाच्या अनियमितपणामुळे शेती धोक्यात आली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनाही नुकसान सोसावे लागले आहे. शासनाने अन्न सुरक्षा योजनेमुळे नको, पण निदान नेहमीच्या दराने तरी आम्हाला धान्य द्यावे, अशी आर्त विनवणी एपीएलधारकांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)अन्नसुरक्षेचा तरी लाभ द्या...कोकणात पावसाचा अनियमितपणा सुरुच आहे. त्यामुळे यंदाही शेती धोक्यात आली आहे. मात्र, कोकणातील एपीएलधारकांसाठी रेशनवर धान्यच बंद झाल्याने सामान्य शेतकऱ्यांनी जगायचं कसं ? असा सवाल आता जिल्ह्यातून विचारला जात आहे.